वृद्धाश्रमी… – स्वाभाविक, अपरिहार्य जीवनावस्था
माणसे वृद्धत्वाकडे सरकू लागतात तेव्हा त्यांना अनेक धक्के बसू लागतात. आयुष्याच्या संध्याकाळी अधिक भय वाटते ते मृत्यूचे आणि परावलंबित्वाचे. वार्धक्य म्हणजे दुसरे बालपण. शरीराच्या अवयवांची शक्ती मंदावत जाते, रिकामपण खाण्यास उठते. त्यातून नैराश्य येऊ लागते. व्यक्तीचे सामाजिक व कौटुंबिक जीवन हेदेखील सामूहिक न राहता वैयक्तिक बनले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य दीनवाणे झाले आहे. पण वृद्धत्व हे स्वाभाविक आणि अपरिहार्य आहे. त्यामुळे ते तशाच पूर्वतयारीने स्वीकारले पाहिजे. ही तयारी मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर असते. शारीरिक हालचाली मंदावत जात असतात. त्यासाठी आवश्यक तो व्यायाम, आहार आणि औषधे घ्यावी लागतात; तर मानसिक पातळीवर वृद्धांना सहवास आणि प्रेम यांची गरज असते...
विवेकचूडामणि – मराठी अनुवाद घडला हे खरे !
मी कवी किंवा साहित्यिक म्हणून आद्य शंकराचार्य यांच्या वाङ्मयाशी जोडला जावा असे ‘पुण्य’ घडल्याचे आठवत नाही. पण खरोखरीच, आले देवाजीच्या मना... तसे घडले आणि माझ्या हातून ‘विवेकचुडामणि’ या महान संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद होऊन गेला ! एकदा गंमत घडली ! माझी गजल ‘दैनिक सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली. ती वाचून गझल गायक भीमराव पांचाळे यांनी लिहिले, की ती कविता ‘व्योमगंगा वृत्ता’त आहे. तोपर्यंत त्या नावाचे वृत्त आहे, हे माझ्या गावीही नव्हते ...
दिन दिन दिवाळी: गाई-म्हशींचाही सण! (Diwali in Chaugaon Village in Old Days)
दिवाळीच्या दिवसांत, गाई-म्हशींना ओवाळण्याची पद्धत आमच्या चौगांवमधे माझ्या लहानपणी होती आणि मी स्वतः काही वर्षे गाई–म्हशींना ओवाळण्याचे काम केले आहे. #चौगाव हे धुळे जिल्ह्यात त्याच नावाच्या तालुक्यात आहे. माळी समाज हा इतर समाजांपेक्षा जास्त पुढारलेला समजला जाई. दूध देणारे पशू हे आमच्या समाजासाठी देव होत. म्हणून गाईगुरांना विशेष मान आमच्या गावात दिवाळीच्या सणाला असायचा. दिवाळी हा जसा भाऊबहिणीचा सण असतो तसा तो आमच्या गावात गाई-म्हशींचापण सण असायचा...
सचिन भगत – शेतकऱ्याचे चित्त नाण्यांच्या नवीनतेत ! (A farmer with a heart for...
फलटणच्या शिंदेवाडीचे सचिन भगत कसतात शेती. पण त्यांची एक बारीक नजर असते ती त्यांच्या नाणेसंग्रहावर ! मगध-देवगिरी-यादव-मोगल अशी, विविध साम्राज्यांची आणि विविध काळांची नाणी त्यांच्या संग्रही आहेत. त्यातील एक विभाग अर्थातच शिवराई नाण्यांचा - त्याबद्दल बोलताना सचिन भावुक होतात आणि क्षणात त्यांचे बोलणे मराठेशाहीबद्दलच्या अभिमानाने भरले जाते...
