Home आरोग्य बालकल्याण

बालकल्याण

श्रीगोंद्याचे अनंत झेंडे – वंचितांचा वाली ! (Anant Zende of Shrigonda – Protector of...

पारधी व डोंबारी समाजाच्या मुलामुलींना शिक्षण व निवास या सोयी उपलब्ध करून देणारे श्रीगोंद्याचे अनंत झेंडे समाजकार्याच्या भावनेने झपाटलेले आहेत. त्यांनी तरुणपणी गावचे रस्ते झाडून- स्वच्छ करून आदर्श प्रस्थापित केला, तर सरकारी सहाय्याचा विचार न करता वंचित मुलांसाठी निवासाची व्यवस्था करून दिली. संस्थेने श्रीगोंदा येथील अण्णाभाऊ साठे चौकातील दलित वस्तीत ‘साधना बालभवन’ सुरू केले आहे. तेथे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या मुलांसाठी काम चालते...

सुचेता-राजेंद्र धामणे डॉक्टर दांपत्याचे मनगाव

राजेंद्र आणि सुचेता धामणे ह्या डॉक्टर दांपत्याचे सहजीवन सुरू झाले तेच मुळी समाजासाठी काहीतरी करावे या समविचाराने. दोघेही एकत्र होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात शिकलेले. कॉलेजमध्ये शिकत असतानाच गरजूंना मदत करत असत. वैद्यकीय पदवी पंचवीस वर्षापूर्वी 1998 मध्ये घेतल्यानंतर त्यांनी दोघांनी मिळून लगेच माऊली या संस्थेची स्थापना केली. त्यांनी शिंगवे तालुक्यात (जिल्हा नगर) मोबाईल क्लिनिक चालवले. वाड्यावस्त्यांवर, आदिवासी वस्त्यांवर जाऊन तेथील रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार केले. दोघांनी वीस बेडचे रुग्णालयही सुरु केले. तेथे सगळ्या सोई सुविधा होत्या...

रिलेशानी (Beautiful Relationship)

मोहन देस यांच्या ‘आरोग्यभान’ या प्रकल्पातून जन्माला आलेला ‘रिलेशानी’ हा प्रकल्प म्हणजे छान नातेसंबंध. वाढीच्या वयात, तरुणपणी मनात अनेक प्रश्न धुमाकूळ घालत असतात. त्यांचे निरसन करण्यासाठी विश्वासू व्यक्ती आयुष्यात नसेल तर नात्यात दरी पडते आणि ती वाढत जाते. लैंगिकतेकडे बघण्याचा सकस दृष्टिकोन, प्रेम-भावनेचे अनेक पदर, नात्यातून निर्माण होणारा विश्वास अशा अनेक विषयांवर मनमोकळा संवाद ‘रिलेशानी’ शिबिरात होतो. म्हणून त्याला संवाद शिबिर असेही म्हटले आहे...
_rohini_athvale

कुमुदिनी मेमोरियल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट

फटाक्यांच्या  कारखान्यात आग लागून दहा बळी... ‘बीपीसीएल रिफीयनरी’मध्ये बॉयलरचा स्फोट होऊन त्रेचाळीस जण गंभीर जखमी... दिल्लीला जाणाऱ्या बसमध्ये आग लागून सत्तावीस लोक जळून खाक झाली... पुण्याला साड्यांच्या...
_swacha_bharat

‘स्वच्छ भारत’ – स्वप्न आणि सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, त्याप्रमाणे शौचालये गेल्या पाच वर्षांत मोठ्या संख्येने बांधण्यात आली, हे खरे आहे. भारतात 1988 ते 1999 या अकरा वर्षांच्या काळात...
-pakshinirikshan-uttamsadakal

पक्षी निरीक्षणाने ज्ञानकक्षा रुंदावल्या

करंजाळे गाव माळशेज घाटाच्या सुरुवातीला, निसर्गाच्या सानिध्यात वसले आहे. चहुबाजूंना हिरवे हिरवे डोंगर, विशाल धरणाचा सहवास आणि त्या सर्वांना छेदत जाणारा नगर-मुंबई महामार्ग... त्या...
-yuvraj-ghogre-vithhalwadischool

युवराज घोगरे यांचा एकच ध्यास- शाळेचा सर्वांगीण विकास! (Yuvraj Ghogre)

युवराज घोगरे यांच्या शिक्षक म्हणून नोकरीची सुरुवात 12 मार्च 2005 रोजी जळगाव जिल्ह्यातील विवरे या लहानशा गावी जिल्हा परिषद शाळेत झाली. त्या गावात येण्या-जाण्याची...
-loksankhyavadhivarkahiupayaheka?

लोकसंख्यावाढीवर काही उपाय आहे का?

जगभर 11 जुलै हा लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. जगाची सतत वाढणारी लोकसंख्या हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय होऊन गेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने तो...
-vablevadi-school

जागतिक दर्ज्याच्या तोडीस तोड वाबळेवाडीची ओजस शाळा (Ojas School of Wabalewadi)

जिल्हा परिषदेच्या या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून यंदा चार हजार विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये होते. भारतातील पहिली आणि जगातील तिसरी 'झिरो एनर्जी स्कूल' म्हणून वाबळेवाडीच्या...
-rojnishi-heading

रोजनिशी लेखन – मुलांना आत्मविश्वासाची प्रचीती

मुलांमध्ये अभ्यासाची, शिक्षणाची आवड उत्पन्न होण्यास हवी असेल, तर मुलांना समजून घेणे, त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का न लावणे व त्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होणे ही...