- पुणे शहर
- हवेली
- खेड
- जुन्नर
- आंबेगाव
- मावळ
- मुळशी
- शिरूर
- पुरंदर
- वेल्हे
- भोर
- बारामती
- इंदापूर
- दौंड
पुणे जिल्यातील तालुक्यांची यादी
सोबतच्या यादीतील तालुक्यावर क्लिक करून त्या तालुक्यातील लेख वाचता येतील.
पुणे जिल्यातील लेख
वसंत जोशीचा मृत्यू – जो आवडे सर्वांना… (Vasant Joshi, Yogic Man Liked by All)
वसंत जोशी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी शांतपणे झोपेत मरण पावला. तो त्या आधी चार दिवस थोडा अस्वस्थ होता. तसे तर, त्याने त्याचे सार्वजनिक कार्य वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी थांबवले होते. वयोमानाने शरीर थकत होते. त्याच्या पत्नीचे, सुनीताचे देहावसान त्या आधी, तीन वर्षांपूर्वी झाले. त्या काळात, त्याला काही व्याधींनी घेरले, विस्मृती जाणवू लागली होती, पण गंभीर असे काही नव्हते. त्यात सोसायटी पुनर्विकासानंतर मिळालेला फ्लॅट मोठा; अपत्याविना जीवन एकाकी होते. त्याचे पुतणे रविंद्र जोशी व सूनबाई अश्विनी यांनी त्याच्या नाश्ता-जेवणाची व्यवस्था केली होती. पुतणी ज्योती पानसे जाऊन-येऊन लक्ष ठेवायची. तो स्वतः उठून शनिवार, रविवार पुतण्या व पुतणीकडे जाई. वसंतचा स्वभाव ‘सोशल’; सर्वांशी मिळूनमिसळून वागण्याचा, हसतमुख राहण्याचा होता. त्याने जीवनाबद्दल तक्रार कधीही, अगदी शेवटच्या काळातही केली नाही. परंतु घरात तो एकटा असे. सोसायटीतील काही परिवारांचा त्याला आधार होता...
विवेकदिशा अभ्यासिका आणि पुढे…
मी माझ्या बारामती तालुक्यातील वाणेवाडी ह्या गावी ‘विवेकदिशा’ ही अभ्यासिका 2021 साली सुरू केली. माझ्या त्या संकल्पाची बीजे माझ्या कॉलेजजीवनात मी जात असलेल्या (2005) पुण्याच्या अभ्यासिकेत रोवली गेली होती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वत:च्या हक्केची शांत जागा अभ्यासासाठी असावी ह्याबाबत समाजमन त्याच काळात संवेदित झाले होते. त्यामुळे मी स्वत: सक्षम झाल्यावर स्वत:च्या गावी होतकरू आणि गरजू मुलांसाठी अभ्यासिका सुरू करावी असे मनोमन ठरवले होते...
द.ब. पारसनीस या इतिहासकाराचा जन्म ! (How the historian named D B Parasnis was...
हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये जी लोकोत्तर स्त्रीरत्ने प्रकाशमान झाली त्या सर्वांमध्ये शेवटचे व शौर्यगुणामध्ये अग्रेसर असे स्त्रीरत्न म्हणजे झाशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब होत. पारसनीस यांनी झाशीच्या राणीसंबंधीची बारीकसारीक माहिती सोन्याच्या खाणीत काम करणारा माणूस क्षणोक्षणी, कणाकणाने सोने टिपतो तशी गोळा केली. ती प्रचंड कष्टाने जमवलेली माहिती त्यांनी कल्पकतेने लिहून काढली. त्या बाबतीत पारसनीस यांना प्रतिभेची भरभरून अशी देणगी मिळाली होती...
ऋतु बरवा : सहा ऋतूंचे सहा सोहळे… ( Rutu Barwa – ...
वातावरणातील ऋतुचक्र सूर्याच्या दक्षिणोत्तर गतीमुळे निर्माण होते. म्हणजे ऋतू सूर्यसंक्रांतीवर अवलंबून असतात. ती वस्तुस्थिती महाभारत काळातदेखील माहीत होती. असे असताना, दुर्गाबाईंनी चांद्रमासांवर आधारित ऋतुचक्र का लिहिले हा मला पडलेला प्रश्न आहे... ऋतुचक्राचा मेळ चैत्र, वैशाख वगैरे चांद्रमासांशी बसत नाही. मी मराठवाड्याच्या रखरखीत पठारावर जन्मलो. अठ्ठावन्न वर्षे तिकडेच काढली. पुण्याला आलो तो येथील झाडांच्या ओढीने. पुणे हे सर्वाधिक वृक्षविविधता असलेले, अतिशय वृक्षसमृद्ध असे शहर आहे हे मला वाचून माहीत होते. येथे सह्याद्री आहे. चार नद्या आणि सात धरणे आहेत...
