श्री दत्त मंदिर: अचलपूरचा भुलभुलैया (Shri Datta Temple of Achalpur)
अचलपूर येथील दीडशे वर्षे जुने दत्त मंदिर हे भुलभुलैया मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराला धार्मिकतेबरोबर ऐतिहासिक व प्राचीन महत्त्व आहे. मंदिराचे बांधकाम शेसव्वाशे वर्षांपूर्वीचे असावे...
शिराळशेट (Shiral Sheth – Fictious Character Becomes Part of Folk Festival)
श्रीयाळ शेठ नावाचा अपभ्रंश शिराळ शेट, सक्रोबा, शंकरोबा असा महाराष्ट्राच्या विविध भागांत वेगवेगळा झालेला आढळतो. त्याला औट घटकेचा राजा असेही म्हटले जाते...
पळण (Running away from Village)
मी आईला विचारले, “आय, का आलो आपण इथं?” आईने थोडक्यात उत्तर दिले, “याला पळण म्हणतात.” मी प्रश्न विचारला, “पळण म्हणजे काय?” माझी आई मला माझ्या नावावरून लहानपणी देवके म्हणत असे. ती मला म्हणाली, “अगं देवके, आज आपल्या गावात हिंदू लोकं नवरात्रीच्या टायमाला देवीला बळी देतात. म्हणून आपण इथं आलो.”...
महागाव – रांगोळी कलेचे गाव
कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यामधील ‘महागाव’ला रंगांच्या उधळणीचा, ‘रांगोळींचा वारसा’ लाभला आहे! तोही फार जुना नव्हे, जेमतेम चाळीस वर्षांचा, पण तो मुरला आहे असा, की...
मशिदीसाठी ‘विठ्ठला’चा हातभार!
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्याच्या जकेकूर गावातील मशिदीच्या बांधकामाला चक्क ‘विठ्ठला’चा हातभार लागला आहे! जकेकूरमध्ये सदुसष्ट वर्षीय विठ्ठल पाटील यांच्या पुढाकारातून भव्य मशीद बांधण्यात आली...
विष्णूचे उपासक – वैष्णव संप्रदाय (Vishnu Worshiper – Vaishnava sect)
विष्णू आणि त्याचे राम व कृष्ण हे दोन मुख्य अवतार यांची आराधना करणारा तो वैष्णव संप्रदाय. नारायण-विष्णूमधील नारायण या देवाचा उल्लेख प्रथम ‘शतपथ ब्राह्यण’...
शिदोबाचे नायगाव (Naigaon of Shidoba)
शिदोबाचे नायगाव पुणे शहरापासून साठ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. ते पुरंदर तालुक्यात आहे. ते सासवड-सुपा रोडवर म्हणजेच शहाजीराजे भोसले यांच्या जहागिरीतील गाव. गावाचे पाठीराखे...
साहित्य सहवास व वसईतील सांस्कृतिक वातावरण
फादर दिब्रिटो हे त्र्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा मोठा मननीय योग आहे. त्यामुळे मराठी साहित्याच्या विशालतेची ग्वाही मिळते. फादर स्टीफन्स, ना.वा. टिळक, फादर...
वाघबारस – आदिवासींचे जीवन होते पावन!
दिवाळी सणाची सुरुवात ‘वसुबारस’ या दिवसापासून होते. परंतु आदिवासी भागात दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे ‘वाघबारस’. आदिवासींच्या जीवनात त्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. तो त्यांनी वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा मोठा दिवस असतो. अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात तर ‘वाघबारस’ साजरी करण्याची परंपरा अनोखी आहे. आदिवासी बांधवांनी ती जपलीही नेकीने आहे. अकोले तालुक्यातील अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर वाघोबाची मंदिरे आहेत...
गवाऱ्यांचे गाव, गोरेगाव (Gaware’s Village, Goregaon)
पुणे जिल्ह्याच्या राजगुरूनगर तालुक्यातील गोरेगाव हे माझे गाव. ते तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शंभर टक्के आदिवासी गाव आहे. ‘भीमाशंकर’ हे महादेवाचे मंदिर त्या गावापासून पंचवीस...