Home Tags अचलपूर

Tag: अचलपूर

तिरुपतीचे बालाजी कुऱ्हा येथील बाळासाहेब (Tirupati Balaji’s temple in Kurha, Maharashtra)

कुऱ्हा हे गाव अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यात आहे. तेथे लोकवस्ती पंधरा हजार आहे. कम्युनिस्टांचा बालेकिल्ला म्हणून गावाची ओळख. परंतु तेथेच तिरुपती व्यंकटेश दोन ठिकाणी सुमारे साडेतीनशे वर्षांपासून विराजमान आहे ! त्या दोन ठिकाणच्या देवांना लहान बाळासाहेब व मोठे बाळासाहेब या नावांनी ओळखले जाते; इतकी ती देवता गावाशी एकरूप होऊन गेली आहे...

परतवाडा सुपर ! (Many many good old memories of Paratwada-Amaravati ST bus)

“फलाट क्रमांक तीन वर लागलेली गाडी ही सहा वाजताची परतवाडा सुपर बस असून बस प्रवासात मध्ये कोठेच थांबणार नाही. परतवाड्याला थेट जाणाऱ्या प्रवाशांनीच गाडीत बसून घ्यावे !” अशी घोषणा लाऊडस्पीकरवरून अमरावती बस स्थानकाच्या बाहेरसुद्धा ऐकू येई आणि प्रवाशांची पावले जलदगतीने बसकडे वळत ! परतवाडा एसटी डेपोने अमरावती विनाकंडक्टर बस 1980 च्या सुमारास सुरू केली आणि ती बस प्रचंड लोकप्रिय झाली...

अचलपूरचे कृषिधन – कपाशी ते केळी-संत्री

अचलपूर तालुक्याच्या शेतीतील गेल्या साठ वर्षांतील बदल शेतीशास्त्राप्रमाणेच समाजशास्त्रीय दृष्ट्यादेखील अभ्यासण्यासारखे आहेत. अचलपूरला कपास हे तसे पारंपरिक रोकड उत्पादन होतेच. अचलपूरचा कापूस उत्तम प्रतीच्या वस्त्रप्रावरणांसाठी जगभर प्रसिद्ध होता. साठ वर्षांतील ठळक बदल म्हणजे त्या कपाशीबरोबर केळी, मिरची व संत्री या पिकांनीही अचलपूरला नवी ओळख दिली आहे. त्यातून तालुका समृद्ध होत आहे व तरुण पिढी शेतीकडे पुन्हा वळत आहे...

महानुभाव पंथीयांचे पूजनीय अचलपूर

अचलपूर तालुका हा महानुभाव पंथीयांसाठी श्रद्धास्थान आहे. त्यांच्या पवित्र जागा तालुक्यात अनेक आहेत- अष्टमहासिद्धी, वडनेर भुजंग, असदपूर, काकडा, अचलपूर शहरातील रत्नपूजा, निर्वाणेश्वर, बोरबन, पिंगळभैरव, लाखबन, देव्हार चौकी, अंबीनाथ, सोमनाथ ही ती श्रद्धास्थाने. महानुभावांना स्थान म्हणजे परमेश्वर अवताराच्या स्पर्श सबंधाने पवित्र झालेले ठिकाण. एकूण अकरा प्रकार स्थानासबंधी आहेत...

परतवाड्याचे सार्वजनिक वाचनालय

शंकर वामन गुरूजी यांनी परतवाड्यात वाचनप्रेमींना एकत्र आणून वाचनालयाची मुहूर्तमेढ 6 सप्टेंबर 1866 रोजी रोवली. त्या दिवशी गणेश चतुर्थी होती. त्याला दीडशे वर्षे होऊन गेली आहेत. वाचनालयाच्या स्थापनेत इंग्रज अधिकारी मेजर मॅकेन्झी यांचा पुढाकार होता. परतवाड्यात इंग्रज सैन्याची छावणी होती. तेथे इंग्रज अधिकारी असत. परतवाडा हे अचलपूरचे उपनगर म्हणावे असे गाव आहे. परंतु तेथील इंग्रज सैन्याच्या छावणीमुळे त्यास काही काळ महत्त्व अधिक लाभले. खुद्द अचलपूरचे वाचनालयही स्थानिक प्रयत्नांतून 1893 मध्ये सुरू झाले...

