Home Search

राजकीय - search results

If you're not happy with the results, please do another search
carasole

आर.के. लक्ष्मण – राजकीय व्यंगचित्रकलेचे शिखर

1
माझी व आर.के. लक्ष्मण यांची भेट १९९० ते २०११ या वीस वर्षांत निमित्ता निमित्ताने तीन-चार वेळा झाली, तरी आमची मैत्री होऊ शकली नाही. कारण...

खरा शत्रू – राजकीय व्यवस्था

0
-  सुभाष आठले   लोकपाल बिलाने अवघ्या देशभर धूम माजवली आहे. अण्णा हजारे आणि त्यांचे चाहते यांना असे वाटते की लोकपालाची नियुक्ती झाली, की देशातील...

शि.द. फडणीस : हास्यचित्रांची वैश्विकता (S D Phadnis – Painter who spreads smile through...

0
शि.द. फडणीस शंभर वर्षांचे झाले. म्हणजे त्यांचा शताब्दी वर्षांत प्रवेश होत आहे. त्यांचा जन्म 29 जुलै 1925 चा. त्यांचा आता आतापर्यंत सार्वजनिक कलाजीवनात सहभाग असे; अजूनही व्यक्तिगत गाठीभेटी, संभाषणे करतात. फडणीस यांनी त्यांच्या हास्यचित्रांद्वारे मराठी माणसांच्या मनात हास्य गेल्या शतकाची साठ-सत्तर वर्षे पसरवले, आनंदच आनंद निर्माण केला ! त्यांनी मासिके-दिवाळी अंकांमध्ये, कथा-कादंबऱ्यांसाठी; इतकेच नव्हे तर शालेय व महाविद्यालयीन पुस्तकांच्या मुखपृष्ठांसाठी मनोवेधक व्यंग/हास्यचित्रे काढली. ती विलक्षण लोकप्रिय झाली. शि.द. यांच्या ‘मिस्कील गॅलरी’ स्वरूपाच्या चित्रांनी मराठी आणि एकूण भारतीय हास्य व व्यंग चित्रकलेत ठसठशीत ठसा निर्माण केला आहे...

अहमदनगरचा भुईकोट (Ahmednagar Fort)

किल्ल्यांचे तीन मुख्य प्रकार गिरीदुर्ग, भुईदुर्ग आणि जलदुर्ग असे असतात. भुईदुर्ग म्हणजे अर्थातच जमिनीवरचा किल्ला किंवा भुईकोट. महाराष्ट्रात भुईदुर्गांचे प्रमाण कमी आहे. अशा भुईदुर्गांपैकी अहमदनगरचा भुईकोट हा गेल्या पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळ अस्तित्वात आहे. इतकेच नाही तर वेगळ्या कारणांसाठी वापरात आहे. त्याने महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो किल्ला मुघल, पेशवाई आणि ब्रिटिश काळात तुरुंग म्हणून वापरात होता. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद यांच्यासारखे ‘हाय प्रोफाईल्ड’ राजकीय कैदी त्या तुरुंगात बंदी होते. त्याच तुरुंगात नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’सारखा महत्त्वाचा बृहद्ग्रंथ लिहिला...

निवडणूक पद्धतीचा तराजू दीडदांडीचा (Democratic Elections Method Needs to be Modified)

भारतातील निवडणूक पद्धत पक्षपाती आहे. ती जास्त मते मिळवणाऱ्या पक्षाला प्रमाणाबाहेर जागा बहाल करते, तर कमी मते मिळवणाऱ्या पक्षांना मतांच्या प्रमाणापेक्षा फार कमी जागा देते. ती पद्धत अल्पमतातील पक्षांवर अन्याय करते. ती निवडणूक पद्धत मतदारांवरही अन्याय करणारी आहे. जरा जुना डेटा उदाहरणाद्वारे स्पष्ट करतो. ज्या दहा टक्के दिल्ली मतदारांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मते दिली, त्यांना एकही प्रतिनिधी विधानसभेत पाठवता आला नाही. म्हणजे त्यांच्या मतांची किंमत शून्य ठरली- ती मते पूर्णपणे वाया गेली ...

भांगवाडी थिएटर (Bhangwadi Theater)

भांगवाडी ही मुंबईच्या काळबादेवी विभागातली एक वाडी. तेथे पूर्वी आसपास भांग विकणारी दुकाने होती म्हणून त्या भागाचे नाव भांगवाडी. अशा ठिकाणी गुजराती संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ 1874 मध्ये रोवली गेली. तेथे गुजराती नाटके 1968 पर्यंत होत होती. एका विशिष्ट पद्धतीची नाटके तेथे होत असत त्यामुळे त्या पद्धतीच्या नाटकांना भांगवाडी थिएटर म्हटले जाऊ लागले. अजूनही गुजराती नाटकांच्या सादरीकरणावर या पद्धतीचा काहीसा प्रभाव आहे. गुजराती रंगभूमीवरचे ज्येष्ठ दिग्दर्शक, नट आणि निर्माते मनोज शहा यांची भांगवाडी थिएटरविषयी एक विस्तृत मुलाखत तेजस्वी पाटील आणि तन्वी गुंडये यांनी घेतली आहे...

