आनंदयात्री चकोर
माणसाच्या चित्तवृती चांगली कलाकृती वाचल्यावर स्थिरावतात. मनाला प्रसन्नता येते. अंत:करणातील सत्प्रवृत्तींना पालवी फुटू लागते. वृत्ती अंतर्मुख परंतु आशायुक्त बनते. माणसाला या जाणिवांपासून आनंद मिळतो....
अरुणा ढेरे यांचे चुकले काय?
झकास जमत आलेले साहित्य संमेलन अभिजात परंपरेत पार पडणार असे वाटत असताना शेवटच्या आठवड्यात बिनसले. राज ठाकरे यांच्या नकळत त्यांच्या चेल्याने ठिणगी टाकली आणि...
स्त्रीपुरूष तुलना – काल आणि आज (Comparing Men and Women – Yesteryears...
ताराबाई शिंदे यांचा ‘स्त्रीपुरूष तुलना’ हा निबंध सन 1882 मध्ये प्रकाशित झाला. एका विधवा स्त्रीने केलेल्या भ्रूणहत्येमुळे खवळून उठलेल्या आणि त्या स्त्रीला धारेवर धरणाऱ्या समाजावर धारदार लेखणीने ताराबाईंनी या निबंधात अक्षरश: कोरडे ओढले आणि त्यावर मीठही चोळले. हिंदू शास्त्र-पुराणांविषयी आणि देवादिकांविषयी तर त्यांचे विचार असे जहाल आहेत की ते वाचताना आज त्या हयात नाहीत हे लक्षात येऊन हायसे वाटते. त्या स्वदेशी उद्योगधंद्यांच्या -हासाचीही चिकित्सा करतात...
दुसरे साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1885)
दुसरे ग्रंथकार संमेलन 1885 साली, म्हणजे पहिल्या ग्रंथकार संमेलनानंतर सात वर्षांनी भरले. मधील सहा वर्षें काहीही घडले नाही! दुसरे संमेलनही पुण्यात सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यात भरले. ते पुण्यात 28 मे 1885 रोजी भरले. त्या संमेलनास अडीचशेच्यावर ग्रंथकार उपस्थित होते. त्या संमेलनासाठी पुन्हा पुढाकार घेतला तो महादेव गोविंद रानडे यांनीच...
नारायण गोविंद चापेकर यांची ‘हिमालया’त भटकंती
‘हिमालयात’ हा ‘बदलापूर’कर्ते ना.गो. चापेकर यांनी हिमालयात केलेल्या प्रवासाचा वृतांत. ते त्यांच्या लेखनकार्यातील अखेरचे असे आणि एकूण अकरावे पुस्तक. चापेकर ही माहिती प्रस्तावनेच्या सुरुवातीसच...
साहित्याचे अभ्यासक फादर फ्रान्सिस कोरिया (Father Francis Correa)
मोन्सेनियर फादर फ्रान्सिस कोरिया हे धर्मगुरू म्हणून वसईत गेल्या बावन्न वर्षांपासून आहेत. त्यांना धर्मगुरू म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मॉन्सेनिअर हा ‘किताब’ मिळाला आहे. म्हणून ते त्यांच्या नावापुढे मोन्सी असे लिहितात. तो कोणाही धर्मगुरूसाठी मोठा बहुमान आहे! मॉन्सेनियर कोरिया हे धर्मगुरू असले तरी त्यांची ओळख लेखक म्हणून आहे. त्यांनी आजवर बत्तीस पुस्तके लिहिली आहेत. ‘सामवेदी ख्रिस्ती समाज’, ‘मधाच्या घागरी’; तसेच, त्यांनी वसई किल्ल्यांतून नेलेल्या व आता हिंदू तीर्थक्षेत्री असलेल्या अडतीस घंटांचा शोध नऊ जिल्ह्यांत जाऊन लावला. त्यावरही त्यांनी पुस्तक लिहिले आहे...
अटलबिहारी वाजपेयी- स्वयंसेवक, प्रचारक ते पंतप्रधान!
‘अटलजी-कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी’ हे पाचशेतीस पानांचे पुस्तक पत्रकार सारंग दर्शने यांनी लिहिलेले आहे. अटलजी चौऱ्याण्णव्या वर्षांचे असून भीष्मासारखे शरपंजरी पडलेले आहेत; तरीही त्यांची लोकप्रियता...
मुजरा शाहिराला – विठ्ठल उमप यांना!
शाहीर विठ्ठल उमप यांना ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार मिळाला तेव्हा आमच्या बिरादरीतील माणसाला पुरस्कार मिळाल्यामुळे विशेष आनंद झाला होता, तो अजून आठवतो. ‘संगीत नाटक...
व्यवसायनिष्ठ बोली – मराठीवर आघात?
विशिष्ट शब्दांचे उपयोजन जुगार, पानटपरी, गिर्यारोहण, लग्न, दूरदर्शन मालिका अशा नव्याजुन्या व्यवसायांत होताना दिसते. जुगारी लोकांच्या तोंडी झन्नामन्ना, तीनपत्ती, मांगपत्ती हे शब्द येतात. तीनपत्ती...
‘श्यामची आई’ पुस्तकाची जन्मकथा
‘श्यामची आई’ : जिव्हाळा, प्रेम आणि कृतज्ञता
‘श्यामची आई’ या पुस्तकाला ७७ वर्षे झाली तरी त्याची क्रेझ अजून तितकीच आहे. साने गुरुजींनी स्वत:च्या हृदयातील जिव्हाळा त्यात...