Home Search

संस्था - search results

If you're not happy with the results, please do another search
_Shegav_2.jpg

श्रद्धेचे व्यवस्थापन – श्री गजानन महाराज संस्थान

मी शेगावला कामानिमित्त जाणार आहे, असे बायकोला सांगितल्यावर तिने सात्त्विक राग व्यक्त केला. मग म्हणाली “मी महाराजांची पोथी वाचते आणि तुला महाराज बोलावतात. हे...
carasole

शुभदा लांजेकर व आवाबेन नवरचना संस्था

शुभदा लांजेकर यांचा जन्म पुण्यातील. बालपण बरे गेले. त्या अकरावीपर्यंत शिकल्या. वडील अतिशय कडक शिस्तीचे. आई प्रेमळ, मनमिळाऊ, पाककलेची आवड असणारी गृहिणी होती. दुसऱ्यांना...
carasole

कुरूंदवाड संस्थान

1
पटवर्धन घराणे पेशवाईत प्रसिध्दी पावले. त्यांचा मूळ पुरूष हरिभट. त्यांचा मुलगा त्र्यंबकराव. त्यांना दोन मुलगे -निळकंठराव आणि कोन्हेरराव. ते दोघे पराक्रमी होते अशी इतिहासात...
carasole

आपटे गुरुजी – येवल्यातील राष्ट्रीय शाळेचे संस्थापक

नाशिक जिल्ह्यातील येवले हे तालुक्याचे शहर तात्या टोपे यांची जन्मभूमी म्‍हणून ओळखले जाते. तेथे कै. आपटे गुरुजी यांनी 23 मे 1921 रोजी राष्ट्रीय शाळा...

दहिगाव संस्थानचे वर्तमान

0
सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील दहिगाव हे जैनांचे भगवान महावीर व ब्रम्हमहती शांती सागर महाराज यांच्या क्षेत्रामुळे प्रसिद्ध आहे. दहिगाव नातेपुतेपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे....

मराठीसाठी इरेला पेटले सुब्बू गावडे (Gawade’s final call for Marathi language)

मराठी भाषा आणि संस्कृती यांचे सोयर आणि सुतक, ना महाराष्ट्र सरकारला आहे-ना मराठी जनतेला; या निष्कर्षाप्रत सुब्बू गावडे येऊन पोचले आहेत. त्यांचा तो लढा सध्या विधायक अंगाने, सरकारकडे अर्जविनंत्या करून सुरू आहे. ते रोज एक विनंतीपत्र इमेलमार्गे मुख्यमंत्र्यांना पाठवतात. त्यांनी तशी तीनशे पत्रे सोळा महिन्यापासून लिहिली आहेत. त्यांतील जेमतेम पत्रांवर पोच मिळाली. कारवाई कोणत्याच पत्रावर झालेली नाही. गावडे त्यांच्या पत्राची प्रगती इमेल ट्रॅकिंग व्यवस्थेद्वारे तपासत असतात. त्यांना सरकारच्या औदासीन्याचे वाईट वाटतेच, पण त्याहून अधिक राग येतो तो मराठी साहित्यसंस्कृती संस्थांचा, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा आणि नामवंतांचा...

मराठी भाषा संवेदना: यंत्राची व माणसाची ! (Chat Gpt more language sensitive than human)

बोरिवलीला एक निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत- त्यांचे नाव सुभाष गावडे -वय वर्षे साठ. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ती याच उद्देशाने की मायमराठी जगावी ! त्यांच्या परीने त्यांनी त्यासाठी एक लढाई गेली काही वर्षे केली. ती म्हणजे रोज सरकारला एक तर्कशुद्ध पत्र लिहायचे, की मराठी भाषा जगवणे-टिकवणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने ती नीट पार पाडावी. गावडे हे राज्यघटनेपासून रोजच्या सरकारी परिपत्रकांपर्यंत प्रत्येक कागदाचा अभ्यास करतात. परवा, एक जुलैला त्यांनी पत्र लिहिले ते सोबत जोडले आहे. गंमत म्हणजे गावडे यांनी त्यांचे पत्रलेखन संपल्यावर त्यांनी चॅट जीपीटीशी जो संवाद केला तो जसाच्या तसा नमूद केला आहे. कारण त्यांना त्यांच्या सोळा महिन्यांच्या एकाकी लढ्यात माणसाकडून जी संवेदना लाभली नाही, ती यंत्राकडून मिळाली...

