कविपण मिरवणारे सुधीर मोघे (Sudhir Moghe)
प्रसिद्ध कवी सुधीर मोघे यांचे पुण्यामध्ये निधन 15 मार्च 2014 रोजी झाले. गदिमा व शांता शेळके यांचा वारसा सांगणारा व साध्यासोप्या मराठी शब्दांनी कविता...
ऋणानुबंध मालतीबाई बेडेकर यांचा (Maltibai Bedekar)
मालतीबाई बेडेकर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1905 आणि निधन 6 मे 2001. पंच्याण्णव वर्षांचे आयुष्य. त्यांची लेखणी कथा, कादंबरी, संशोधन अशा सर्व लेखन प्रकारांत यशस्वीपणे फिरली होती. त्यांनी अनेक परिषदांची, संमेलनांची अध्यक्षपदे भूषवली होती. त्यांना बरीच पारितोषिके पुरस्कार मिळाले होते...
अभिनेता विवेक अर्थात गणेश भास्कर अभ्यंकर
मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले नट विवेक यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ‘अभिनेता विवेक’ या नावाचे एक पुस्तक भारती मोरे यांनी पुढाकार घेऊन संकलित केले आहे. त्या कामी त्यांना...
प्रकाश होळकरची निसर्गप्रतिभा
प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर हे नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील लासलगावचे. त्यांची लासलगावला त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली, तेव्हा ते व्यग्र होते ते त्यांच्या गाईला...
पोस्टर व बॅनर चित्रकला लोपली !
घराणी सिनेमाक्षेत्रात अनेक होऊन गेली; अजूनही आहेत. सिनेमाची निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय ही क्षेत्रे कमीजास्त ग्लॅमरची; लोकांच्या मनी आकर्षण असलेली. परंतु त्या कलावंतांची तशी प्रसिद्धी करणारे जे चित्र कलाकार पडद्यामागे काम करतात ते मात्र दुर्लक्षित राहतात, उपेक्षित असतात. चित्रपटनिर्मितीचे श्रेय दादासाहेब फाळके यांचे. पण चित्रपटाला वास्तववादी चौकट दिली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी. पोस्टर व बॅनर चित्रकलेतील 1924 ते 1989 ही पासष्ट वर्षे म्हणजे रंगरेषांचा ‘महायज्ञ’च होता. तो 1990 नंतर निवांत झाला, असे वर्णन चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी सुबोध गुरुजी यांनी संकलित केलेल्या ‘पाऊलखुणा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केले आहे. सुबोध गुरुजी यांनी स्वत: त्यास ‘मानवी स्पर्श संपला’ असे समर्पक रीत्या म्हटले आहे...
रुपवेध – जाणिवेतून नेणिवेपर्यंतचं नाट्य
डॉक्टर श्रीराम लागू यांनी रंगभूमीवर साकारलेल्या भूमिका - त्या रंगवताना त्या भूमिकांमागचा त्यांचा सर्वांगीण विचार, त्यांचं ‘नाटक’ या माध्यमाबद्दलचं व अभिनयाबद्दलचं चिंतन आणि त्यांनी...
तेंडुलकर यांच्या पटकथा लेखनाची उपेक्षा झाली!
नाटकवेड्या महाराष्ट्राने आणि तेंडुलकरप्रेमी नाटकवाल्यांनीही विजय तेंडुलकर यांचे चित्रपटलेखन कधी गांभीर्याने लक्षात घेतले नाही. महाराष्ट्रानेच जर तेंडुलकर यांच्या चित्रपटकथालेखनाची दखल घेतली नाही तर उर्वरित...
द.भि. कुलकर्णी – समीक्षेचा सृजनव्यवहार (D.B. Kulkarni Marathi Critic)
द.भि. कुलकर्णी हे ज्येष्ठ समीक्षक म्हणून ख्यातनाम होते. त्याचमुळे त्यांची निवड त्र्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्यात 2010 साली झाली होती. समीक्षक ही त्यांची पहिली ओळख, तर जाणकार संगीत श्रोता आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक हे त्यांचे आणखी काही खास पैलू. द.भि. कुलकर्णी हे समाजातील वास्तव स्पष्ट शब्दांत मांडत. ते वाचकांना सांगत असे, की “आजच्या विज्ञानयुगात असून तुम्ही वैज्ञानिक दृष्टी स्वीकारत नाही, तर मनोरंजनाची दृष्टी स्वीकारता. तुम्ही दूरदर्शनवर करमणुकीचा कार्यक्रम पाहत असाल तर त्याचा आनंद घेणे बरोबर आहे, मग ते नृत्य असो, संगीत असो किंवा नाटक, सिनेमा, क्रिकेटची मॅच, काहीही. पण तुम्ही करमणूक म्हणून भूकंप, अवर्षण, अपघात, दहशती हल्ले यांची दृश्येही पाहत असाल तर तुमची संवेदना बोथट झाली आहे, असे मी समजतो...
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke)
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणजे धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके. भारतात पहिला चित्रपट निर्माण केला तो दादासाहेब फाळके या मराठी माणसाने, म्हणूनच भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात...
चित्रपती व्ही. शांताराम (V. Shantaram)
शांताराम राजाराम वणकुद्रे ऊर्फ व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णाक्षरांनी लिहिले गेलेले नाव. ते शांतारामबापू या नावाने ओळखले जात. त्यांनी त्यांचा खोल ठसा निर्माता,...