शंकराचार्यांचा विवेकचूडामणि ग्रंथ
शंकराचार्य हे भारतीय संस्कृतीतील धर्मविचारांचे आद्यगुरू. शिवगुरु भट्ट व आर्याम्बा यांच्या पोटी शंकराचा प्रसाद म्हणून त्यांचा जन्म झाल्याची भावना मनी बाळगून त्यांचे नाव शंकर असे ठेवण्यात आले. शंकर मेधावी होते. ते प्रकांडपंडित म्हणून वयाच्या सहाव्या वर्षीच ओळखले जाऊ लागले. त्यांना वयाच्या आठव्या वर्षी गुरू गोविंदांकडून संन्यास प्राप्त झाला. त्यांना आयुष्य केवळ बत्तीस वर्षांचे लाभले. त्यांनी जवळपास चाळीस ग्रंथांची निर्मिती केली आहे...
सिनेमातील (सुमित्रा) भावे-प्रयोग
सुमित्रा भावे यांचा सिनेमा पहिल्यांदा पाहताना तो जितका आकळतो, भावतो आणि आवडतो त्याहून तो सिनेमा दुसऱ्यांदा पाहताना होणारे आकलन अधिक खोल असते. सुमित्रा भावे यांच्या बरोबर सुनील सुकथनकर हे दिग्दर्शक म्हणून असतच. त्या जोडीने पूर्ण लांबीचे सतरा सिनेमे, लघुपट सत्तरच्या आसपास आणि दूरदर्शन मालिका पाच दिग्दर्शित केल्या आहेत...
पाखरा – जव्हार पाड्याच्या मुलांचे पुस्तक !
पालघर जिल्ह्याच्या जव्हार पाडा भागातील मुलांनी पक्ष्यांविषयी लिहिले, त्यांना दिसणाऱ्या पक्ष्यांविषयी तेच ‘पाखरां’ नावाच्या पुस्तकात छापले गेले आहे. त्यांची निरीक्षणे संशोधनातून मांडलेल्या पक्षीपुस्तकापेक्षा कमी नाहीत...
निसर्गरम्य बेलकुंड – वनविश्रामगृहांचे सौंदर्य
मेळघाट सुंदर सुंदर वनविश्रामगृहांनी भरलेले आहे. रायपूर, चौराकुंड, रंगूबेली, कोकटू ... ही सर्व वनविश्रामगृहे इंग्रजांनी वनसंपत्तीच्या प्रशासनासाठी बांधली. त्यांतील विलायती झाक मोहक वाटते. त्या सगळ्यांत आगळेवेगळे दिसणारे विश्रामगृह म्हणजे बेलकुंडचे ! बेलकुंडच्या निसर्गरम्य परिसरातील पर्यटन म्हणजे साहसी आव्हानांचा एक रसरशीत अनुभव...
शेवगाव पक्षी निरीक्षणातील कॅमेऱ्यात मगरीचे शेपूट
पैठणचे जायकवाडी धरण शेवगावपासून (नगर जिल्हा) अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आहे. तेथे हजारो स्थलांतरित पक्षी दरवर्षी येत असतात. म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी आवश्यक ती भौगोलिक परिस्थिती शेवगावापासून हाकेच्या अंतरावर तयार झाली आहे. तिचा लाभ सभोवतालच्या खेड्या-शहरांतील लोक आनंदाने घेत असतात. खरे तर, नाथसागर जलाशयाचा सर्व भाग हा पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे...
कासव संशोधनातील नवे युग ! (New Era of Turtle Research)
कासव संशोधनाला नवी दिशा देणारा एक प्रयोग 25 जानेवारी 2022 रोजी कोकणात करण्यात आला. तो म्हणजे कासवांनी घरटी तयार केल्यावर त्यांना उपग्रह टॅगिंग करण्याचा ! त्या दिवशी, प्रथमच भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वेळास येथे प्रथमा नावाच्या कासवाला व दापोलीतील अंजर्ले येथे सावनी नावाच्या कासवाला उपग्रह टॅगिंग करण्यात आले...
भीतीचे/धास्तीचे ग्रहण सुटत आहे !
सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हा पृथ्वी-चंद्र-सूर्य यांच्या अवकाशातील स्थानांमुळे होणारा वैश्विक खेळ आहे. निसर्गनिर्मित असलेला हा खेळ मनुष्यवस्ती पृथ्वीवर येण्याआधीपासून अव्याहत सुरू आहे. सूर्यग्रहणाने ‘दृष्टी’ वैज्ञानिक केली आणि समाजातही वैज्ञानिक जाणिवा मंदगतीने का होईना पण जागृत होत जातील असा विश्वास वाटतो...
बाबांचे सहज काढलेले छायाचित्र अधिकृत ठरले!
अंगावर चिंध्यांचा वेष, डोक्यावर खापर, कानात डूल, हातात काठी असे ते छायाचित्र सर्वात अविस्मरणीय ठरले! गाडगेबाबांचे सहज काढलेले ते छायाचित्र इतके प्रसिद्ध झाले, की त्याचा वापर गाडगेबाबांचे अधिकृत छायाचित्र म्हणून सर्वत्र सुरू झाला...
सच्चा दुर्गमित्र अजय गाडगीळ !
अजय गाडगीळ यांच्याकडे गीर्यारोहण क्षेत्रातील एक उगवता तारा म्हणून पाहिले जाते. सह्याद्री पालथा घालणारा हा मावळा गिर्यारोहण, गड-किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन, निसर्गरक्षण आणि आपत्कालीन बचावकार्य यालाच ध्येय मानून त्या दिशेने यशस्वी घोडदौड करत आहे...
पुण्यातील बाटल्यांचा बंगला
राजेंद्र इनामदार लोकांनी इकडे-तिकडे भिरकावून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या पाहिल्या की अस्वस्थ होत. मग त्यांनी त्या पोत्यात भरून गोळा करण्यास सुरुवात केली. दगडाचे चूर्ण, पाणी आणि फक्त सहा-सात टक्के सिमेंट यांचे पातळ मिश्रण त्या बाटल्यांत भरून साकारलेला त्यांचा बाटल्यांचा बंगला. या ‘बाटल्यांच्या बंगल्या’साठी त्यांनी आजपर्यंत ऐंशी हजार बाटल्या गोळा केल्या आहेत. त्या बाटल्यांची शक्ती किती दाबाने तुटू शकते ती क्षमता (क्रशिंग स्ट्रेंग्थ) तपासून पाहिली असता ती नेहमीच्या विटांच्या अडीच ते तीन पट जास्त भरली. यामुळे त्यांचा प्रयोगाचा उत्साह त्या ‘स्ट्रेंग्थ’च्या दुपटीने वाढला !