Home Search

- search results

If you're not happy with the results, please do another search

जनआरोग्य योद्धा – डॉ.अनंत फडके

पुण्याचे डॉ.अनंत फडके म्हणजे एके काळच्या मागोवा गटात सहभाग असलेला, शहादा श्रमिक-संघटनेच्या चळवळीचा पाठीराखा. त्यांनी लोकविज्ञान चळवळ, जनआरोग्य चळवळ यांच्यासाठी आरोग्य व आरोग्य-सेवेसंदर्भात आमूलाग्र सुधारणा करण्याकरता शास्त्रीय भूमिका मांडली. त्यांनी 15 एप्रिल 2025 रोजी वयाच्या पंच्याहत्तरीत पदार्पण केले. सारे जग पैशांच्या मागे धावत असताना डॉ. फडके यांनी स्वत:ला ‘जनआरोग्य चळवळी’त झोकून दिले आहे. त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला नाही. ते ज्या निष्ठेने प्रस्थापित वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींच्या विरुद्ध ठामपणे उभे ठाकले; ते पाहिले, की ते ‘जनआरोग्य योद्धा’ म्हणण्यास खऱ्या अर्थाने पात्र ठरतात...

श्रीदेव केदारलिंग : पाचलचे ग्रामदैवत

केदारलिंग हे पाचलचे ग्रामदैवत. पाचल हे कोकणच्या राजापूर तालुक्यातील गाव. केदारलिंग मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. पाचल गाव कोंड-दिवाळवाडी रस्त्यावर येते. मंदिर रस्त्यालगत दाट वनराईत वसलेले असे आहे -लाकडी, कौलारू आणि टुमदार. मंदिराच्या डाव्या बाजूला ‘ब्राह्मण देवराई’ आणि मागील बाजूला ‘रामेश्वर देवराई’ आहेत. केदारलिंग हे शंकराचे देवस्थान. पण त्या देवळात गाभारा किंवा पिंडी नाही. देवळाला कळस नाही. देवळात पुरातन पाषाणमूर्ती विराजमान आहे. आसनस्थ पाषाण मध्यभागी; केदारलिंग देवाच्या उजव्या बाजूला धनीणबाय, रामेश्वर, कालकादेवी, पावणादेवी, देवाच्या डाव्या बाजूला नवशादेव, ब्राह्मणदेव, ईठलादेवी, नवलादेवी आणि समोर खाली गणपती...

गुडघे गावचा ग्रामोदय

दाभोळच्या खाडीजवळ डोंगरावर वसलेल्या ‘गुडघे’ गावाची कुळकथा इतिहासाशी जोडलेली आहे. दांडेकर हे घराणे मूळ रत्नागिरीजवळील दांडेआडोमचे. त्यांचे मूळ आडनाव पोंक्षे होते. जेथे गूळ तयार होतो ते गुडग्राम, त्याचा अपभ्रंश होऊन गुडघे हे नाव पडले असावे. भूगोलाच्या नकाशावर किंवा इतिहासाच्या पानांवर या गावची नोंद काळाने केली नाही. दांडेकर कुलभूषण दुर्गमहर्षी गोपाल नीलकंठ दांडेकर (गोनीदां) यांनी ‘पडघवली’ या नावाने मराठी माणसाला तो गाव परिचित करून दिला. त्यांच्या ‘पडघवली’, ‘मृण्मयी’, ‘शितू’, ‘काका माणसात येतो’, ‘तांबडफुटी’ या साहित्यकृती त्याच गावातील होत...

बावन्नावे मराठी साहित्य संमेलन (Fifty Second Marathi Literary Meet 1977)

पुणे येथे 1977 साली झालेल्या बावन्नाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते पुरुषोत्तम भास्कर भावे. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1910 रोजी धुळे येथे झाला. भावे हे मराठी नवकथेचे एक जनक मानले जातात. त्यांच्या नावावर सतरा कादंबऱ्या, सव्वीस कथासंग्रह, बारा लेखसंग्रह, आठ नाटके असे साहित्य आहे. त्यांनी इतर साहित्यिक कृतीही लिहिल्या व त्या एकूण साहित्यातून मराठी साहित्य समृद्ध केले आहे. भावे यांना संपन्न घराण्यात जन्मास येऊनही जीवनातील खडतर अनुभव घ्यावे लागले. भावे यांचे संस्कारक्षम बालपण विदर्भात गेले...

सारंगाच्या छायेत

सारंग हे नावच किती मोहक आहे ! जसे नाव तसा राग आहे. त्याचा आवाकाही फार मोठा आहे. ऊन चढल्यावर मध्यान्ह येते; त्या वेळच्या रागांमध्ये सारंगाचा वावर आहे. जेव्हा केवळ ‘सारंग’ असा उल्लेख होतो; तेव्हा त्याचा इशारा हा वृंदावनी सारंग रागाकडे असतो किंवा सारंग या रागांगाकडे असतो. रागांग म्हणजे अशी स्वराकृती की जी सगळ्या सारंग प्रकारांचे ‘सारंग’पण निश्चित करते. अशा एकापेक्षा जास्त स्वराकृतीही असू शकतात. त्या एखाद्या रागाला सारंगाचा प्रकार म्हणता येण्यासाठी कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ, सा रे म प नी, म ऽ रे नि ऽ सा, रेम रेसा निसा इत्यादी. सारंगाच्या विस्तीर्ण परिवारातील मुख्य सारंगांचे तीन प्रकार - वृंदावनी सारंग, शुद्ध सारंग आणि मधमाद सारंग ...

