Home Authors Posts by गिरीश घाटे

गिरीश घाटे

10 POSTS 1 COMMENTS
गिरीश घाटे हे ठाण्याचे रहिवासी. ते धातुशास्त्रातील पदवीधर असून त्यांच्या डॅकोट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व आयजेन इंजिनीयर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्या आहेत. घाटे यांना इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक स्टडीज (नवी दिल्ली) या संस्थेने उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित (2015) केले आहे. घाटे हे सोलापूर जिल्ह्यातील यावली गावी ‘प्रभाकर फाउंडेशन’च्या वतीने माध्यमिक शाळा दहा वर्षे चालवत आहेत. घाटे रोटरी संस्थेचे सक्रिय सभासद आहेत. त्यांच्या सामाजिक जीवनावर रोटरी तत्त्वांचा मोठा प्रभाव आहे. घाटे यांची ‘सांग ना समजेल का?’ (कविता संग्रह) आणि ‘रावसाहेब’ ही (चरित्रात्मक कादंबरी) पुस्तके प्रकाशित आहेत.

नाटककार-संपादक विद्याधर गोखले

1
विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीचे 2024 हे वर्ष आहे. 1960 ते 1980 ही दोन दशके मराठी संगीत नाटक म्हणजे विद्याधर गोखले असे जणू समीकरणच होते. मराठी संगीत नाटक ही मराठी संस्कृतीलाच नव्हे तर जागतिक रंगभूमीला असलेली देणगी आहे. गोखले यांनी पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर अध्यापन काही वर्षे केले. त्यानंतर त्यांनी ‘दैनिक लोकसत्ता’मध्ये नोकरी पत्करली. अनेक वर्षे ‘लोकसत्ता’मध्ये काम करून पत्रकारितेमधील कारकीर्द गाजवली. त्यांनी ‘लोकसत्ता’मध्ये संपादक म्हणूनही जवळजवळ पाच वर्षे काम केले...

मधु दंडवते – उत्स्फूर्त, विनोदी, तिरकस…

2
दिल्ली येथील संसद भवनात ठसा उमटवणाऱ्या महत्त्वाच्या काही मराठी व्यक्तींमध्ये प्रोफेसर मधू दंडवते यांचे नाव घ्यावे लागेल. मधू दंडवते लोकसभेवर 1971 ते 1990 या दोन दशकांत सातत्याने निवडून आले. सत्ताधारी पक्षात असोत अथवा विरोधी बाकांवर बसलेले असोत, दंडवते यांनी त्यांच्या अभ्यासू वृत्तीने आणि कुशल वक्तृत्व कलागुणांनी संसद गाजवली. मधू दंडवते यांनी त्यांच्या उत्स्फूर्त आणि विनोदी परंतु मार्मिक भाषणांनी राजकीय वर्तुळात ठसा उमटवला...

मधू दंडवते – झुंजार समाजवादी नेता (Madhu Dandavate- Birth centenary of a socialist leader)

4
मधू दंडवते यांचे नाव संसदेत ठसा उमटवणाऱ्या काही महत्त्वाच्या मराठी नेत्यांमध्ये आवर्जून घेता येईल. ते लोकसभेवर राजापूर मतदार संघातून जवळजवळ वीस वर्षे सातत्याने निवडून आले. त्यांनी जनता पक्षाचे सरकार केंद्रात आले तेव्हा मंत्रिपदही भूषवले. दंडवते यांनी मोरारजी देसाई यांच्या सरकारात रेल्वे मंत्री म्हणून (1977) त्यांचा कार्यकाळ गाजवला. त्यानंतर ते व्ही.पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. ते व्यवसायाने प्रोफेसर होते. मधू दंडवते यांची जन्मशताब्दी 21 जानेवारी 2024 रोजी साजरी झाली...

सुनंदाताई पटवर्धन – एक प्रेरणास्थान

1
सुनंदाताई पटवर्धन यांच्या दुःखद निधनाची (10 जानेवारी 2024) बातमी वाचली आणि हृदयाचा एक ठोका चुकला. सुनंदाताई आणि माझा संपर्क पंधरा वर्षांहून अधिक काळचा. मी रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बन आणि प्रभाकर फाऊंडेशन यांचा प्रतिनिधी म्हणून 2007 च्या सुमारास सुनंदाताई आणि त्यांच्या ‘प्रगती प्रतिष्ठान’ संस्थेच्या संपर्कात आलो. सुरुवातीला जव्हार-मोखाडे भागात आदिवासी मुलांना सायकल वाटप, महिलांना घरघंटी वाटप अशा उपक्रमांतून सुनंदाताई यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली...