कवितेचा जागल्या ! (A Tribute to Dr. M. S. Patil)

1
डॉ. म.सु. पाटील हे 1980 नंतरच्या मराठी समीक्षकांमधले अग्रगण्य नाव. ते समीक्षक असण्याबरोबरच विद्यार्थी प्रिय प्राध्यापक होते. ते मनमाड महाविद्यालयाचे वीस वर्षे प्राचार्य होते. त्यांनी त्या काळात अनेक विद्यार्थी घडवले. ते महाविद्यालय नावारूपाला आणले. त्यांनी मराठी साहित्याच्या नकाशावर अस्तित्वात नसलेल्या मनमाड या गावाला साहित्यिक चळवळीचे केंद्र बनवले. त्यांच्या तिथल्या वास्तव्यात विविध चर्चासत्रे, व्याख्याने, ‘अनुष्टुभ’ सारख्या दर्जेदार मासिकाची चळवळ असे मनमाडचे साहित्यजीवन विविध अंगांनी बहरले. अनेक नामवंत साहित्यिकांचा राबता वाढला. त्यांचे निधन 31 मे 2019 रोजी झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या, ज्येष्ठ कवयित्री, कथाकार, कादंबरीकार नीरजा यांनी त्यांच्याविषयी ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश प्रकाशित करत आहोत...

विज्ञानबोधाची प्रस्तावना – श्री.म.माटे (Vidnyanbodhachi Prastavana)

श्री.म.माटे उर्फ माटे मास्तर हे महाराष्ट्रातल्या कर्त्या सुधारकांपैकी एक. त्यांनी दलित साहित्याची पहाट होण्यापूर्वी ‘उपेक्षितांचे अंतरंग’ लिहून दलितांची स्थितीगती मराठी समाजासमोर आणली. त्यातले, ‘बन्सीधरा! तू कोठे जाशील?’ ‘कृष्णाकाठचा रामवंशी’ किंवा ‘सावित्री मुक्यानेच मेली’ ह्या कथा आजही अनेकांच्या लक्षात असतील. ‘विज्ञानबोधाची प्रस्तावना’ हे कुठल्या पुस्तकाची प्रस्तावना नसून स्वतंत्र पुस्तक आहे. त्यांचा ‘विज्ञानबोध’ नावाचे वार्षिक नियमितपणे प्रकाशित करण्याचा मानस होता. याची पूर्वपीठिका म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी विज्ञाननिष्ठ विवेकवादी दृष्टीकोनाची मांडणी केली आहे. गिरीश दुर्वे यांच्या लेखाच्या निमित्ताने या पुस्तकाविषयी जिज्ञासा जागृत व्हावी हाच हेतू आहे...

स्त्री मुक्ती संघटना (Stree Mukti Sanghatana)

स्त्री मुक्ती संघटना गेली 48 वर्षे महाराष्ट्रात कार्यरत आहे. सातत्याने विविध उपक्रम राबवून संघटनेने विविध स्तरातील स्त्रियांच्या आयुष्यात गुणात्मक फरक केला आहे. पंचवीस वर्षे स्त्री मुक्ती संघटनेच्या उपाध्यक्ष आणि 2018 पासून त्या संघटनेच्या सेक्रेटरी असलेल्या अमोल केरकर या लेखात स्त्री मुक्ती संघटनेच्या उद्दिष्टांविषयी आणि वाटचालीविषयी विस्ताराने सांगत आहेत. संस्थेच्या 48 वर्षांच्या कामाविषयी असल्यामुळे लेख काहीसा दीर्घ आहे. मात्र संस्थेच्या वाढीसाठी केलेले विविध उपक्रम या लेखामुळे इतर संस्थांनाही मार्गदर्शक ठरतील असे आहेत. अमोल केरकर यांना बँक कर्मचाऱ्यांच्या चळवळीत काम करण्याचाही दीर्घ अनुभव आहे. त्यांच्यासारख्या मृदू स्वभावाच्या आणि चिकाटीने काम करणाऱ्या कार्यकर्तीचे अनुभव आणि विचार महत्त्वाचे आहेत...

नागाव (गोरेगाव) : सामाजिक एकोप्याची अजब कहाणी (Nagaon : Story of Social integration)

रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील नागाव (गोरेगाव). ते महाड-गोरेगावचे उपनगर वाटावे असे आहे. आमच्या गावाचा परिसर हा कातळी. त्यामुळे आंबा, फणस, नारळी यांच्या बागा… असा कोकणचा मेवा तेथे नाही. तेथे भातशेती ही मुख्य; रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार म्हणत ना ! उन्हाळ्यात कलिंगड, टरबूज ही फळे येत; पावसाळी भाज्या भरपूर होत. गावात असतील दोनशे घरे. गावाची समाजरचना जमीनदार आणि खंडकरी शेतकरी, अशी. त्यामुळे ती शेती आम्ही आमच्याच गावातील कुणबी-मराठा यांच्याकडे ‘अधेली’ने दिली होती...