रापण : किनारपट्टीवरील नयनरम्य देखावा (Rapan – Old Fishing Technique Disappears From the Sea...

‘रापण’ हे कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारीचे मुख्य साधन होते; त्याच बरोबर ती गावची घटना होऊन गेली होती. आमच्या तांबळडेग गावाला पहाटे कोंबडा आरवला की जाग येत असे. प्रत्येक घरचा कर्ता पुरुष तोंड धुऊन इतरांना जागवत समुद्रकिनारी पोचत असे. हळुहळू, लोकांचे थवे चहुबाजूंनी संपूर्ण किनारपट्टीवर गोळा होत. तोपर्यंत चिलीम, भुरगडी किंवा विडी... कशाचा तरी झुरका मारून, शारीरिक थकवा दूर करून ऊर्जानिर्मितीचे पुरुष लोकांचे काही काम चालायचे. मच्छिमारी धंद्याची प्रमुख केंद्रे मालवण, आचरा मुंबरी, कुणकेश्वर ही होती. तांबळडेगच्या किनाऱ्यावर दहा रापणी कार्यरत असल्यामुळे परिसर सकाळी गजबजून जात असे...

शिक्षणक्षेत्रातील अग्रेसर शहाबाज (Shahabaj – Village With Long Educational Tradition)

16
शहाबाजहे रायगड जिल्ह्यातील तीनचार हजार लोकवस्तीचे छोटे गाव, पण ते शिक्षणक्षेत्रातील प्रसिद्धीने खूप मोठे झाले. त्या खेड्याने रायगड जिल्ह्याला शिक्षकांचा पुरवठा सतत केला. शहाबाज गावाने त्याचे वेगळे स्थान आगरी समाजाच्या चळवळीचे व सुधारणांचे उगमस्थान म्हणूनही निर्माण केले आहे.

ग्रामजीवनाची ऊबदार गोधडी (Village Life In Lockdown Period)

तांदळाची लुसलुशीत भाकरी. सोबत घरचे ओले काजू आणि बटाटा घातलेली झणझणीत भाजी. त्याने डब्यातून असा घास घेत न्याहरी संपवली. मोठ्ठी ढेकर ऐकू आली. तृप्ततेची... त्याने मी दिलेला कोरा चहा घेतला... आलं, गवती चहाची पात, भरपूर साखर आणि चहाची पावडर घातलेला.. दूध नाही हं त्यात.

माझे साधे गाव – मोहटा (Mohata Village)

मोहटा हे माझे छोटेसे गाव दक्षिण अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यात वसलेले आहे. सह्याद्रीची डोंगररांग अहमदनगर जिल्ह्यात आल्यानंतर तिला गर्भगिरी हे नाव पडते. त्या गर्भगिरीच्या कुशीमध्ये वसलेले आहे माझे छोटेसे गाव- ‘श्री क्षेत्रमोहटादेवी’. त्यालाच मोहटे किंवा मोहटा या नावानेदेखील ओळखले जाते.
-devrukh-nature

निसर्गाने वेढलेले देवरुख (Devrukh)

देवरूखबद्दल असे सांगितले जाते, की प्रत्यक्ष देवांच्या वास्तव्याने ती भूमी पावन झाली आहे! बहिणाईने ‘देऊळातल्या देवा या हो, उतरा ही पायरी’ असे आळवूनसुद्धा जे देव भूतलावर थांबले नाहीत, ते देव स्वेच्छेने ज्या ठिकाणी राहून गेले ते गाव म्हणजे देवरूख! देवरुख या गावाचा तालुका संगमेश्वर असला तरी तालुक्याचे गाव म्हणून ओळख आहे ती देवरुख ह्या शहराचीच; असे महत्त्व त्या शहरास लाभले आहे. देवरूख या नावाची उत्पत्ती आणखी एका पद्धतीने आहे. वड आणि पिंपळ यांची मोठमोठी झाडे त्या गावाच्या चारही बाजूंना आहेत. वड आणि पिंपळ यांना भारतीय संस्कृतीत ‘देववृक्ष’ मानले जाते. ‘देववृक्षांचे गाव’ याचा अपभ्रंश होत होत गावाचे नाव ’देवरूख’ झाल्याचे सांगितले जाते...
_Gavgatha_Carasole

गावगाथा (Gavgatha)

आवाहन माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी त्याचा गाव त्याच्या मनातून दूर जात नाही. आठवणी, अनुभव, संस्कार, तेथे झालेली शरीर आणि मन यांची घडण यांच्या मिश्रणातून गावाबद्दलची जी ओढ तयार होते ती विलक्षण असते. म्हणूनच माणसाने त्याच्या गावाचे नाव कोठेही निव्वळ वाचले-पाहिले तरी त्याला आनंद होतो...

अंजनडोह – एक ऐतिहासिक गाव

0
अंजनडोह हे एक ऐतिहासिक गाव. ते एकेकाळी सोलापूर जिल्‍ह्यातील करमाळा तालुक्‍याची राजधानी म्हणून ओळखले जात होते. गावामध्ये मोठी बाजारपेठ होती. अंजन आणि डोह अशी दोन गावे होती. त्या दोन्ही गावांमधून ओढा वाहत होता. ओढ्याला पाणी असे. त्यामुळे लोकांना इकडून तिकडे येण्या-जाण्यास अडचण निर्माण होत असे. कालांतराने, दोन्ही गावांतील गावकऱ्यांनी एकत्र येऊन ओढ्याच्या एकाच बाजूस घरे वसवली...

उपळव्याचे अनोखे वाचनालय

फलटण शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर असणारे उपळवे हे माझे गाव. फलटण हे सातारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. उपळवे गाव डोंगराच्या जवळ वसलेले आहे. दहा-बारा वर्षांपूर्वीची...