Home Search

गांधीजीं - search results

If you're not happy with the results, please do another search

पापक्षालनासाठी गांधीजींना करावे लागले गोदास्नान! (Gandhiji had bath in Nasik river Godavari as mark...

0
महात्मा गांधी अन् नाशिक यांच्यातील नातं अनोखं आहे. बॅरिस्टर झाल्यानंतर त्या महात्म्याला जातीत घ्यायचं की नाही, यावर त्यांच्या गावी पोरबंदरला जातपंचायतीत झगडा सुरू होता. कुटुंबाचा आग्रह जातीत पुन्हा प्रवेश मिळावा असा होता. म्हणून त्या महात्म्याला 1891 मध्ये गोदावरीत स्नान करावं लागलं होतं. मोहनदास हे महात्मा होण्याच्या प्रवासातील बंडाची ती पहिली ठिणगी नाशिकच्या गोदाकाठावर त्यांच्या मनात भडकली होती...

ताराबेन मश्रुवाला – माधानच्या दीपशिखा (Taraben Mashruwala changed the face of Madhan village)

ताराबेन मश्रुवाला या नाजुक-किरकोळ प्रकृतीच्या, व्रतस्थ ब्रह्मचारी स्त्रीने त्यांचे पूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी खर्ची घातले. त्यांनी विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आडमार्गावर असलेल्या माधान या लहानशा खेड्याचा कायापालट केला. तेथे त्या आधी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नव्हत्या. ताराबेन यांनी महात्मा गांधी यांचे ग्रामसुधारणेचे स्वप्न तेथे प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. माधान हे सातपुडा डोंगर पायथ्याशी वसलेले ओसाड असे खेडेगाव आहे. ते महाराष्ट्रात ‘आदर्श ग्राम’ रूपात आणि सामाजिक कार्याच्या रूपात नावाजले गेले...

बालशिक्षणाच्या प्रणेत्या : ताराबाई मोडक ! (Tarabai Modak : Pioneer of Child Education)

ताराबाई मोडक पद्मभूषण; त्यांच्या शिष्य अनुताई वाघ पद्मश्री- एकाच कार्यात गुंतलेल्या गुरुशिष्य जोडीला पद्म सन्मान मिळाल्याचे उदाहरण विरळा. त्या गुरूशिष्यांनी कोसबाड येथे बालशिक्षणविषयक अनेक प्रयोग 1956 सालापासून केले. त्यांनी त्यांच्या प्रयोगांमध्ये मॉण्टेसरी पद्धतीची शिक्षणविषयक मूलतत्त्वे घेऊन, त्यांच्या कार्यपद्धतीत फेरफार केले. शिक्षकांना व ग्रामीण कारागिरांना तयार करता येतील अशी शैक्षणिक साधने रचली. ‘कुरण शाळा’, ‘उद्योग शाळा’, ‘निसर्ग भ्रमण’, ‘लेखन-वाचन वर्ग’ असे उपक्रम योजले. त्यांनी तर ‘अंगणवाडी’ व ‘बालवाडी’ या संकल्पना समाजात रुजवल्या ! ताराबाईंनी सुरू केलेल्या ‘शिक्षण पत्रिका’ मासिकाला नव्वद वर्षे पूर्ण झाली आहेत...

मधू दंडवते – झुंजार समाजवादी नेता (Madhu Dandavate- Birth centenary of a socialist leader)

4
मधू दंडवते यांचे नाव संसदेत ठसा उमटवणाऱ्या काही महत्त्वाच्या मराठी नेत्यांमध्ये आवर्जून घेता येईल. ते लोकसभेवर राजापूर मतदार संघातून जवळजवळ वीस वर्षे सातत्याने निवडून आले. त्यांनी जनता पक्षाचे सरकार केंद्रात आले तेव्हा मंत्रिपदही भूषवले. दंडवते यांनी मोरारजी देसाई यांच्या सरकारात रेल्वे मंत्री म्हणून (1977) त्यांचा कार्यकाळ गाजवला. त्यानंतर ते व्ही.पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. ते व्यवसायाने प्रोफेसर होते. मधू दंडवते यांची जन्मशताब्दी 21 जानेवारी 2024 रोजी साजरी झाली...

