Home Tags ज्ञानपीठ पुरस्कार

Tag: ज्ञानपीठ पुरस्कार

गोविंद विनायक करंदीकर ऊर्फ विंदा करंदीकर (Vinda Karandikar)

0
मराठीतल्या मोजक्याच ज्ञानपीठ विजेत्यांपैकी असलेल्या विंदा करंदीकर यांचे साहित्यिक कर्तृत्व मोठे आहे. अमृतानुभवापासून ते नवकवितेपर्यंत त्यांची प्रतिभा आणि लेखणी लीलया फिरली आहे. त्यांनी कवितेच्या आशयामध्ये आणि रूपबंधांमध्ये अनेक प्रयोग केले. जबाबदारीच्या भावनेतून, मराठीच्या अभ्यासकांसाठी भाषांतरे केली. अशा या चतुरस्त्र साहित्यिकाची 14 मार्च रोजी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने गीता जोशी यांनी विंदांच्या साहित्याचा धावता आढावा घेतला आहे...

वि.स. खांडेकर- एक विसावा (Remembering V.S. Khandekar)

मराठीला पहिले ज्ञानपीठ मिळवून देणारे, मागच्या शतकातले विख्यात लेखक वि.स. खांडेकर यांची 11 जानेवारी 2024 रोजी एकशेपंचविसावी जयंती आहे. कथा, पटकथा, कादंबऱ्या, नाटके, ललितलेख, निबंध, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये खाडेकरांच्या नावावर पंचाहत्तरपेक्षा जास्त लेखनकृती आहेत. आजही त्यांच्या ‘अमृतवेल’, ‘उल्का’, ‘ययाती’, ‘क्रौंचवध’ या कादंबऱ्या वाचकप्रिय आहेत. त्यांच्या एकशेपंचविसाव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे लेखनिक राहिलेले राम देशपांडे त्यांच्या आठवणी सांगत आहेत...

बाबा आमटे-रमेश गुप्ता – कवितांचे शब्दांकन

दत्तप्रसाद दाभोलकर यांनी ‘अन्वयाची अक्षरलिपी’ या कवितासंग्रहाचे परीक्षण करत असताना एक किस्सा कथन केला आहे. बाबा आमटे यांच्या ‘माती जागवील त्याला मत’ या गाजलेल्या कवितासंग्रहावर ‘शब्दांकन- रमेश गुप्ता’ असे आहे. आता, कवितांचे शब्दांकन म्हणजे काय? मग ही कवितानिर्मितीची प्रक्रिया कोणती? कविता बाबा आमटे यांची की रमेश गुप्ता यांची?...

पंचेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-fifth Marathi Literary Meet 1964)

पंचेचाळिसावे मराठी साहित्य संमेलन गोव्यात मडगाव येथे 1964 साली आयोजित करण्यात आले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज होते. त्यांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची लहान बहीण होती. कुसुम ही एकुलती एक बहीण असल्याने शिरवाडकर यांनी कुसुमचे अग्रज अर्थात कुसुमाग्रज हे टोपणनाव धारण केले.

वि.स. खांडेकर यांचे तरुणांना आवाहन (V.S. Khandekar’s Appeal to the Youth)

वि.स. खांडेकर (भाऊसाहेब) यांनी मराठी भाषेला पहिले ज्ञानपीठ मिळवून दिले. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1898 चा आणि त्यांचे निधन झाले 2 सप्टेंबर 1976 रोजी. भाऊसाहेबांनी विविध प्रकारचे लेखन केले...

अफलातून भालचंद्र नेमाडे

प्रा. भालचंद्र नेमाडे हे एक अफलातून तर्‍हेवाईक व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे ख्यातकीर्त लेखक व तेवढेच मर्मग्राही समीक्षक म्हणून महाराष्ट्रातला सुजाण वाचक आदराने पाहतो. त्यांनी त्यांच्या 1962 साली प्रसिद्ध झालेल्या ‘कोसला’ कांदबरीपासून वेळोवेळी मराठी साहित्यविश्वात खळबळ उडवून दिलेली आहे...