Home Search

जळगाव - search results

If you're not happy with the results, please do another search

Map Jalgaon

सोबतच्या यादीतील तालुक्यावर क्लिक करून त्या तालुक्यातील लेख वाचता येतील. जळगाव जामनेर एरंडोल धरणगाव भुसावळ रावेर मुक्ताईनगर बोदवड यावल अमळनेर पारोळा चोपडा पाचोरा भडगाव ...

संवेदनेची विधायकता – वय कोवळे उन्हाचे (Ashok Limbekar’s new book is nostaljic about childhood...

अशोक लिंबेकर यांचे लेखन व्यापकत्व धारण करत आहे. त्याची झलक त्यांच्या ‘वय कोवळे उन्हाचे' या ललित लेखसंग्रहातून पाहण्यास मिळते. ते मलपृष्ठावर लिहितात, लहान मुलाच्या निरागस डोळ्यांनी पाहिलेले ते गाव, रान-शिवार, निसर्ग आणि त्यातील अनेक घटक हा या लेखांचा विषय आहे...

स्थलांतरित मुलांचे शिक्षण – दौंडचा अनुभव (Education of Migrant Children -Daund’s Experience)

शालेय मुलांचे ऑनलाईन शिक्षण लॉकडाऊनमुळे 2020 मध्ये सुरू झाले, परंतु स्थलांतरित मुलांच्या शिक्षणाची मोठी अडचण निर्माण झाली. तशा मुलांच्या अनेक झोपड्या नांदूर गावात कोरोनाच्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने जुलै 2020 महिन्यात दिसून आल्या. परंतु ऊसतोडीला पालकांबरोबर दिवसभर गेलेली ती मुले संध्याकाळीच माघारी येत. त्यांचे सर्वेक्षण करणे कठीण होते...

बाविसावे साहित्य संमेलन (Twenty Second Marathi Literary Meet – 1936)

जळगाव येथे भरलेल्या बाविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन होते. माधव ज्यूलियन आधुनिक उत्तम कवी, छंदोशास्त्राचे अभ्यासक, फार्शीभाषेचे उत्तम जाणकार, भाषाशुद्धीला स्वत:चे आयुष्य अर्पण करणारे, फार्शी-मराठी कोशाचे जनक होते.

चौदावे साहित्य संमेलन (Fourteenth Marathi Literary Meet 1928)

ग्वाल्हेर येथे भरलेल्या चौदाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते लोकनायक माधव श्रीहरी ऊर्फ बापूजी अणे. त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारताचार्य चिंतामणराव वैद्य हे स्वत: पुणे येथे 1908 साली भरलेल्या सहाव्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. माधव श्रीहरी अणे यांनी विशेष कोठल्याही प्रकारचे लेखन केलेले नाही.

तेरावे साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1927)

तेराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. ते मराठीतील विनोदी वाङ्मयाचे आद्यप्रवर्तक होत. ‘सुदाम्याचे पोहे’हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह म्हणजे मराठी वाङ्मयाचे भूषण मानले जाते. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता.

पारोळा – झाशीच्या राणीचे गाव (Parola – A town with history and Mythology)

पारोळा हे ‘मेरी झांसी नही दुंगी’ असे बाणेदार उद्गार काढणारी मर्दानी झाशीची राणी यांचे माहेर. तांबे हे त्यांचे माहेरचे आडनाव. त्यांचे वंशज पारोळ्यात राहत आहेत. कंगना राणावतने रंगवलेल्या ‘मणिकर्णिका' चित्रपटातील झाशीच्या राणीच्या तडाखेबंद भूमिकेने केवळ एकोणतीस वर्षे आयुष्य लाभलेल्या त्या मर्दानीचा इतिहास पुन्हा जगासमोर आला...

सातवे साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर पोचले! (Seventh Marathi Literary Meet – 1909)

पहिली सहा मराठी साहित्य संमेलने पुण्यात भरली होती. तिसरे साहित्य संमेलन मात्र साताऱ्यात 1905 साली झाले, तो अपवाद होता. सातवे साहित्य संमेलन प्रथमच महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यात आले!

तालुक्या तालुक्यांतील नवजागरण! (Renaissance like movement in the villages of Maharashtra)

महाराष्ट्र हा प्रदेशच कर्तृत्वाचा आहे हे गेल्या आठशे-हजार वर्षांचा इतिहास सांगतो. त्याचे कारण महाराष्ट्र हा प्रदेश संमिश्रतेचा आहे – संकराचा आहे; देश-परदेशांतून आलेल्या स्थलांतरितांचा आहे. तो महानुभावांचा आहे, ज्ञानेश्वरांचा आहे, शिवाजीमहाराजांचा आहे...

कान्होळा नदी : गावाचे वैभव हरपले! (Plight Of Kanhola River)

प्रत्येक व्यक्तीची तिच्या गावची नदी ही मोठी आठवण असते. भले ती नदी छोटी असो नाही तर मोठी, आटलेली असो अगर वाहणारी; नदी असणारी गावे किती सुंदर आणि किती भाग्यवान!