जगाला प्रेम अर्पावे ! (Offer love to the World)

समाजात सगळीकडे अस्वस्थता पसरलेली असताना, सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काय करायला हवे? संवेदनशीलतेने विचार करणाऱ्या माणसांच्या मनात असा प्रश्न असंख्य वेळा उद्भवतो. त्याचे समी‍करणातून देण्यासारखे उत्तर नाही. समाजाच्या परीघामध्ये ज्ञान, धर्म, राजकारण, लैंगिकता, स्त्री-वाद, पुरुषप्रधानता अशा क्षेत्रांतील विचारांचे सत्य समजून घेण्यासाठी, संकुचित विचार आणि वर्तन याबाबत सजगता येण्यासाठी सर्वांनी कार्यरत झाले पाहिजे...

मंडलीक ट्रस्ट – पंचायत राज प्रबोधनाचे कार्य (Mandalik Trust For Decentralised Democracy)

डॉ. पी.व्ही. मंडलीक ट्रस्टची स्थापना 31 मार्च 1971 रोजी झाली. ट्रस्टचा सुवर्ण महोत्सवदेखील होऊन गेला. मात्र कोरोनामुळे त्या दोन वर्षांत ट्रस्टच्या प्रत्यक्ष क्षेत्रीय कामास अनेक मर्यादा आल्या. परंतु ट्रस्टने गेल्या पाच दशकांत समाजजागृतीचे विशेषत: पंचायत राज संकल्पना जनमानसात मुरवण्याचे खूप मोठे कार्य केले आहे. पी.व्ही. मंडलीक यांनी स्वत:च तो ट्रस्ट सामाजिक ऋणाच्या जाणिवेतून निर्माण केला...

परतवाड्याचे सार्वजनिक वाचनालय

शंकर वामन गुरूजी यांनी परतवाड्यात वाचनप्रेमींना एकत्र आणून वाचनालयाची मुहूर्तमेढ 6 सप्टेंबर 1866 रोजी रोवली. त्या दिवशी गणेश चतुर्थी होती. त्याला दीडशे वर्षे होऊन गेली आहेत. वाचनालयाच्या स्थापनेत इंग्रज अधिकारी मेजर मॅकेन्झी यांचा पुढाकार होता. परतवाड्यात इंग्रज सैन्याची छावणी होती. तेथे इंग्रज अधिकारी असत. परतवाडा हे अचलपूरचे उपनगर म्हणावे असे गाव आहे. परंतु तेथील इंग्रज सैन्याच्या छावणीमुळे त्यास काही काळ महत्त्व अधिक लाभले. खुद्द अचलपूरचे वाचनालयही स्थानिक प्रयत्नांतून 1893 मध्ये सुरू झाले...

कमला निंबकर – व्यवसायोपचाराच्या प्रवर्तक (Pioneer of occupational therapy in India)

व्यवसायोपचाराचे तंत्र भारतातच नव्हे तर आशियातही प्रथम आणले ते कमलाबाई निंबकर यांनी. त्या अमेरिकन जन्माच्या भारताच्या स्नुषा. विष्णुपंत निंबकर यांनी त्यांच्याशी लग्न करण्याचे ठरवले. कमलाबाईंनी भारतात येऊन राहायचे आणि त्यांच्या शिक्षणाचा व अनुभवाचा फायदा नव्या देशाला करून द्यायचा हे नवराबायकोंत आधीच ठरले होते. कमलाबाईंनी नवऱ्याबरोबर केलेल्या त्या कराराचे तंतोतंत पालन केले ! त्यांनी त्याही पुढे जाऊन, भारतात गरज कशाची आहे ते पाहून, त्याचे प्रशिक्षण घेऊन त्याचा प्रचार व प्रसार भारतात केला. विष्णुपंतांनी त्यांना त्यांच्या त्या सगळ्या कामांत पूर्ण पाठिंबा कायमच दिला...

ना.ग. गोरे – राजकारणी व साहित्यप्रेमी

0
समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांच्या जीवनात कर्मयोग, बुद्धिप्रामाण्यवाद आणि कलात्मकता यांचा विलोभनीय संगम दिसतो. त्यांनी तो संगम सार्वजनिक जीवनात वावरताना साधला होता. त्यांच्या भाषणात, लेखनात, संवादात विचारांचे धागे बांधेसूदपणे अन् कलात्मकतेने विणलेले आढळतात. त्यात बुद्धिप्रामाण्य, तर्कशुद्धता आणि विवेकाचे भान यांचा अनुभव येतो...

कोळथरे येथील आगोमचे मामा महाजन

दापोली तालुक्याच्या कोळथरे गावचे मामा महाजन यांनी राजकारण, समाजकारण आणि उद्योग या तिन्ही क्षेत्रांत स्वतःचा असाधारण असा ठसा स्थानिक पातळीवर उमटवला आहे. मात्र त्यांची ओळख ‘आगोमचे जनक मामा महाजन’ हीच आहे...