फलटणचे जब्रेश्वर मंदिर

फलटणला महानुभाव पंथीयांची ‘दक्षिणकाशी’ म्हणून ओळखले जात असे. तेथे महानुभाव पंथियांची अनेक मंदिरे आहेत. महानुभाव साहित्यात फलटणचा उल्लेख ‘पालेठाण’ म्हणून केलेला आढळतो. फलटणचे ‘जब्रेश्वर मंदिर’ आजही राजवाडा व श्रीराम मंदिर यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे...

नागलवाडीचा काशी केदारेश्वर

शेवगाव तालुक्याहच्या नागलवाडी या गावचे काशी केदारेश्वर हे महादेवाचे मंदिर ऋषी काशिनाथबाबा यांच्या वास्तव्याने पावन मानले जाते. ते ठिकाण निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. चहुबाजूंनी डोंगर व मध्ये दरी; झाडे-वेली यांनी वेढलेला परिसर मन मोहून टाकतो ! मंदिरही सुबक आहे. जवळच पाण्याचे तळे आहे...

बदनापूर तालुका: महाराष्ट्राचा मध्य

बदनापूर हा जालना जिल्ह्यातील एक तालुका. बदनापूर हे जालन्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. जालना जिल्हा मोसंबी फळासाठी राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे बदनापूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे. बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रात कडधान्याच्या वेगवेगळ्या जातींची बियाणी यांबाबत संशोधन चालते. त्या संशोधन केंद्राचे नाव कृषी क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जाते...

ओळगावला ओढ ऐक्याची आणि विकासाची

0
ओळगावचे वयोवृद्ध आजोबा लक्ष्मण मांजरेकर खूष आहेत, कारण गेली चाळीसेक वर्षे गावात दारूबंदी आहे. त्यामुळे तक्रारींचं आणि भांडणांचं प्रमाण जवळपास नाहीसं झालं आहे. गावात कमालीची शांतता आहे.” ओळगावात दारूबंदीने आणि ग्रामस्थांच्या एकीने तेथे मोठी क्रांती घडवली आहे. दापोली तालुक्यातील ओळगाव रस्त्यापासून थोडे आत झाडीत लपलेले आहे. तेथे ऊसाची शेती केली जाई...

कोळथरे गावचा कासव जलार्पण सोहळा !

कोळथरे हे स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले दापोली तालुक्यातील गाव ! तेथील समुद्र हा पर्यटकांच्या आकर्षणाचा भाग आहे. ते गाव दाभोळमधील बुरोंडीच्या पुढे मुख्य रस्त्यापासून खाली, समुद्रकिनारी वसलेले आहे. तेथील पंचनदी ही छोटीशी नदी जेथे समुद्राला मिळते तेथील परिसर निसर्गरम्य आहे. भारताच्या क्रिकेट संघातील एके काळचा जलदगती गोलंदाज अजित आगरकर यांचे कोळथरे हे गाव...

मुरुडकरांची भाषा !

1
माझ्या मुरुड गावच्या गावकऱ्यांची भाषा अगदी रोखठोक ! ते बोलताना नाकाचा वापर करतात की काय, असे ऐकणाऱ्याला वाटेल. त्यांनी बरेचसे शब्द मोडून घेऊन मुखात बसवलेले आहेत. म्हणजे घ्यायचं, द्यायचं, करायचं असे म्हणायचे असेल तर ते घैचं, दैचं, कराचं असे बोलतात...

झरी गावी एक गाव एक स्मशानभूमी (Zari village will have one...

साधारणपणे स्मशानभूमी म्हटले की सर्वांच्या डोळ्यांसमोर येते ते चित्र म्हणजे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उभारलेले पत्र्याचे शेड आणि त्याच्या आजूबाजूला वाढलेली झाडेझुडपे ! पण मृतदेहावर अंत्यसंस्कार स्वच्छ, सुंदर परिसरात करणारी एक वेगळी स्मशानभूमी परभणी जिल्ह्यातील झरी या गावी आहे. झरीतील त्या स्मशानभूमीला आयएसओ (ISO) मानांकन प्राप्त झाले आहे...

सामुदायिक आनंदाची नाशिकची दिवाळी

नाशिक हे मंदिरांचे गाव. तेथे असंख्य आळ्या, पेठा नि वाडे. तेथे ‘दिवाळी तोंडावर आली’ हा शब्दप्रयोग ऐकू येई तो भाजणीच्या खरपूस वासानं ! पूर्वी देवदिवाळी ही नाशिकची खरी खासीयत. श्रद्धा असणारे भाविक नाशिक या मंदिराच्या गावात दिवाळीत आले की हात जोडतात नि अप्रूपाने त्रिपुरी पौर्णिमेला एक पणती प्रवाहात सोडतातच...

कोळबांद्र्याच्या डिगेश्वराचा आनंदोत्सव !

1
भारताच्या सात लाख खेडेगावांमध्ये महादेवाचे मंदिर नाही असे गाव नसेल ! महादेवाच्या त्या मंदिरांतील भगवंताचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावातील महादेवाला वेगवेगळे नाव आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे महाराष्ट्राच्या पोलिस खात्याचे घोषवाक्य आहे. कोळबांद्रे गावातील डिगेश्वरही नेमके तेच काम करतो. गावात कोणी गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल माणसाला त्रास दिला तर ‘आता डिगेश्वराला नारळ देईन’ एवढे वाक्य जरी त्या गरीब माणसाने उच्चारले तरी तो दुष्ट घाबरून जातो...

शिक्षणक्षेत्रातील अग्रेसर शहाबाज (Shahabaj – Village With Long Educational Tradition)

16
शहाबाजहे रायगड जिल्ह्यातील तीनचार हजार लोकवस्तीचे छोटे गाव, पण ते शिक्षणक्षेत्रातील प्रसिद्धीने खूप मोठे झाले. त्या खेड्याने रायगड जिल्ह्याला शिक्षकांचा पुरवठा सतत केला. शहाबाज गावाने त्याचे वेगळे स्थान आगरी समाजाच्या चळवळीचे व सुधारणांचे उगमस्थान म्हणूनही निर्माण केले आहे.