शिरोड्याचे वि.स. खांडेकर संग्रहालय (V S Khandekar memorial at Shiroda in Konkan)

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त वि.स. खांडेकर यांच्या नावाचे प्रेक्षणीय स्मृती संग्रहालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘शिरोडा’ या गावी आहे. ते गाव वेंगुर्ला तालुक्यात समुद्रकाठी वसले आहे. गांधीजींनी केलेल्या 1930 सालच्या मार्च-एप्रिल महिन्यातील मिठाच्या सत्याग्रहानंतर, मे 1930 मध्ये त्याच धर्तीवर परंतु काहीसा वेगळा आणि काकणभर अधिक उग्र स्वरूपाचा मिठाचा सत्याग्रह शिरोडा येथे झाला होता ! त्या सत्याग्रहाचे नेते ‘कोकणचे गांधी’ रत्नागिरीचे सामाजिक कार्यकर्ते सीताराम पुरुषोत्तम अर्थात आप्पासाहेब पटवर्धन हे होते. त्यात त्या गावच्या अनेकांना बंदिवासाची शिक्षाही भोगावी लागली होती...

कलाश्रम परिवाराची दखलपत्रे (Kalashram – Unique way of paying homage)

नंदकुमार आणि नंदिनी पाटील हे मुंबईतील परळचे हरहुन्नरी जोडपे. पैकी नंदकुमार हा पत्रकार – छायाचित्रकार – वर्तमानपत्रात मजकुराची मांडणी आकर्षक करू शकणारा. त्याखेरीज त्याचे इव्हेण्ट मॅनेजमेंट वगैरेंसारखे अनंत उद्योग आणि त्या साऱ्यात नंदिनीची शंभर टक्के साथ. त्याच्या वृत्तीत परोपकार व सेवाभाव घरच्या संस्कारातून मुरले गेले आहेत. त्यामुळे त्याने उद्योग-व्यवसाय म्हणून काही केले तरी ते गुण प्रतीत होतातच. तशाच भावनेतून ती दोघे मिळून पतीपत्नी ‘कलाश्रम’ नावाची संस्था चालवतात आणि 2018 सालापासून दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘दखलपत्रे’ देण्याचा कार्यक्रम करतात...

विद्यानिकेतन – चांगल्या मूल्यांचा आग्रह (Dombivali’s Vidyaniketan – insistence for values)

‘विद्यानिकेतन’ ही डोंबिवलीमधील इंग्रजी माध्यमातील शाळा. समाजकार्याची आवड म्हणून विवेक पंडित यांनी ती सुरू केली. शाळेला चाळीस वर्षे झाली. मराठी माणसाने ध्येयवृत्तीने चालवलेली शाळा म्हणून तिचे डोंबिवलीच्या शैक्षणिक आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण झाले आहे. वास्तविक विवेक पंडित यांचे शिक्षण वाणिज्य व व्यवस्थापन ह्या क्षेत्रांमधील आणि त्यांचा कामाचा अनुभव इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, केमिकल, एण्टरटेनमेंट अशा क्षेत्रांमधील. ते तेथे आघाड्यांच्या कंपन्यांचे प्रकल्प सल्लागार होते. त्यातून त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असे, पण त्यांना त्यांची समाजधारणा स्वस्थ बसू देत नव्हती. त्या अस्वस्थतेतूनच ‘राजेंद्र शिक्षण संस्था’ ह्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ‘विद्यानिकेतन’ ह्या शाळेचा जन्म 16 जून 1985 रोजी झाला...