_Sangam_Mahuli_1.png

संगम माहुली

1
संगम माहुली या गावी मराठा इतिहासाच्या खुणा आढळतात. ते ठिकाण साताऱ्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. ते कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर असल्यामुळे त्या गावाचे दोन भाग पडतात - अलीकडे 'संगम माहुली' आणि पलीकडे 'क्षेत्र माहुली'. छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधी संगम माहुली येथे नदीच्या काठी आहेत...

बदनापूर तालुका: महाराष्ट्राचा मध्य

बदनापूर हा जालना जिल्ह्यातील एक तालुका. बदनापूर हे जालन्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. जालना जिल्हा मोसंबी फळासाठी राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे बदनापूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे. बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रात कडधान्याच्या वेगवेगळ्या जातींची बियाणी यांबाबत संशोधन चालते. त्या संशोधन केंद्राचे नाव कृषी क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जाते...

मध्ययुगीन इतिहासाची साक्षीदार हातगावची गढी

2
नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील गढी म्हणजे जुन्या जीवन राहणीचा उत्तम नमुना आहे. हातगाव हे नगरपासून पंच्याण्णव आणि शेवगावपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. छगन राजाराम भराट पाटील (साळुंके) यांना 1370 मध्ये हातगाव येथील वतनदारी मिळाली होती...

कथा, सामा वेलादीच्या पराक्रमाची ! (The story of Adiwasi youth who got British Albert...

6
राज्यातील अतिमागास, दुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात ‘जॉर्जपेठा’ व ‘ग्लासफर्डपेठा’ नावाची दोन गावे आहेत. ‘जॉर्जपेठा’ हे नाव ब्रिटिश वन अधिकारी ह्यू शॉ जॉर्ज यांच्या नावावरून पडले आहे. ‘जॉर्ज’ यांच्या जीवनातील ही सत्यकथा रोमहर्षक आणि तितकीच चित्तथरारक आहे. ती 1924 च्या सुमारास, म्हणजे शंभर वर्षांपूर्वी घडली. ती सत्यकथा गडचिरोली (विभाजनपूर्व चांदा) जिल्ह्यातील अतिदुर्गम, घनदाट जंगलातील गर्द, निबिड अरण्यात अशा प्रकारे गुडूप झाली की तिचा पुढे मागमूसही उरला नाही ...

घरातील टाक आणि जानाई- निर्ऋती यांचा अनुबंध (Prayer symbols become history documents)

0
टाक म्हणजे सोने, चांदी, पितळ इत्यादी धातूंची बनवलेली प्रतीके होत. ते पूर्वजांची आठवण म्हणून देवघरात जपले जातात. असे टाक जुन्या घरात व घराण्यांत आढळत असल्याने ते आगळेवेगळे ऐतिहासिक महत्त्वाचे साधन ठरते...
_shahir_lavani

शाहिरी काव्याचा मराठी बाणा (Shahiri Poets)

2
शाहिरी काव्य हे अस्सल मराठी बाण्याचे आहे. ते बहुजनसमाजाचे आवडते काव्य आहे. काही विद्वानांच्या मते, शाहिरी काव्य हाच मराठी काव्याचा प्रभातकाळ होय. शाहिरी काव्याची...

अमरावतीजवळ अश्मयुगीन चित्रगुहा !

0
अश्मयुगीन चित्रगुहा अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी नजीक आढळून आल्या आहेत. हे ठिकाण सातपुड्याच्या पायथ्याशी येते. पुरातत्त्व संस्थांनी त्यांची दखल घेतली आहे. पण तरीही त्या दुर्लक्षित राहिल्या आहेत...
_EtihasikSandarbhacge_Natepute_4.jpg

ऐतिहासिक संदर्भांचे नातेपुते

नातेपुते हे गाव सोलापूर, सातारा व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. पूर्वेला अकलूज, पश्चिमेला फलटण, दक्षिणेला दहिवडी, उत्तर दिशेला बारामती ही सरासरी...

दाभोळ आणि परकीय प्रवासी

‘दाभोळ’ हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील महत्त्वाचे बंदर. त्याचा उत्कर्ष चौदाव्या ते सतराव्या शतकांत झालेला होता. दाभोळ बंदराचा सर्वात प्राचीन उल्लेख सातवाहन काळात एका अनभिज्ञ परकीय प्रवाशाने लिहिलेल्या ‘पेरीप्लस ऑफ इथिरियन सी’ या ग्रंथात सापडतो. दाभोळचा तो उल्लेख ‘पालीपाटमे’ असा आहे. त्याच प्रमाणे जुन्या लिखाणात कोकणातील बंदरांचे संदर्भ सापडतात...

मीर लायक अली फरार ! – सन 1950

4
भारत स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला, तेव्हा हैदराबादच्या निजामाने हैदराबाद संस्थान हे एक स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केले. त्या वेळी मीर लायक अली हा निजामाचा पंतप्रधान होता. भारतात सामील न होण्याचा सल्ला निजामाला देणाऱ्यांमध्ये त्याचे नाव अग्रेसर होते. मीर लायक अली हैदराबाद संस्थानात यशस्वी उद्योगपती होता. भारताने ‘ऑपरेशन पोलो’ या पोलिस कारवाईस आरंभ केल्यानंतर निजामाने राज्यात झालेल्या अत्याचारांची आणि पर्यायी युद्धाची सर्व जबाबदारी मीर लायक अली आणि त्याचे मंत्रिमंडळ यांच्यावर टाकली आणि स्वतः नामानिराळा झाला. भारताने मीर लायक अली याला नजरकैदेत टाकले. परंतु तो नजरकैदेतून पसार 1950 मध्ये झाला...