खुर्चीची चाके आणि मनाचे पंख (Wheels of Chair and Wings of Mind)

कधीतरी, कसलीशी दुखापत होते आणि अनपेक्षितपणे आयुष्याचा सुकाणू पुढच्या दिवसांची वेगळीच दिशा दाखवतो. चालत्या-फिरत्या राजश्री पाटील या तरुण मुलीच्या आयुष्यात एका अपघातामुळे चाकाच्या खुर्चीला खिळून बसण्याचे दिवस आले, तरी मनाच्या पंखांना आकाश दिसत होतेच ! त्या एका बारीकशा धाग्याला घट्ट पकडून त्याचे सक्षम विचारप्रणालीमध्ये रूपांतर करण्याचे, काम करण्याचे धारिष्ट्य आणि धमक या चमक गावातील मुलीत कशी आली असेल? वाचणाऱ्या वाचकांना सकारात्मकतेकडे घेऊन जाणाऱ्या तिच्या कामाची ओळख...

परतवाडा येथील श्री शारदा महिला मंडळ

श्री शारदा मंडळाला पंच्याऐंशी वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. मंडळ माई करकरे आणि त्यांच्या खास जिवलग व जिद्दीने काम करणाऱ्या मैत्रिणी मामी गोरे, बाई नवरे, काकू पराडकर, नमू अभ्यंकर व प्रमिला मुजुमदार- यांच्या प्रयत्नाने व एकीमुळे पुढे आले. त्यांनी शारदेची स्थापना करून कार्यक्रम केले. अचलपूरमध्ये खाजगी मराठी प्राथमिक शाळा नव्हती, म्हणून बालक मंदिर ही शाळा सुरू केली. ती अजूनही चालू आहे...

अचलपूरचे एकशेतीस वर्षांचे वाचनालय (One hundred and thirty year old library of Achalpur)

बाबासाहेब देशमुख यांनी अचलपूर शहरात गेल्या शतकारंभी अनेक संस्था स्थापन केल्या, त्यांतील पहिली ‘सार्वजनिक वाचनालय’ ही होय. त्या संस्थेचा स्थापना दिनांक उपलब्ध नाही. मात्र वाचनालयाच्या सध्याच्या इमारतीची जागा स्थानिक नगरपालिकेने 1893 साली वाचनालयास दिल्याचा उल्लेख आहे. वाचनालयास शहराच्या मध्यभागात प्रशस्त जागा मिळाली, परंतु साजेशी इमारत नव्हती. त्याकरता बाबासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः बरीच वर्षे वाचनालयाचे काम पाहिले...

दर्गा – दुला रहिमानशहा

‘दुला रहिमानशहा’ यांचा दर्गा परतवाड्याहून अचलपूर शहराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर, बिच्छन नदीकाठी आहे. तो गिझनीचा राजपुत्र. मुस्लीम धर्मीय मंडळी दुला रहिमानशहाला मोठा पीर मानतात. त्या ठिकाणी ‘उरूस’ वर्षातून एकदा भरतो. उरूस म्हणजे पवित्र यात्रा. तो उरूस रबीउल अव्वल महिन्याच्या 12 तारखेपासून भरतो आणि सात दिवस चालतो...

पद्मा पिंपळीकर – अचलपुरावरील अमीट ठसा

पद्मा अनंत पिंपळीकर अचलपूरात राहत नाहीत. त्यांनी ते गाव सोडले व त्या लेकाकडे- श्रीरामकडे राहण्यास गेल्या. परंतु त्यांची छाप- त्यांच्या आठवणी अचलपूरच्या विशेषत: पांढरपेशा स्त्रीजीवनावर आहेत. मुख्यत: सुबोध हायस्कूलच्या शिक्षिका म्हणून त्यांच्या विविध आठवणी अचलपूरला आहेत. त्यांनी किती वेगवेगळ्या स्वरूपाची कामे गावात करून ठेवली आहेत !