वामन पंडितांची कोरेगावची समाधी (Marathi Poet Vaman Pandit of Seventeenth Century)
वामन पंडित यांची ख्याती श्लोकांबद्दल विशेष आहे. त्यांची ‘सुश्लोक वामनाचा’ अशी प्रसिद्धी आहे. यमक, अनुप्रास, स्वभावोक्ती हे त्यांचे आवडते अलंकार होते. त्यांनी त्यांचा हव्यास अधिक केल्याने त्यांना ‘यमक्या-वामन’ असेही म्हणत...
शंकराचार्यांचा विवेकचूडामणि ग्रंथ
शंकराचार्य हे भारतीय संस्कृतीतील धर्मविचारांचे आद्यगुरू. शिवगुरु भट्ट व आर्याम्बा यांच्या पोटी शंकराचा प्रसाद म्हणून त्यांचा जन्म झाल्याची भावना मनी बाळगून त्यांचे नाव शंकर असे ठेवण्यात आले. शंकर मेधावी होते. ते प्रकांडपंडित म्हणून वयाच्या सहाव्या वर्षीच ओळखले जाऊ लागले. त्यांना वयाच्या आठव्या वर्षी गुरू गोविंदांकडून संन्यास प्राप्त झाला. त्यांना आयुष्य केवळ बत्तीस वर्षांचे लाभले. त्यांनी जवळपास चाळीस ग्रंथांची निर्मिती केली आहे...
वीतभर कपडा टीचभर पोट – वास्तव, झाडीपट्टी रंगभूमीचे ! (Experiences of Zadipatti stage by...
‘झाडीपट्टी रंगभूमी’ नावाची एक अनोखी रंगभूमी आहे असे ऐकले होते- वाचलेही होते. त्यामुळे उत्सुकता होती, की ती रंगभूमी कशी आहे ते बघावे. कारण प्रायोगिक रंगभूमी, हौशी रंगभूमी, समांतर रंगभूमी, बाल रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी हे प्रकार मला माहीत होते.
पोस्टर व बॅनर चित्रकला लोपली !
घराणी सिनेमाक्षेत्रात अनेक होऊन गेली; अजूनही आहेत. सिनेमाची निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय ही क्षेत्रे कमीजास्त ग्लॅमरची; लोकांच्या मनी आकर्षण असलेली. परंतु त्या कलावंतांची तशी प्रसिद्धी करणारे जे चित्र कलाकार पडद्यामागे काम करतात ते मात्र दुर्लक्षित राहतात, उपेक्षित असतात. चित्रपटनिर्मितीचे श्रेय दादासाहेब फाळके यांचे. पण चित्रपटाला वास्तववादी चौकट दिली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी. पोस्टर व बॅनर चित्रकलेतील 1924 ते 1989 ही पासष्ट वर्षे म्हणजे रंगरेषांचा ‘महायज्ञ’च होता. तो 1990 नंतर निवांत झाला, असे वर्णन चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी सुबोध गुरुजी यांनी संकलित केलेल्या ‘पाऊलखुणा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केले आहे. सुबोध गुरुजी यांनी स्वत: त्यास ‘मानवी स्पर्श संपला’ असे समर्पक रीत्या म्हटले आहे...
सच्चा दुर्गमित्र अजय गाडगीळ !
अजय गाडगीळ यांच्याकडे गीर्यारोहण क्षेत्रातील एक उगवता तारा म्हणून पाहिले जाते. सह्याद्री पालथा घालणारा हा मावळा गिर्यारोहण, गड-किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन, निसर्गरक्षण आणि आपत्कालीन बचावकार्य यालाच ध्येय मानून त्या दिशेने यशस्वी घोडदौड करत आहे...
आमचा रोड
एखाद्या मित्राच्या सहवासात आश्वस्त वाटते, तसे त्या रोडवर वाटते. निसर्गाच्या सर्व ऋतूंचे दर्शन तेथे होते. त्याच्याशी होणाऱ्या हितगुजाने मनातील किल्मिषे निघून जातात व मन स्वच्छ, मोकळे आणि प्रसन्नतेने भरून जाते. शिवतर नावाच्या गावी जाणारा तो रोड अनेक मौजेच्या गोष्टींचा साक्षीदार आहे...