माझं प्राणिविश्व (My world of Animals)
माणूस ज्या प्राण्यांचा सांभाळ करतो, ज्या पद्धतीने त्यांच्यावर प्रेम करतो, त्याच्या कितीतरी अधिक पटीने ते प्राणी कोणत्याही बंधनांशिवाय माणसावर प्रेम करतात. माणसाच्या सद्भावाचा तो एक विशेष घटक आहे. कुत्रा हा प्राणी त्याच्या स्वतःपेक्षा कित्येक पटींनी त्याची काळजी घेणाऱ्यावर प्रेम करतो. मांजरा-कुत्र्यांच्या माणसाबरोबर असण्याने आपलेपणा, प्रेम, संवेदनशीलता, जिव्हाळा, काळजी या भावना जागृत होतात. पुण्यातील संस्कृत भाषेच्या अभ्यासक सरोजा भाटे यांचा त्यांच्या लहानपणापासून आत्तापर्यंत किती वेगवेगळ्या प्राण्यांशी संबध आला आणि ते त्यांच्या आयुष्यात कसे आपलेसे झाले याबद्दल लिहिलेला हा लेख...
फिटे अंधाराचे जाळे ! – मनोबाधेसाठी एकलव्य (Eklavya vanishes the web of depression !)
माणसांना मन मोकळे करण्याची इच्छा बऱ्याचदा असते, पण त्यांना त्यांचे म्हणणे नीट, शांतपणे ऐकून घेतले जाईल याची खात्री नसते. शिवाय, त्यांना त्यांनी कोणाला काही सांगितले तर ते ‘जज’ करतील, नावे ठेवतील अशी भीतीही वाटते. मी भावना व्यक्त करता न आल्याने कोंडमारा सहन करत जगणारी माणसे आजुबाजूला बघितली होती. त्यामुळे मला मानसिक आरोग्य हा विषय किती गंभीर आहे याची कल्पना होती. म्हणूनच, माझी इच्छा त्या विषयाशी संबंधित क्षेत्रात काम करण्याची होती...
ओतूरची सांदुरी पुरी
पुण्याजवळील ओतूर हे माझे आजोळ. कपर्दिकेश्वराचे मंदिर व संत तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य यांची संजीवन समाधी ही गावाची श्रध्दास्थाने. या दोन्ही मंदिरांना वळसा घालून वाहणारी मांडवी नदी ही ओतूरची जीवनरेखा आहे. पूर्वी उन्हाळ्याच्या सुटीच्या दिवसांत गावी हमखास नात्यात लग्नं असायची. ओतूर भागातील लग्नप्रथा लिहावी तर - महिनाभर आधीपासूनच घरात पाहुणे-रावळे येत. लग्नात सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा घटक म्हणजे लग्नातील रुखवत. त्या साऱ्या पदार्थांमध्ये दर्दी लोकांचे लक्ष मात्र राळ्याचे सारण भरलेल्या पुऱ्यांवर असे...
रावबहाद्दुर कै. सदाशिवभाऊ साठे (Raobahaddur Sadashiv Sathe who made kalyan a modern city)
सदाशिवभाऊ साठे हे स्वकर्तृत्वावर रावबहादूर झाले होते. त्यांनी लिहिलेली रोजनिशी आणि करून घेतलेले वाड्याचे बांधकाम; तसेच, अन्य लग्नकार्य व समारंभ या संबंधात लिहिलेले हिशोब यावरून त्या काळातील जनजीवन आणि महागाई-स्वस्ताई याची नेमकी माहिती मिळते. त्या पार्श्वभूमीवर सदाशिवभाऊ साठे यांचे कार्य आणि कर्तृत्व सहजपणे उठून दिसते...
एक यशोगाथा! (Yasho’s Story)
यशोदा वाकणकर ही स्वतःला असलेल्या व्याधीचे दुष्परिणाम सोसल्यावर एपिलेप्सी रुग्णांच्या बाबतीत मोलाचे, विधायक काम करते आहे. तिने अपस्माराच्या आजारातून बरी झाल्यावर 2004 मध्ये पुण्यात ‘संवेदना फाउंडेशन’ हा एपिलेप्सी सपोर्ट ग्रूप सुरु केला. आनंदी राहण्यासाठी कितीतरी लहान मोठी कारणे असतात. पण कारणाशिवाय आनंदी राहण्याचा एक मोठा धडा स्वानुभवाने ती सोपा करून सांगते. तिचे काम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले आहे...
मराठा घराण्यांची ऐतिहासिक नाणी
इतिहासात अनेक मराठा पराक्रमी घराणी होऊन गेली. मध्ययुगातील इतिहासप्रसिद्ध म्हणजे यादव राजघराणे. ते देवगिरी येथून राज्य करत होते. यादव राजवंशाची नाणी मुख्यतः सोने या धातूमध्ये आढळून येतात. यादवकालीन नाण्यांचे धातूची शुद्धता हे वैशिष्ट्य दिसून येते. त्यांनी चांदी व काही प्रमाणात तांबे या धातूंमध्येही नाणी पाडली...