योगीराज बागूल यांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ हे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर हर्षदीप कांबळे (आय ए एस) आणि दंतवैद्य विजय कदम यांनी ‘डॉ.बाबासाहेब विचार मंचा’च्या माध्यमातून बाबासाहेबांच्या त्या शिलेदारांचे एकवीस जिवंत वारस शोधून काढून त्यांचा मुंबईत भव्य सत्कार घडवून आणला ! त्यावेळी तेथे जमलेल्या त्या सत्कारमूर्तींच्या चेहऱ्यावरील कृतज्ञतेची भावना ही योगीराज यांच्या त्या अथक परिश्रमांची पावती होती...
पंडित शंकर अभ्यंकर हे साताऱ्याचे. त्यांचा जन्म झाला तेव्हा वडिलांनी गडू आणि पळी वाजवली. तो जन्मनाद ही शंकरराव यांच्या पुढील ‘संगीत आयुष्या’ची नांदी ठरली ! त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ," गुरुकृपेने संगीतात एवढे शिकलो की त्यावेळी मनात सुरू झालेली आनंदाची मैफल सुरूच आहे. या मैफलीला भैरवी नाही...”
कृ.द. दीक्षित यांनी आकाशवाणीमधील नोकरीदरम्यान अनेक कलावंतांना जवळून अनुभवले, त्यांच्या स्वभावातील कंगोरे टिपले. ते अनुभव त्यांनी व्यक्तिचित्रांच्या माध्यमातून आकर्षक पद्धतीने लिहून वाचकांसाठी मुक्त केले. त्यात चॉसरचे तज्ज्ञ प्रा. लागू व बा. सी. मर्ढेकर यांच्यातील तत्त्वनिष्ठा वेधक आहे…
‘मर्मभेद’ ही राजकारणाची कटकारस्थाने अशी कथा असलेली कादंबरी. ती मानवी प्रवृत्ती-विकृती, रूपकात्मक-प्रतीकात्मक अशा मांडणीतून उलघडत जाते. कथेची भाषाशैली संस्कृतप्रचुर, जड असली तरी तिच्या भावनानुसारी प्रवाहीपणामुळे वाचकाला संमोहित करत गुंतवून ठेवते...
ज्या आईने मातृभाषा शिकवली तीच भाषा जर मुलगा विसरून गेला, तर मुलाचा परिवार, समाज, विद्या व देश यांच्याशी संबंध तुटतो. मातृभाषा विसरणे यासारखा दुसरा मोठा कोणताही शाप नाही !
अंगावर चिंध्यांचा वेष, डोक्यावर खापर, कानात डूल, हातात काठी असे ते छायाचित्र सर्वात अविस्मरणीय ठरले! गाडगेबाबांचे सहज काढलेले ते छायाचित्र इतके प्रसिद्ध झाले, की त्याचा वापर गाडगेबाबांचे अधिकृत छायाचित्र म्हणून सर्वत्र सुरू झाला...
अजय गाडगीळ यांच्याकडे गीर्यारोहण क्षेत्रातील एक उगवता तारा म्हणून पाहिले जाते. सह्याद्री पालथा घालणारा हा मावळा गिर्यारोहण, गड-किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन, निसर्गरक्षण आणि आपत्कालीन बचावकार्य यालाच ध्येय मानून त्या दिशेने यशस्वी घोडदौड करत आहे...
राजेंद्र इनामदार लोकांनी इकडे-तिकडे भिरकावून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या पाहिल्या की अस्वस्थ होत. मग त्यांनी त्या पोत्यात भरून गोळा करण्यास सुरुवात केली. दगडाचे चूर्ण, पाणी आणि फक्त सहा-सात टक्के सिमेंट यांचे पातळ मिश्रण त्या बाटल्यांत भरून साकारलेला त्यांचा बाटल्यांचा बंगला. या ‘बाटल्यांच्या बंगल्या’साठी त्यांनी आजपर्यंत ऐंशी हजार बाटल्या गोळा केल्या आहेत. त्या बाटल्यांची शक्ती किती दाबाने तुटू शकते ती क्षमता (क्रशिंग स्ट्रेंग्थ) तपासून पाहिली असता ती नेहमीच्या विटांच्या अडीच ते तीन पट जास्त भरली. यामुळे त्यांचा प्रयोगाचा उत्साह त्या ‘स्ट्रेंग्थ’च्या दुपटीने वाढला !
केरवाडी-परभणी येथील सूर्यकांत कुळकर्णी हा सतत अस्वस्थ व म्हणून संतप्त असतो. तो एकूण सामाजिक निष्काळजीपणाबद्दल हतबलता व्यक्त करत राहतो - मात्र तेवढ्यापुरता. तो त्याच्या सत्तराव्या वर्षीदेखील ‘अँग्री यंग मॅन’ वाटतो...
लेखक-अनुवादक उमा कुळकर्णी यांची मुलाखत तेजश्री कांबळे यांनी पुणे आकाशवाणीवर घेतली. कन्नड-मराठी साहित्य, अनुवादातील अडचणी, उमा कुळकर्णी यांचे स्वत:चे साहित्य-आत्मचरित्र अशा विविध लेखन-अनुवाद संबंधित विषयांवर बोलणे झाल्यानंतर तेजश्रीने भाषेच्या अभिजाततेचा मुद्दा उपस्थित केला...