Home Search

पौराणिक - search results

If you're not happy with the results, please do another search

नदीष्ट – नदीकाठच्या निसर्गाची निरागसता (Nadishta – Marathi novel that depicts life along the...

कवी मनोज बोरगावकर यांनी त्यांच्या नदीकाठच्या वेगवेगळ्या जीवनानुभवांची गाथा ‘नदीष्ट’ या कादंबरीतून साकार केली आहे. नदीकाठचे जनजीवन तेथील अनेकस्तरीय तळकोपऱ्यांसह कादंबरीत अधोरेखित झाले आहे. माणसाने त्याचे निसर्गाशी असणारे नाते जवळपास संपुष्टात आणले आहे. त्याने नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळे आणले, भरमसाठ वाळू तिच्या उदरातून उपसली, पाणी दूषित केले. जंगले तोडून टाकली.

येशू ख्रिस्ताच्या पुराणकथा असत्या तर ! लेखावरील विचारचर्चा (Debate on Yeshu’s Myth for spread...

1
येशूख्रिस्ताच्या पुराणकथा असत्या तर ! हा लेख 'थिंक महाराष्ट्र'वर 25 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला. तो अनेकांनी वाचला. त्या लेखाखाली; तसेच इमेलवर वाचकांनी प्रतिक्रियादेखील नोंदवल्या. तो लेख बहुचर्चित ठरेल अशी अपेक्षा होतीच.

येशू ख्रिस्ताच्या पुराणकथा असत्या तर ! (Wanted Yeshu’s Myth for spread of Christianity in...

इतिहासाला मर्यादा आहे. तो माणसाच्या खोल अंतर्मनात शिरू शकत नाही; काव्य मात्र माणसाच्या अंतर्मनाचा वेध घेऊ शकते. म्हणूनच श्रीकृष्णाचे काव्य व बुद्धाचे मिथक माणसाला अंतरी खोलवर झेप घेण्यासाठी समर्थ करू शकते. पाश्चिमात्य लोक जेव्हा तुलसीदास वाचतात तेव्हा ते म्हणतात, की हा इतिहास नव्हे, कल्पित आहे ! बरोबरच आहे ते. तो इतिहास नाहीच आहे. कल्पितच आहे ते. तरीसुद्धा तुलसीदास हा कवी संत लूक याने ख्रिस्ताला जो न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्यापेक्षा अधिक न्याय श्रीरामाला देतो...

पखवाजपटू गार्गी शेजवळ (Pakhwaj Player Gargi Shejwal)

भारतातील पखवाजवादकांचे पहिलेच पखवाजपर्व भोपाळमध्ये 2013 साली आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात पखवाजवादन करणारी गार्गी ही पहिली महिला कलाकार होती. पखवाजपर्व धृपद संस्थान भोपाळ न्यास आणि डीडी भारती यांच्या वतीने भरले होते. गार्गी देवदास शेजवळ ही महाराष्ट्राची. गार्गी मुंबई, पुणे; तसेच, भारतातील विविध ठिकाणी तिच्या गुरूंसोबत पखवाजवादन करत असते.

एकविसावे साहित्य संमेलन (Twenty First Marathi Literary Meet- 1935)

इंदूर येथे भरलेल्या एकविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष औंध संस्थानचे संस्थानिक श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी होते. ते विद्याव्यासंगी होतेच, पण कलांचेही भोक्ते होते. त्यांनीच महात्मा गांधी यांच्या सल्ल्याने त्यांच्या संस्थानात पहिली रयतसभा स्थापन केली...

पंधरावे साहित्य संमेलन (Fifteenth Marathi Literary Meet – 1929)

बेळगाव येथे भरलेल्या पंधराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘काळ’कर्ते शिवराम महादेव परांजपे हे होते. ते स्वातंत्र्याच्या चळवळीतील आघाडीचे वक्ते, तरुण पिढीला आकर्षित करणारी लेखनशैली असलेले स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व होते.

मागील पिढीवरील वाचन संस्कार (Reading – key to the personality development)

4
मराठी भाषाभ्यासासाठी वि.स. खांडेकर, आचार्य अत्रे वगैरे दिग्गजांनी संपादित केलेली पाठ्यपुस्तके जुन्या पिढीत होती; खेरीज पुरवणी वाचनासाठी नेमलेली अवांतर पुस्तके असत. त्यातील गद्य विभाग हे गद्य बिलकुल नव्हते, तर अतिशय रोचक आणि समृद्ध होते. त्यातील साहित्याची विविधता तेव्हा जाणवली नाही, पण आता ती आठवली, की स्तिमित व्हायला होते.

झाडीपट्टी रंगभूमीचा रंगमंच – प्रेक्षकांचे कुतूहल (Jhadipatti Drama stage: Unique development)

झाडीपट्टी नाटकांचे स्टेज (रंगमंच) हा विषय कायम कुतूहलाचा राहिलेला आहे. किंबहुना झाडीपट्टीत खुद्द नाटक, त्यातील नटनट्या हे जसे आकर्षणाचे व चर्चेचे विषय असतात, त्याप्रमाणे रंगमंच – त्याची व्यवस्था - त्यावरील पडदे – त्यानुसार पात्रांच्या हालचाली हादेखील प्रेक्षकांच्या कुजबुजीचा विषय असतो.

चौगाव आमचा पारच बदलला! (Changing Face of Chaugaon Village)

6
माझे गाव चौगाव. चौगाव-गोताणे म्हटले, की लक्षात येते ते धुळे जिल्ह्याच्या, धुळे तालुक्यातील चौगाव. नाही तर सटाणा गावाजवळ एक चौगाव-रातीर आहे, चोपडा तालुक्यात एक चौगाव-लासूर आहे. माझे गाव मालेगावपासून साधारण चाळीस किलोमीटर उत्तरेला आणि नासिक जिल्ह्याच्या सीमेपासून सात-आठ किलोमीटर अंतरावर आहे. ते ईराज नदीच्या काठावर डोंगरउतारावर वसले आहे.

नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi)

आश्विन वद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार या दिवशी कृष्‍णाने नरकासूर राक्षसाचा वध केला होता. त्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. अभ्‍यंगस्‍नानापूर्वी कारिट नावाचे फळ फोडण्‍याची परंपरा महाराष्‍ट्रात अनेक ठिकाणी आढळते.