Home Tags वर्धा

Tag: वर्धा

वर्धा

माणूसपणाच्या वाटेवरील प्रवासी

कुमार शिराळकर हे डाव्या विचारांचे कार्यकर्ते होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या मुख्यत: सीटू या कामगार युनियनचे कार्यकर्ते यांनी मिळून ‘माणूसपणाच्या वाटेवरील प्रवासी’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ औरंगाबाद येथे 7 जानेवारी रोजी आयोजित केला होता. या पुस्तकात ‘मागोवा’च्या मित्रमंडळींना कुमार कसा दिसला याची मांडणी पाच लोकांनी केली आहे आणि बाकी दहा लेख हे आदिवासी कार्यकर्ते व युनियनमधील कार्यकर्ते यांनी लिहिलेले आहेत. प्रत्येक लेख हा कुमारबद्दलच्या कृतज्ञतेने गहिरून लिहिलेला आहे...

अठ्ठेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-Eighth Marathi Literary Meet 1969)

वर्धा येथे 1969 साली झालेल्या अठ्ठेचाळिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते कवी प्रा. पुरुषोत्तम शिवराम रेगे. ते नवकवितेत स्वतःचा वेगळा प्रवाह जपणारे तरल कवी, अल्पाक्षराच्या वाटेने जाणारे कादंबरीकार आणि समीक्षक-संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. रेगे यांनी ‘सुहृद चम्पा’ आणि ‘रूपकथ्थक’ या टोपणनावांनीही लिखाण केले आहे. रेगे हे मूलतः सर्जनशील कलावंत होते. त्यांनी त्यांच्या लेखनाला ‘बालमित्र’ नावाच्या हस्तलिखित मासिकातून सुरुवात केली...

वर्ध्याचे पुलगाव : माझे माहेरगाव (Pulgaon of Wardha – My childhood)

माझे पुलगाव हे माझ्या जिवाभावाचे गाव. या गावाशी असलेले माझे नाते अजोड आहे. माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे त्या गावाने पाहिले आहेत. माझे लहानपण, शिक्षण, लग्न या महत्त्वपूर्ण दिवसांचे ते साक्षीदार आहे. म्हणूनच पुलगाव सोडून पन्नास वर्षे झाली तरी त्या गावाशी असलेली माझी नाळ तुटलेली नाही. त्या गावाने मला आयुष्यभराचा लळा लावला आहे. ‘सेंट्रल अॅम्युनेशन डेपो’ हे पुलगावचे वैशिष्ट्य आहे. त्या डेपोमुळे गाव प्रसिद्धीच्या झोतात आले...

विदर्भाची खाद्यसंस्कृती पानगे/रोडगे (पानगे/रोडगे यांतील सूक्ष्म भेद)

गव्हाच्या पीठापासून बनवला जाणारा पानगे/रोडगे हा पदार्थ विदर्भातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय. मार्गशीर्ष-पौष महिना सुरू झाला, की शेतात, तर कधी घरी पानग्याचा/रोडग्याचा बेत...

शस्त्रास्त्रांचे पुलगाव

पुलगाव हे महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा नदीकाठी वसलेले आहे. त्या गावाला लागून वर्धा नदी वाहते. वर्धा नदीच्या अलीकडे वर्धा जिल्ह्याची सीमा तर पलीकडे अमरावती जिल्ह्याची सीमा आहे. नदीचे पात्र विस्तृत असल्याने दोन्ही बाजूला जोडणारा एक रेल्वे पूल आहे. पुलगावला रेल्वे पुलाच्या जवळ असल्याने त्याला पुलगाव अर्थात पुलावर वसलेले गाव हे नाव पडले...

पळण (Running away from Village)

मी आईला विचारले, “आय, का आलो आपण इथं?” आईने थोडक्यात उत्तर दिले, “याला पळण म्हणतात.” मी प्रश्न विचारला, “पळण म्हणजे काय?” माझी आई मला माझ्या नावावरून लहानपणी देवके म्हणत असे. ती मला म्हणाली, “अगं देवके, आज आपल्या गावात हिंदू लोकं नवरात्रीच्या टायमाला देवीला बळी देतात. म्हणून आपण इथं आलो.”...

हेमाद्रिपंत या नावाचे गूढ? (Who Was Hemadripant)

हेमाद्रीपंडिताचे नाव ऐतिहासिक संदर्भात वारंवार येते. तो हेमाडपंत म्हणूनही ओळखला जातो. हेमाद्री पंडिताचे नाव बांधकाम शैली व मोडी लिपी या संदर्भात विशेष घेतले जाते. त्याने बांधलेली मंदिरे ‘हेमाडपंती’ या नावाने प्रसिद्ध आहेत.

चले जाव : भारतीय स्वातंत्र्याचा अखेरचा लढा (Quit India – Last Phase of the...

'चले जाव'ची घोषणा 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथील गवालिया टँक मैदानावर काँग्रेसच्या वतीने केली गेली. 'ब्रिटिशांनी तत्काळ हा देश भारतीयांच्या हाती सोपवून चालते व्हावे' असा निर्वाणीचा इशारा त्या वेळी देण्यात आला.

क्रांतिस्थळ, शहीद आष्टी (Shahid Ashti)

‘आष्टी’ नावाची महाराष्ट्र राज्यात तीन-चार गावे आहेत. आमचे 'आष्टी' हे विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आहे. आमच्या आष्टी गावाला खास बिरुद लावले जाते ते म्हणजे ‘शहीद...
_Tamaswada_2_0.jpg

तामसवाड्याचा अभिनव जलप्रयोग

वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात गाळाने बुजलेल्या तामसवाडा नाल्याचे ‘माथा ते पायथा’ तत्त्वानुसार पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. ते काम ‘पूर्ती सिंचनसमृद्धी कल्याणकारी संस्था’ या स्वयंसेवी...