बीड जिल्यातील तालुक्यांची यादी

सोबतच्या यादीतील तालुक्यावर क्लिक करून त्या तालुक्यातील लेख वाचता येतील.

  • बीड
  • आष्टी
  • पाटोदा
  • शिरूर
  • गेवराई
  • माजलगाव
  • वडवणी
  • केज
  • धारूर
  • परळी-वैद्यनाथ
  • अंबाजोगाई

बीड जिल्यातील लेख

जालन्याचे हुतात्मा – जनार्दनमामा (Janardanmama- Brave Marathawada revolutionary)

0
ब्रिटिश भारतातून 15 ऑगस्ट 1947 रोजी परतल्यानंतर, निजामाने स्वतंत्र हैदराबाद राज्याची घोषणा केली. धर्मांध कासीम रिझवी यांच्या रझाकार संघटनेने हैदराबाद राज्यातील हिंदू आणि धर्मनिरपेक्ष मुसलमान यांच्यावर अमानुष अत्याचाराचे सत्र सुरू केले. उलट, संस्थानातील जनतेने भारतात विलीन होण्यासाठी लढा उभारला. लोक त्या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्वातंत्र्यवीरांनी रझाकारांच्या अत्याचारांचा प्रतिकार केला आणि त्यात त्यांच्या प्राणाची आहुती दिली...

श्रीयोगेश्वरी (अंबाजोगाई) : योगमार्गातील शक्तिपीठ

अंबाजोगाईची श्री योगेश्वरी ही महाराष्ट्रीय देवी भक्तांची श्रद्धेय देवता आहे. ती बहुसंख्य चित्पावन घराण्यांची कुलस्वामिनी कुलदेवताही आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे स्थान महाराष्ट्रात तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. ते अनेक संतांचे वसतिस्थान आहे. देवीची स्थापना दहाव्या-अकराव्या शतकाच्या दरम्यान झाली असावी असे गावात असलेल्या सात शिलालेखांवरून समजते. योगेश्वरीचे मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराची रचना हेमाडपंथी आहे...

आबासाहेब काकडे – झुंजार लोकनेते

आबासाहेब काकडे हे नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील मोठे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या जीवनात गेल्या शतकातील सर्व प्रभाव यथार्थ जाणवून जातात हे विशेष होय. त्यांच्या घराण्याचा इतिहास शिवकाळापर्यंत मागे जातो. त्या मंडळींना परिस्थितीवश बीड जिल्ह्यातून स्थलांतर करावे लागले. ब्रिटिश काळातील घराण्याचा आब, त्याबरोबर देश स्वातंत्र्याची आस, शिक्षणाची ओढ आणि घरातून व आधुनिक शिक्षणातून लाभलेले संस्कार - त्यातून उभी राहिलेली आंदोलने व घडलेले शिक्षण प्रसारासारखे विधायक काम... आबासाहेबांचे आयुष्य अनेकविध घटनांनी भरलेले आहे...

आबासाहेब काकडे : प्रेरणा कोल्हापूरची (Abasaheb Kakade : Inspiration from social movements in Kolhapur)

‘काकडे’ घराण्याची झुंजार परंपरा सतत चारशे वर्षे जपली गेली आहे. घराण्याचा आधुनिक काळातील इतिहास सुरू होतो एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस कान्होजी महादजी काकडे यांच्यापासून. कान्होजी आणि लक्ष्मीबाई यांना पाचव्यांदा मुलगा झाला तो जगन्नाथ म्हणजेच आबासाहेब. आबासाहेबांच्या विचारांची आणि सामाजिक व राजकीय कार्याची जडणघडण कोल्हापूर संस्थानामधील घटनाक्रमांतून होत गेली. आबासाहेब कोल्हापूरवरून नगर जिल्ह्यात- स्वमुलखात नुसतेच मल्लविद्या घेऊन परतले नाहीत तर मानवतावादी विचार घेऊन आले...

ऊसतोड कामगार आणि त्यांची गाथा

4
राज्याच्या सोळा जिल्ह्यांत बावन्न तालुके ऊसतोड व्यवसायात आहेत. ऊसशेती गेल्या सत्तर वर्षांत महाराष्ट्रात बहरली, त्यासोबत साखर कारखाने निघाले. शेतांतील ऊस तोडून त्या कारखान्यांना पुरवणारा ऊसतोड कामगार म्हणजे स्थलांतरित मजुरांचा एक मोठा समुदाय. मात्र तो समुदाय म्हणजे असे मजूर की जे जी जागा मिळेल, जसे खाणेपिणे असेल, जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीत राहतात. त्यांचा स्वत:चा पसारा असा काहीच नसतो, पण जो आहे त्यावर त्यांना ऊसतोडणीच्या हंगामाचे पाच-सहा महिने काढायचे असतात. त्यांच्या अडचणी मात्र सुटताना दिसत नाहीत...

वटवाघळांचे डॉक्टर – महेश गायकवाड

डॉ. महेश गायकवाड हा एक झपाटलेला तरुण ! त्या अवलियाने भीतीचा आणि अंधश्रद्धेचा विषय असलेल्या वटवाघळांवर पीएच डी केली आणि निसर्गात राहून निसर्गाशी संवाद साधला. तो निसर्ग संवाद लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत. लोक त्यांना ‘वटवाघळांचे डॉक्टर’ म्हणून ओळखतात...

बालंबिका देवीचे बालमटाकळी

0
बालमटाकळी हे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व टोकाला वसलेले जुने गाव. त्या गावाला पूर्वी टाकळी किंवा बोधेगाव-टाकळी असे म्हटले जात असे. त्या शेजारीच बोधेगाव आहे. त्या गावाचे हे जोडगाव गणले जाई. गावाचे ग्रामदैवत बालंबिका देवी. तिच्या नावावरून त्या गावाला बालमटाकळी म्हणू लागले...

महालक्ष्मी मंदिर कांबीचे (Mahalakshmi Temple at Kambi)

कांबी गावचे महालक्ष्मी मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. गाभाऱ्यात छतावर कोरलेली महालक्ष्मीची मूर्ती हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य. महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या अंबाबाईनंतर कांबीच्या महालक्ष्मीची महती सांगितली जाते…

स्थलांतर ऊर्फ घरवापसी! एक टर्निंग पॉइंट (Migration can be a Turning Point)

कोरोना व्हायरसमुळे लोकांची घरवापसी/स्थलांतर मोठ्या प्रमाणावार होत आहे. तो फार मोठा प्रश्न होणार आहे. मी त्या प्रश्नाकडे एक संधी म्हणून पाहत आहे. त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. वास्तवात इट्स रिस्टोरेशन इन रिअॅलिटी. मला मराठवाड्याच्या परभणी, उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यांची माहिती आहे. 

ऊसतोडणी कामगार महिलांची गर्भाशये का काढली जातात?

4
बीड जिल्ह्यातील अनेक ऊसतोडणी कामगार महिलांना गर्भाशये का नाहीत? अशा मथळ्याखाली चेन्नईच्या ‘The Hindu’ या वृत्तपत्रात एक वृत्तांत प्रसिद्ध झाला. त्याचा सारांश असा: मराठवाड्यातील दुष्काळी...