वंदे मातरम् – हैदराबाद मुक्ती संग्रामातील पहिली ठिणगी

1
‘वंदे मातरम’ या गीताला भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1876 मध्ये लिहिलेल्या ‘आनंद मठ’ या कादंबरीतील आहे. ते रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम देशापुढे आणले. त्या गीताला प्रसिद्ध संगीतकार पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी स्वरबद्ध केले आणि ते गीत अजरामर ठरले ! ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत म्हणून राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात वाराणसी येथे 1905 साली स्वीकारले गेले...

जालन्याचे हुतात्मा – जनार्दनमामा (Janardanmama- Brave Marathawada revolutionary)

0
ब्रिटिश भारतातून 15 ऑगस्ट 1947 रोजी परतल्यानंतर, निजामाने स्वतंत्र हैदराबाद राज्याची घोषणा केली. धर्मांध कासीम रिझवी यांच्या रझाकार संघटनेने हैदराबाद राज्यातील हिंदू आणि धर्मनिरपेक्ष मुसलमान यांच्यावर अमानुष अत्याचाराचे सत्र सुरू केले. उलट, संस्थानातील जनतेने भारतात विलीन होण्यासाठी लढा उभारला. लोक त्या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्वातंत्र्यवीरांनी रझाकारांच्या अत्याचारांचा प्रतिकार केला आणि त्यात त्यांच्या प्राणाची आहुती दिली...

चांगुलपणा अवतीभवती

2
श्रीकांत पेटकर यांनी “चांगुलपणा अवतीभवती” हे छोटेखानी पुस्तक ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलवरील काही निवडक लेखांचा संग्रह या स्वरूपात प्रकाशित केले आहे. पुस्तक ‘ग्रंथाली’ या मान्यवर संस्थेच्या देखरेखीखाली प्रकाशित झाले आहे, तर ‘थिंक महाराष्ट्र’चे मुख्य संपादक दिनकर गांगल यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभलेली आहे. सामाजिक, कला आणि संस्कृती क्षेत्रात स्वतःला झोकून दिलेले परंतु प्रसिद्धीविन्मुख अशा व्यक्तींबाबत लेख या पुस्तकात आढळतात...

रावसाहेब (A Book on History of Hyderabad Freedom Struggle)

4
एकोणिसावे शतक संपत आले होते. हैदराबाद राज्यातील हिंदू जनतेचे आत्मतेज जागृत करून विविध क्षेत्रात त्यांना कार्य प्रवृत्त करण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या पहिल्या फळीतील एक नेते होते न्यायमूर्ती केशवराव कोरटकर. त्यांच्या सहकार्याने येथे मराठी शाळा सुरू झाली. 'निजाम विजय'सारखे वर्तमानपत्र निघाले. मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना झाली. त्यांनी विधवा पद्धतीला विरोध करत स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. हिंदू समाजाला स्वातंत्र्याचे स्वतःचे भान देणाऱ्या केशवराव कोरटकर यांचा परिचय मात्र हैदराबादमधील मराठी लोकांनाही नाही आणि महाराष्ट्रासाठी तर त्यांचे कार्य अपरिचितच आहे...

मीर लायक अली फरार ! – सन 1950

4
भारत स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला, तेव्हा हैदराबादच्या निजामाने हैदराबाद संस्थान हे एक स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केले. त्या वेळी मीर लायक अली हा निजामाचा पंतप्रधान होता. भारतात सामील न होण्याचा सल्ला निजामाला देणाऱ्यांमध्ये त्याचे नाव अग्रेसर होते. मीर लायक अली हैदराबाद संस्थानात यशस्वी उद्योगपती होता. भारताने ‘ऑपरेशन पोलो’ या पोलिस कारवाईस आरंभ केल्यानंतर निजामाने राज्यात झालेल्या अत्याचारांची आणि पर्यायी युद्धाची सर्व जबाबदारी मीर लायक अली आणि त्याचे मंत्रिमंडळ यांच्यावर टाकली आणि स्वतः नामानिराळा झाला. भारताने मीर लायक अली याला नजरकैदेत टाकले. परंतु तो नजरकैदेतून पसार 1950 मध्ये झाला...

न्या केशवराव कोरटकर – हैदराबाद लढ्यातील मवाळ कार्यकर्ते (Justice Keshavrao Koratkar – An Activist...

1
न्यायमूर्ती केशवराव कोरटकर (1867-1932) हे हैदराबाद स्वातंत्र्यलढ्यातील मवाळ कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांनी बजावलेली कामगिरी शतकभराहून अधिक काळ हैदराबाद शहरी दृगोचर होत आली आहे. त्यांपैकी दोन संस्था म्हणजे विवेकवर्धिनी शिक्षणसमूह आणि महाराष्ट्र साहित्य परिषद. केशवरावांचा जन्म गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. ते निजाम राज्यात मुख्य न्यायाधीशपदापर्यंत स्वकर्तृत्वावर पोचले होते...