झोंपाळ्यावरची गीता (The Geeta in Leisure)

विनोबांची ‘गीताई’ घराघरांत पोचली. मात्र त्याआधीही गीतेतील तत्त्वज्ञान सोप्या मराठी भाषेत मांडले होते ते अनंततनय यांनी. त्यांचे नाव दत्तात्रेय अनंत आपटे. त्यांनी 1917 मध्ये ‘झोंपाळ्यावरची गीता’ या पुस्तकाची रचना केली. त्या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करावे असा विचार मनात आला. त्यानुसार लोकमान्य टिळक यांच्या ‘गीतारहस्य’च्या प्रकाशनाच्या शताब्दीनिमित्त टिळकांच्या जन्मभूमीत विशेष चर्चासत्र होणार असल्याचे समजले. ‘झोपाळ्यावरच्या गीते’च्या पुनर्प्रकाशनासाठी तोच मुहूर्त योग्य म्हणून तो साधला गेला. सदानंद मोरे यांच्या हस्ते रत्नागिरीतील ‘गीता भवन’मध्ये पुस्तकाचे प्रकाशन झाले. तो बहुमोल ठेवा शंभर वर्षांनी पुन्हा एकदा उपलब्ध करता आला याचा आनंद मोठा होता. त्यानंतर त्याचा इंग्रजी अनुवाद मसुरकर यांनी केला आणि आनंद द्विगुणित झाला...

इरावती कर्वे यांच्यावर संकेतस्थळ

‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ हे 1900 ते 1930 या काळात महाराष्ट्रात जन्मलेल्या महनीय व्यक्तींची समग्र संकेतस्थळे तयार करत आहे. प्रकल्पात सुमारे तीनशे वेबसाइट तयार होणार आहेत. पैकी साने गुरुजी, स्वामी रामानंद तीर्थ, एस.एम. जोशी, व्ही. शांताराम आणि आबासाहेब गरवारे या पाच पूर्ण झाल्या आहेत. आणखी दहा वेबसाइट येत्या तीन महिन्यांत पूर्ण होतील. या प्रकल्पाचे नाव ‘महाभूषण’ संकेतस्थळे असे आहे. इरावती कर्वे यांचे नाव मानववंशशास्त्राच्या इतिहासात मोठे मानले जाते. त्यांच्या ‘युगांत’ या महाभारतावरील विश्लेषणात्मक पुस्तकाला 1968 साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता...

शिरोड्याचे वि.स. खांडेकर संग्रहालय (V S Khandekar memorial at Shiroda in...

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त वि.स. खांडेकर यांच्या नावाचे प्रेक्षणीय स्मृती संग्रहालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘शिरोडा’ या गावी आहे. ते गाव वेंगुर्ला तालुक्यात समुद्रकाठी वसले आहे. गांधीजींनी केलेल्या 1930 सालच्या मार्च-एप्रिल महिन्यातील मिठाच्या सत्याग्रहानंतर, मे 1930 मध्ये त्याच धर्तीवर परंतु काहीसा वेगळा आणि काकणभर अधिक उग्र स्वरूपाचा मिठाचा सत्याग्रह शिरोडा येथे झाला होता ! त्या सत्याग्रहाचे नेते ‘कोकणचे गांधी’ रत्नागिरीचे सामाजिक कार्यकर्ते सीताराम पुरुषोत्तम अर्थात आप्पासाहेब पटवर्धन हे होते. त्यात त्या गावच्या अनेकांना बंदिवासाची शिक्षाही भोगावी लागली होती...

आवाहन

लोकप्रिय लेख

पर्वतातील गाव – वसईचे गिरीज !

गिरीज हे पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील नयनरम्य ठिकाण. तेथे बऱ्याच टेकड्या पोर्तुगीजपूर्व काळात होत्या. काही उंच, काही ठेंगण्या. त्या सर्व लहानमोठ्या टेकड्यांमध्ये वसलेले गाव म्हणून त्याचे नाव गिरीज. ‘गिरी’ म्हणजे पर्वत आणि ‘ज’ म्हणजे जन्मलेले. पर्वतातील गाव गिरीज ! पोर्तुगीज वसाहतवादी वसईत सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी आले. त्यांनी शेषवंशी क्षत्रिय भंडारी भोंगाळे राज्याची वसई खाडीवरील गढी जिंकली. पोर्तुगीज सोजिरांची नजर आजुबाजूच्या गावांवरही गेली. त्यांतील एक गाव गिरीज...

व्यक्ती

संस्था

वैभव

गावगाथा

शिक्षकांचे व्यासपीठ

मराठीकारण

मंथन

सद्भावनेचे व्यासपीठ

मोगरा फुलला

Youtube व्हिडियो

व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प

लोकशाही सबलीकरण अभियान