Home Tags आळंदी

Tag: आळंदी

साने गुरुजींचा पंढरपूर मंदिरप्रवेश सत्याग्रह

पंढरपूरची वारी पुण्याजवळच्या देहू-आळंदीपासून सुरू होते. महाराष्ट्राच्या गावागावांतून दिंड्या निघालेल्या असतातच. लक्षावधी वारकरी वीस दिवस चालत असतात. वारीची सांगता एकादशीला पंढरपूर तीर्थक्षेत्री होते. डोळ्यांत भक्ती आणि मुखावर हरिनाम जपणारे हे वारकरी, समाजातील एकतेचे जिवंत चित्र उभे करतात. त्यामुळे वारी केवळ धार्मिक यात्रा राहत नाही; ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक होते. मात्र लक्षात घेतले पाहिजे, की हाच सोहळा कधी काळी समाजाच्या एका मोठ्या वर्गासाठी क्लेशदायक होता. अनेक दिवस चालून आलेल्यांपैकी काही वंचितांना गाभाऱ्यात जाऊन पांडुरंगाचे दर्शन न घेताच परत फिरावे लागे. त्या अन्यायाला वाचा फोडली ती साने गुरुजी यांनी...

खोंगा खोंगा साखर

आई-मुलीचे शब्दांची गरज न भासता, एकमेकींना समजण्याचे अनुभव तसे वैश्विकच. वत्सलाबाई बापुराव भोंग यांनी आईबद्दलच्या आठवणी गप्पांतून सांगितल्या आहेत. सोप्या शब्दांतून, प्रामाणिक संवादातून त्यांच्या नात्यांमधले उमाळे, कढ, आपुलकी आणि स्नेह व्यक्त होतोय. नात्यातला ओलावा टिकवून धरणाऱ्या गोष्टींची अनुकरणीय जाणीव हा लेख वाचणाऱ्या सगळ्यांना झाल्यावाचून राहणार नाही...

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

0
मराठी संस्कृतीचा झळाळता प्रासाद राजकारण, समाजकारण, नाटक, वक्तृत्व आणि पत्रकारिता या पाच प्रमुख स्तंभांवर तोललेला आहे. महाराष्ट्रात कर्तृत्वसंपन्न व्यक्ती त्या एकेका क्षेत्रात होऊन गेलेल्या आहेत. पण एकाच व्यक्तीच्या अंगी हे सारे पैलू असलेली प्रतिभावान व्यक्ती म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे ...

आधुनिक विज्ञानयुगात वारीचे औचित्य

0
पंढरीची वारी ही भागवत धर्माची जगातील एकमेवाद्वितीय परंपरा. ती आठशे वर्षांपासून नुसती टिकूनच राहिलेली नाही तर वृद्धिंगत होत आहे. वारी सर्वसमावेशक असल्याने तिचे औचित्य आधुनिक विज्ञानयुगातही आहे. कर्म, ज्ञान, भक्ती यांचा यथायोग्य मेळ आणि व्यवस्थापन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पंढरीची वारी. परम संगणककार विजय भटकर यांनी विज्ञान व आध्यात्म यांचा पायाच मुळात श्रद्धा आहे, ती अंध असू शकत नाही असे सांगून, त्यांची परस्पर पूरकता लेखाद्वारे उलगडून दाखवली आहे...

घुमान – नामदेवांचे तीर्थक्षेत्र (Saint Namdev in Punjab)

पंजाबमधील घुमान ही संतशिरोमणी नामदेव महाराजांची कर्मभूमी. नामदेवांनी घुमान हे गाव वसवले. तेथे तब्बल चोवीस वर्षे तपश्चर्या केली. तो परिसर त्यांच्या वास्तव्याने आणि तपाचरणाने पावन झाला. घुमान हे गाव संत नामदेवांचे गाव म्हणून ओळखले जाते...

दहावे साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1917)

इंदूर येथे भरलेल्या दहाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गणेश जनार्दन आगाशे हे व्युत्पन्न पंडित होते. त्यांचे प्रभुत्व मराठी, इंग्रजी आणि संस्कृत ह्या तिन्ही भाषांवर होते. त्यांनी त्या तिन्ही भाषांमध्ये कविता लिहिल्या होत्या...
-heading-shiramamndir-tulshibaug

पुणे येथील तुळशीबाग श्रीराम मंदिर (Tulshibaug Shreeram Mandir)

नारो आप्पाजी तुळशीबागवाले हे पेशवाईतील नामांकित व कर्तबगार अधिकारी होते. त्यांनी राज्यव्यवस्था सांभाळण्याबरोबर सार्वजनिक व लोकोपयोगी कामे केली. त्यांनी देवालये बांधणे, नदीला बंधारा घालून...