Home आरोग्य बालकल्याण

बालकल्याण

सुचेता-राजेंद्र धामणे डॉक्टर दांपत्याचे मनगाव

राजेंद्र आणि सुचेता धामणे ह्या डॉक्टर दांपत्याचे सहजीवन सुरू झाले तेच मुळी समाजासाठी काहीतरी करावे या समविचाराने. दोघेही एकत्र होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात शिकलेले. कॉलेजमध्ये शिकत असतानाच गरजूंना मदत करत असत. वैद्यकीय पदवी पंचवीस वर्षापूर्वी 1998 मध्ये घेतल्यानंतर त्यांनी दोघांनी मिळून लगेच माऊली या संस्थेची स्थापना केली. त्यांनी शिंगवे तालुक्यात (जिल्हा नगर) मोबाईल क्लिनिक चालवले. वाड्यावस्त्यांवर, आदिवासी वस्त्यांवर जाऊन तेथील रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार केले. दोघांनी वीस बेडचे रुग्णालयही सुरु केले. तेथे सगळ्या सोई सुविधा होत्या...

श्रीगोंद्याचे अनंत झेंडे – वंचितांचा वाली ! (Anant Zende of Shrigonda – Protector of...

पारधी व डोंबारी समाजाच्या मुलामुलींना शिक्षण व निवास या सोयी उपलब्ध करून देणारे श्रीगोंद्याचे अनंत झेंडे समाजकार्याच्या भावनेने झपाटलेले आहेत. त्यांनी तरुणपणी गावचे रस्ते झाडून- स्वच्छ करून आदर्श प्रस्थापित केला, तर सरकारी सहाय्याचा विचार न करता वंचित मुलांसाठी निवासाची व्यवस्था करून दिली. संस्थेने श्रीगोंदा येथील अण्णाभाऊ साठे चौकातील दलित वस्तीत ‘साधना बालभवन’ सुरू केले आहे. तेथे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या मुलांसाठी काम चालते...

रिलेशानी (Beautiful Relationship)

मोहन देस यांच्या ‘आरोग्यभान’ या प्रकल्पातून जन्माला आलेला ‘रिलेशानी’ हा प्रकल्प म्हणजे छान नातेसंबंध. वाढीच्या वयात, तरुणपणी मनात अनेक प्रश्न धुमाकूळ घालत असतात. त्यांचे निरसन करण्यासाठी विश्वासू व्यक्ती आयुष्यात नसेल तर नात्यात दरी पडते आणि ती वाढत जाते. लैंगिकतेकडे बघण्याचा सकस दृष्टिकोन, प्रेम-भावनेचे अनेक पदर, नात्यातून निर्माण होणारा विश्वास अशा अनेक विषयांवर मनमोकळा संवाद ‘रिलेशानी’ शिबिरात होतो. म्हणून त्याला संवाद शिबिर असेही म्हटले आहे...
-rojnishi-heading

रोजनिशी लेखन – मुलांना आत्मविश्वासाची प्रचीती

मुलांमध्ये अभ्यासाची, शिक्षणाची आवड उत्पन्न होण्यास हवी असेल, तर मुलांना समजून घेणे, त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का न लावणे व त्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होणे ही...
-vablevadi-school

जागतिक दर्ज्याच्या तोडीस तोड वाबळेवाडीची ओजस शाळा (Ojas School of Wabalewadi)

जिल्हा परिषदेच्या या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून यंदा चार हजार विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये होते. भारतातील पहिली आणि जगातील तिसरी 'झिरो एनर्जी स्कूल' म्हणून वाबळेवाडीच्या...
-pakshinirikshan-uttamsadakal

पक्षी निरीक्षणाने ज्ञानकक्षा रुंदावल्या

करंजाळे गाव माळशेज घाटाच्या सुरुवातीला, निसर्गाच्या सानिध्यात वसले आहे. चहुबाजूंना हिरवे हिरवे डोंगर, विशाल धरणाचा सहवास आणि त्या सर्वांना छेदत जाणारा नगर-मुंबई महामार्ग... त्या...
carasole

विज्ञानदृष्टी देणारी – वसुंधरा

‘वसुंधरा’ हे सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान केंद्र आहे. ते कुडाळ तालुक्यातील नेरूरपार या गावी साडेचार एकरांच्या परिसरात आहे. बाबा आमटे यांचे शिष्‍योत्तम सी.बी. नाईक यांनी...

अशी असावी शाळा!

6
शिक्षण व शाळा कशा असाव्यात याबाबत निर्णय करण्याचा अधिकार कोणाचा? सध्या, तो अधिकार विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना नाही. तो शिक्षक-शाळांचे चालक-शिक्षणतज्ज्ञ व शिक्षण खात्यातील...

अवनी: मतिमंद मुलांना मायेचे छत्र!

1
‘अवनी मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय’ गेली दहा वर्षें कल्याणजवळील मुरबाड या ठिकाणी कार्यरत आहे. समाजात मतिमंद मुले ही वेडी म्हणून हिणवली जातात, दुर्लक्षित राहतात....

पाबळचा विज्ञानाश्रम

विकास आणि शिक्षण यांची यशस्वी सांगड  आपल्या प्रचलित शिक्षणपध्दतीच्या दुखण्यावर आणि त्यावरच्या रोगापेक्षा जालीम अशा उपाययोजनांवर चर्चा नेहमी होते. मूलगामी बदल व्हायला हवा यावर सर्वत्र...