राजा रविवर्मा आणि मावळ – ऋणानुबंध (Raja Ravi Varma and Maval...

राजा रविवर्मा हे नाव भारतीय चित्रकलेच्या इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या कलेने भारतीय चित्रसंस्कृतीला जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त झाली. त्यांनी त्यांच्या चित्राच्या माध्यमातून देव, देवता आणि स्त्रीसौंदर्य यांना नव्या स्वरूपात सादर केले. राजा रविवर्मा यांचे मावळ प्रांताशी घनिष्ट संबंध होते. ते अनेक वर्षे मावळात वास्तव्यास होते. त्यांनी तेथे राहून अनेक उत्तमोत्तम चित्रे रेखाटली. त्यांचे विषयदेखील प्रदेशाशी जोडलले होते. त्यामधून रविवर्मा यांच्यासारख्या जगद्विख्यात चित्रकाराचा मावळ प्रदेशाशी कसा ऋणानुबंध होता हे स्पष्ट होते. ‘दमयंती आणि हंस’ हे चित्र त्या दृष्टीने उद्बोधक आहे...

आपलं वडगाव : मावळचा वारसा (Heritage of Maval Taluka in special...

‘आपलं वडगाव’ नावाचा एक दिवाळी अंक दोन वर्षे (2024 पासून) प्रसिद्ध होत आहे. त्याच्या 2025 सालच्या विशेष अंकाचे प्रकाशन मुंबईचे चित्रकार व चित्रपट दिग्दर्शक रघुवीर कुल यांच्या हस्ते छोटेखानी समारंभात झाले. कुल यांनी कागदी आवरणातून अंक बाहेर काढला व समोरच्या श्रोत्यांसमोर धरला. त्याच वेळी त्यांची स्वत:ची नजरही अंकाच्या मुखपृष्ठावरून गेली. त्यामुळे ते एकाच वेळी चपापले व अतिशय आनंदितही झाले. मावळ तालुक्यात एक भव्य कलादालन निर्माण केले जावे असा उच्चार समारंभात वेगवेगळ्या वक्त्यांकडून वारंवार होत होता. रघुवीर कुल यांनी त्यांच्या मनोदयास भरभरून पाठिंबा व्यक्त केला...

हमीद सय्यद : भारूडांमधून जनजागृतीचा वसा! (Hamid Sayyad- Muslim Divotee Sings...

हमीद सय्यद हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील भातकुडगावचे. छोट्या गावातून आलेला हा मुसलमान मुलगा वयाची चाळिशी ओलांडित असताना राष्ट्रीय भारूडकार होऊन गेला आहे. आकाशवाणी कलावंत तर तो आहेच. तो वारकरी सांप्रदायिक पारंपरिक भारुड सादर करून प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच हुकूमत गाजवू शकतो. त्याची ती ताकद हेरून त्याचा अनेकविध प्रचारकार्यात उपयोग मुख्यत: केंद्र व राज्य शासनाच्या आणि अन्य संस्थांकडून करून घेतला जातो. हमीद सय्यद यांच्या स्वरचित भारूडांमध्ये गायन, नृत्याभिनय व चटपटीत-उद्बोधक संवाद हे वैशिष्ट्य असते...

आवाहन

लोकप्रिय लेख

मराठी – अभिजात भाषा !

भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारकडून प्राप्त झाल्यावर तिचा विकास-संवर्धन-अभिवृद्धी यासाठी राज्य सरकारला दरवर्षी तीनशे ते पाचशे कोटी रुपयांचे अनुदान मिळते. महाराष्ट्र सरकारने मराठीसाठी अभिजाततेचा दावा केंद्र सरकारकडे (2012-2013) करून, अटी सिद्ध करण्याचे काम केले. ते काम साहित्यिक-संशोधकांच्या एका अभ्यास समितीने पूर्ण केले. मराठी भाषेने 2013 साली केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर अकरा वर्षांनी मराठीला तो दर्जा प्राप्त झाला आहे. मराठीसोबत अजून चार भाषांना तो दर्जा त्याच दिवशी मिळाला. मग मराठी ही देशातील सातवी अभिजात भाषा की अकरावी? भारताच्या राज्यघटनेने मान्यता दिलेल्या बावीस भाषांपैकी अकरा म्हणजे अर्ध्या भाषा आता अभिजात ठरल्या आहेत...

व्यक्ती

संस्था

वैभव

गावगाथा

शिक्षकांचे व्यासपीठ

मराठीकारण

मंथन

सद्भावनेचे व्यासपीठ

मोगरा फुलला

Youtube व्हिडियो

व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प

लोकशाही सबलीकरण अभियान