व्ही. शांताराम वेबसाइटचे उद्घाटन

“‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या महाभूषण प्रकल्पात जन्मशताब्दीवीरांच्या वेबसाइट बनत आहेत. त्यातील तीन आधीच प्रसिद्ध झाल्या आहेत. चौथी व्ही. शांताराम यांच्यासंबंधीची वेबसाइट खुली होत आहे. मला फाउंडेशनचे हे कार्य खूप मोठे वाटते. त्यामधून गेल्या शतकातील मराठीजनांचे भाव आणि विचारविश्व प्रकट होणार आहे. फाउंडेशनच्या या कामात मी सहभागी होईनच; परंतु प्रत्येक सुबुद्ध मराठी माणसाने या कामी हातभार लावला पाहिजे.” असे उद्गार ज्येष्ठ चित्रपट व नाट्य अभिनेत्री सुहास जोशी यांनी काढले. त्यांच्या हस्ते ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेश’च्या महाभूषण प्रकल्पातील चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या वेबसाइटचे उद्घाटन ‘क्यू आर’ कोड स्कॅन करून साधण्यात आले...

हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल ! – परिचर्चा

जग अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले आहे. उजवी आणि डावी अशा दोन्ही विचारसरणी कालबाह्य ठरत आहेत. अशा वेळी नव्या सिद्धांताची/इझमची गरज तीव्रतेने जाणवते असे प्रतिपादन लेखक-कवयत्री नीरजा यांनी ‘हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल !’ या परिचर्चेत बोलताना केले. नाटककार सतीश आळेकर यांनी नव्या उमेदीच्या, दिशादर्शक काही चांगल्या कलाकृती घडताना दिसतात असे सोदाहरण सांगितले. ते म्हणाले, की नव्या जगाच्या खुणा अशा नाटकांत व नव्या कवितांत सापडू शकतील. ते दोघे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वार्षिक दिनी योजलेल्या परिचर्चेत बोलत होते. त्यांच्या खेरीज ‘अंतर्नाद’चे (डिजिटल) संपादक अनिल जोशी आणि तरुण कवी आदित्य दवणे यांचा चर्चेत सहभाग होता...

एकावन्नावे साहित्य संमेलन (Fifty First Literary Meet 1975)

कराड येथे 1975 साली भरलेल्या एक्कावन्नाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवत यांना लाभला. दुर्गाबाई लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र व बौद्ध धर्म यांच्या अभ्यासक आणि लेखन-विचार-स्वातंत्र्याच्या झुंजार पुरस्कर्त्या होत्या. त्यांचा जन्म इंदूर येथे झाला. त्यांचे कुटुंब मूळचे पंढरपूरचे. ते नंतर बडोद्याला स्थायिक झाले. त्याकाळी बडोदा हे भारतातील एक संस्थान होते. दुर्गाबाईंचे कुटुंब सुशिक्षित होते. वडील शास्त्रज्ञ होते आणि त्यांची बहीण कमला सोहोनी भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ होत...

सांस्कृतिक जग कोठे हरवले?

महाराष्ट्राचे संस्थाजीवन औपचारिक झाले आहे का? जुन्या संस्थांचे नित्याचे कार्यक्रम नियमित होत असतात. प्रकाशन समारंभांसारखे प्रासंगिक कार्यक्रम मोजक्याच श्रोत्यांच्या उपस्थितीत कौटुंबिक हौस-मौज वाटावी अशा तऱ्हेने घडून जातात. कौतुकाच्या समारंभांत उपचार अधिक असतो आणि वाद-टीका, उलटसुलट वार-प्रतिवार असे काहीच सार्वजनिक जीवनात घडताना दिसत नाही. माणसा माणसांतील स्नेह, जिव्हाळा ओलाव्याने व्यक्त होतानाही जाणवत नाही. ज्या बातम्या समोर येतात त्या अत्याचारादी विकृतीच्या आणि राजकारणातील गुन्हेगारीच्या. त्यांतील कट-कारस्थाने पाहिली की दीपक करंजीकरांच्या कादंबऱ्यांची आठवण येते. समाजातील चैतन्य हरपले कोठे आहे?

व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन चा सद्भावना दिवस

‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे सद्भावना दिवस दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस साजरा केला जातो. यावर्षी देखील फाउंडेशनच्या संस्कृतिकारणाच्या उद्देशाला धरून परिसंवाद-मुलाखती असे कार्यक्रम शनिवार, 22 मार्च 2025 ला योजले आहेत. त्यात सतीश आळेकर, नीरजा, ‘अंतर्नाद’चे संपादक अनिल जोशी, मिलिंद बल्लाळ, कवी आदित्य दवणे अशा मान्यवरांचा समावेश आहे. तेवढ्याच महत्त्वाची आणखीही एक गोष्ट त्या मुहूर्तावर साधत आहोत. ती म्हणजे गिरीश घाटे रचित व्ही. शांताराम यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन. ते नाट्य व चित्रपट अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते होणार आहे. किरण शांताराम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत...