Home Tags कर्नाटक

Tag: कर्नाटक

मृणाल गोरे यांची पाणीवाली बाई राष्ट्रीय पातळीवर (Mrunal Gore’s life story on...

मृणाल गोरे यांच्या स्मृतिदिनी, 17 जुलैला तिकडे दूर आसामात, गौहत्ती येथे त्यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी रंगमंचावर हिंदी भाषेत सादर होत आहे ! त्याचे लेखन केले आहे मुंबईच्या निवृत्त प्राध्यापक वसुधा सहस्त्रबुद्धे यांनी आणि सादरकर्त्या आहेत कन्नड भाषिक भागीरथी कदम. त्या राष्ट्रीय पातळीवर मानसन्मान मिळवलेल्या अभिनेत्री- दिग्दर्शक आहेत. सध्या त्या गौहत्तीमधील नाट्य विद्यालयाच्या प्राचार्य म्हणून जबाबदारी निभावतात. त्यांच्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या जीवनावरील नाट्यप्रयोग भारतात विविध ठिकाणी होत आहे. मृणाल गोरे यांची जीवनकथा त्याच प्रकारे भारतभर सादर होण्याची शक्यता आहे...

ऐसे उगार माझे गाव ! (Ugar – My town)

उगार खुर्द हे भूतपूर्व सांगली संस्थानातील छोटेसे खेडेगाव. गाव स्वतंत्र भारतात गेल्या पाऊणशे वर्षांत पूर्ण पालटून गेले आहे. मूलत: दक्षिणवाहिनी असणारी कृष्णा नदी उगारजवळ उत्तर वाहिनी होते. अशा वळणाला तीर्थक्षेत्र मानले जाते. त्यामुळे नदीला प्रशस्त दगडी घाट वरपासून खाली, अगदी पात्राच्या मध्यभागापर्यंत आहे. शंभर वर्षे झाली तरी त्या घाटाचे बांधकाम अभंग आहे. उगार खुर्दला भाषिक सलगतेच्या तत्त्वावर सीमेलगतचे गाव म्हणून राज्य सरकारने भाषिक सवलती दिल्या आहेत...

भीतीचे/धास्तीचे ग्रहण सुटत आहे !

0
सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हा पृथ्वी-चंद्र-सूर्य यांच्या अवकाशातील स्थानांमुळे होणारा वैश्विक खेळ आहे. निसर्गनिर्मित असलेला हा खेळ मनुष्यवस्ती पृथ्वीवर येण्याआधीपासून अव्याहत सुरू आहे. सूर्यग्रहणाने ‘दृष्टी’ वैज्ञानिक केली आणि समाजातही वैज्ञानिक जाणिवा मंदगतीने का होईना पण जागृत होत जातील असा विश्वास वाटतो...

भारताच्या अर्थव्यवस्थेला इथेनॉल निर्मितीमुळे आधार

ऊस लागवडीचे देशातील वीस टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. ऊसाची मळी आंबवून त्यातील साखरेचे मद्यार्कात रूपांतर करतात. त्यांपासून अल्कोहोल, डिनेचर्ड स्पिरिट, इथेनॉल यांची निर्मिती होते. इथेनॉल पेट्रोल-डिझेलसारख्या इंधना बरोबर वाहनांसाठी वापरता येते...

एकेचाळीसावे साहित्य संमेलन (Forty-first Marathi Literary Meet 1959)

श्री.के. क्षीरसागर म्हणजेच श्रीकेक्षी हे निर्भय आणि नि:स्पृह वृत्तीचे समीक्षक होते. ते सावरकर आणि पटवर्धन यांच्या भाषाशुद्धीविषयक विचारांवर ‘सह्याद्री’ मासिकातून परखड टीका केल्याने प्रकाशात आले. त्यांनी भाई डांगे यांच्या मार्क्सवादी भूमिकेवर व साने गुरुजी यांच्या उपदेशप्रधान वाङ्मयीन भूमिकेवरही टीका केली...

प्रेम भारतीय शास्त्रीय संगीतावर!

0
जे कानाला गोड वाटते आणि हृदयाला भिडते ते चांगले संगीत अशी स्पष्ट आणि साधीसरळ व्याख्या संगीताची करता येईल. जगातील सगळेच संगीत तसे मधुर व भूरळ घालणारे, पण भारतीय शास्त्रीय संगीताला कुठेच तोड नाही. भारतीय संगीतातील लावणी, गजल, कव्वाली, भावगीत, भक्तिगीत यांचा थाट काही वेगळाच...

अचलपूर येथील गाढवपोळा

पोळा हा सण बैलांचाच, परंतु अचलपूर येथे भोई समाजात गाढवांचा पोळा आयोजित केला जातो. गाढवांप्रती कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे गाढव पोळा होय. ही प्रथा मागील पन्नास-साठ वर्षांपासून परतवाडा शहरातील दयाल घाट येथे जपली जात आहे...

दातार – गोत्र आणि शाखा

दातार हा गुणवाचक शब्द दातृत्व गुण दर्शवतो. त्यामुळे दातृत्व गुणाने संपन्न ते दातार अशी त्या नावाची उपपत्ती लावता येते. दातार आडनावाची बहुतांश घराणी ही चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहेत, तर काही घराणी देशस्थ ब्राह्मण शाखेची आहेत...

बी.जे. खताळ : सच्चा गांधीवादी… सच्चा माणूस (B. J. Khatal)

महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहिला आणि त्यात पराकोटीचा प्रामाणिकपणा, कठोर शिस्त आणि तत्त्वनिष्ठा हे निकष लावून काही लोकांची नावे नोंद करावी असे म्हटले तर ती यादी बी.जे. खताळ या नावापासून सुरू होण्यास हवी. त्यांनी राज्याच्या विविध मंत्रिपदांवर बहुतांश काळ काम केले. त्यांनी निवृत्तीनंतर स्वतःला योगासने, विपश्यना, वाचन-चिंतन यांत गुंतवून घेऊन वयाच्या एकशेएकाव्या वर्षापर्यंत विविध विषयांवर लिखाण केले...

रघुनाथ ढोले यांचे हृदय झाडांचे…

रघुनाथ ढोले यांची झाडांशी घट्ट नाळ जुळलेली आहे. झाडांशी हितगुज करणाऱ्या या मितभाषी माणसाने मानवनिर्मित देवराया निर्माण करण्याचा ध्यास घेतला. आतापर्यंत त्यांनी पंच्याण्णव देवराया आणि बत्तीस घनदाट वने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्यांत निर्माण केली आहेत...