Home Search

बालकवी - search results

If you're not happy with the results, please do another search
-heading

निसर्गकवी बालकवी (Balkavi)

बालकवी यांची शंभरावी पुण्यतिथी झाली. बालकवींचा मृत्यू तिशीच्या आत झाला. बालकवी यांचे अपघाती निधन 17 एप्रिल 1918 या दिवशी झाले. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या...

कवितेचा जागल्या ! (A Tribute to Dr. M. S. Patil)

1
डॉ. म.सु. पाटील हे 1980 नंतरच्या मराठी समीक्षकांमधले अग्रगण्य नाव. ते समीक्षक असण्याबरोबरच विद्यार्थी प्रिय प्राध्यापक होते. ते मनमाड महाविद्यालयाचे वीस वर्षे प्राचार्य होते. त्यांनी त्या काळात अनेक विद्यार्थी घडवले. ते महाविद्यालय नावारूपाला आणले. त्यांनी मराठी साहित्याच्या नकाशावर अस्तित्वात नसलेल्या मनमाड या गावाला साहित्यिक चळवळीचे केंद्र बनवले. त्यांच्या तिथल्या वास्तव्यात विविध चर्चासत्रे, व्याख्याने, ‘अनुष्टुभ’ सारख्या दर्जेदार मासिकाची चळवळ असे मनमाडचे साहित्यजीवन विविध अंगांनी बहरले. अनेक नामवंत साहित्यिकांचा राबता वाढला. त्यांचे निधन 31 मे 2019 रोजी झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या, ज्येष्ठ कवयित्री, कथाकार, कादंबरीकार नीरजा यांनी त्यांच्याविषयी ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश प्रकाशित करत आहोत...

खळाळता अवखळ झरा आणि इतर कथाः एकनाथ आव्हाड

एकनाथ आव्हाड यांचे ‘खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा’ हे मार्च 2022 मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक म्हणजे मुलांसाठी लिहिलेल्या सोळा कथांचा संग्रह आहे. या कथा ओघवत्या शैलीत, दैनंदिन जीवनातील प्रसंग आणि घटना यांतून फुललेल्या आहेत. शिक्षक-पालक-बालक असे सगळेजण कधी बरोबर, कधी चुकीचे वागतात असे ते सहज सांगतात. काय योग्य- काय अयोग्य हे कथनाच्या ओघात कळून जाते. मात्र त्या कथा उपदेशाचे डोस पाजत नाहीत. त्या सगळ्यांशीच हितगुज करतात. म्हणून त्या शिक्षक-पालक-बालक, तिघांनाही जवळच्या आहेत...

वृत्तबद्ध कविता- स्थिती आणि गती (Poetry Writing in Metre – Present Scenario)

मराठी कवितेच्या सर्वसाधारण वाचकाची अशी समजूत असते की वृत्तबद्ध कविता ही काहीतरी भूतकाळातली गोष्ट आहे. कवितेला वृत्तामध्ये बांधण्यामुळे आशयाला धक्का लागतो किंवा अभिव्यक्तीवर बंधने येतात. वृत्ताविषयी अशीही समजूत असते की व्याकरणाच्या पुस्तकात असतात तेवढीच वृत्ते अस्तित्वात आहेत. प्रत्यक्षात अनेक कवी आजही वृत्तबद्ध कविता लिहितात आणि तीही समर्थपणे लिहितात. नवीन वृत्ते जन्माला येत आहेत. तरुण कवी वृत्तांमध्ये कविता लिहित आहेत...

धरणगाव – बाजार व संस्कृती यांनी उत्सव संपन्न ! (Dharangaon – can culture prevail...

धरणगाव हे शहरवजा गाव जळगाव जिल्ह्याच्या मूळ एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठे गाव होय. ते मोठे असल्यामुळे, खरे तर, धरणगाव हेच तालुक्याचे गाव वाटे. त्याप्रमाणे एरंडोल तालुक्याचे विभाजन 2008 मध्ये होऊन स्वतंत्र धरणगाव तालुका अस्तित्वात आला. धरणगावची नगरपालिका 1867 मध्ये स्थापन झाली होती...

ग.ह. पाटील यांचे कवितेचे सुंदर आकाश …

0
ग.ह. पाटील हे खेड्यातील निसर्ग- वातावरण यांचा दृढ संस्कार असलेले, सश्रद्ध, हळव्या-कोवळ्या मनाचे, जुन्या पिढीतील कवी. कवी, बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ ही त्यांची ओळख. ग.ह. पाटील यांच्यापाशी मन लहान मुलांच्या निरागस वृत्तीशी, कुतूहलाशी, उत्कट-सुंदर भावविभोरतेशी नाते सांगणारे होते...

आख्यान, व्याख्यान, उपाख्यान आणि उखाणा

0
शब्दांचे धागे एकमेकांत गुंतलेले असतात. धाग्यांतील रंग वेगवेगळया भाषांतील असतात. आख्यान, व्याख्यान, उपाख्यान हे शब्द ऐकताना सारखे वाटतात. परंतु, हे वेगवेगळे शब्द आहेत. या शब्दांची निर्मिती कशी झाली असेल? उखान्यांचा नाव घेणे याच्याशी काय संबंध आहे ते शब्दशोधच्या या लेखाद्वारे जाणून घेऊया...

पंचेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-fifth Marathi Literary Meet 1964)

पंचेचाळिसावे मराठी साहित्य संमेलन गोव्यात मडगाव येथे 1964 साली आयोजित करण्यात आले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज होते. त्यांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची लहान बहीण होती. कुसुम ही एकुलती एक बहीण असल्याने शिरवाडकर यांनी कुसुमचे अग्रज अर्थात कुसुमाग्रज हे टोपणनाव धारण केले.

तेहतिसावे मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष यशवंत (Thirty-third Marathi Literary Meet – 1950)

तेहतिसावे मराठी साहित्य संमेलन मुंबई येथे 1950 साली झाले. त्याचे अध्यक्ष यशवंत दिनकर पेंढारकर ऊर्फ राजकवी यशवंत हे होते. कवी यशवंत यांचा हातभार आधुनिक कवितेला उज्ज्वल आणि कीर्तिवंत करण्यात फार मोठा आहे. त्यांनी कवी केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांच्यानंतर मराठी कविता अधिक समृद्ध केली...

तिसावे साहित्य संमेलन (Thirtieth Marathi Literary Meet – 1946)

गजानन त्र्यंबक माडखोलकर हे बेळगाव येथे 1946 साली झालेल्या तिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते कादंबरीकार, निबंधकार, पत्रकार आणि संपादक म्हणून प्रसिद्ध होते. राजकीय कादंबरी ही त्यांची खासीयत.