नदीष्ट – नदीकाठच्या निसर्गाची निरागसता (Nadishta – Marathi novel that depicts life along the river)

 

कवी मनोज बोरगावकर यांनी त्यांच्या नदीकाठच्या वेगवेगळ्या जीवनानुभवांची गाथा ‘नदीष्ट’ या कादंबरीतून साकार केली आहे. नदीकाठचे जनजीवन तेथील अनेकस्तरीय तळकोपऱ्यांसह कादंबरीत अधोरेखित झाले आहे. माणसाने त्याचे निसर्गाशी असणारे नाते जवळपास संपुष्टात आणले आहे. त्याने नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळे आणलेभरमसाठ वाळू तिच्या उदरातून उपसलीपाणी दूषित केले. जंगले तोडून टाकली. निसर्ग मानवाच्या गरजा भागवत असतोपण उलट,  माणूस निसर्गाला ओरबाडून टाकत आहे ! अशा पर्यावरणीय समस्यांसह परिघाबाहेरचे उपेक्षित जगणे जगणाऱ्या असंख्य माणसांच्या हृदयद्रावक चित्तरकथा म्हणजे ‘नदीष्ट’ ही कादंबरी. ती नदीवरील अपार निष्ठेतून साकार झालेली आहे.

मानवी संस्कृती ही नदीकाठाने विकसित झाली. नदीचे आणि माणसाचे नाते आदिम स्वरूपाचे आहे. मनोज बोरगावकर ‘नदीष्टमधून मानवी जगण्याचा आणि नदीचा सहसंबंधमाणसाच्या जन्मापासूनच्या प्रवासाची आणि नदीच्या उगमाची व प्रवाहीपणे वाहण्याची असणारी समसमानता या सर्वांचा नेमका वेध घेतात. माणूस त्याच्या भोवतीच्या विशिष्ट चाकोरीतून निसर्गाच्या विशालतेकडे गेल्यानंतर त्याला समजणारे माणूसपण हे फारच थोर असते. ते थोरपण निसर्गाएवढे अमर्याद असते. ते मनोज बोरगावकर यांनी कादंबरीतून सशक्तपणे मांडले आहे.

लोकसाहित्यातील तयार झालेल्या माणसाच्या रूढ धारणापौराणिक मिथके यांचा वापर कादंबरीभर वेगवेगळ्या अनुषंगाने केला आहे. नदी आणि माणूस यांचा संबंध एवढा अभिन्न आहे, की लेखकाने ‘नदी म्हणजे आईचा विस्तारत गेलेला गर्भ’ असा अन्वय लावला आहे आणि तो अगदी खरा आहे प्रत्येक माणसात एक नदी वाहत असते. माणसाच्या जगण्यात आणि नदीच्या वाहण्यात तेवढी समानता असते. नदी अनेक अडथळे दूर करून सागराला जाऊन मिळते. ती वाहताना मुक्त हस्ताने मनुष्यजीवन फुलवत समृद्ध करत असते; कधी विस्कटूनही टाकते. माणूसही अनेक सुखदुःखे जन्मल्यापासून मरेपर्यंत भोगत विनातक्रार जगत असतोजीवन त्याच्या त्याच्या परीने अधिकाधिक संपन्नसमृद्ध करतो.

 

कादंबरीकार मनोज बोरगावकर नदीवर सतत दहा वर्षे पोहण्यासाठी जात होता. त्याचे आत्मानुभव कादंबरीच्या माध्यमातून व्यक्त झाले आहेत. नायक ‘मीचे ते कथनरूप आहे. त्याने मात्र न-नायकत्व स्वीकारले आहे. त्याने त्याला नायक होण्याची मोठी संधी प्रत्येक प्रसंगात असतानाही ते कलात्मक रीतीने टाळले आहे आणि ते त्या कादंबरीचे बलस्थान आहे. कादंबरीचे कथन नदीच्या शांत प्रवाहाप्रमाणे पुढे जात राहते. त्यात वेगवेगळ्या बोलीभाषांचाउर्दू-हिंदीतील दोह्यांचा वापर चपखलपणे आला आहे. तो कथनाला ठसठशीत कोरीवपणा प्राप्त करून देतो आणि त्यातून माणूसपणाच्या साऱ्या अवस्था थरारून उठतात. समाजपरिघाबाहेरच्या वेगवेगळ्या लोकसमूहांची रूढ जनरीतत्यांची दुःखेत्यांच्या आयुष्यातील भोगवाटे वाचून वाचकाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. ती सगळी माणसे त्यांच्या चेहराविहीन समूहाचे अदृश्य भोगवाटे त्यांच्या आयुष्यांतील घटना-घटिते उजागर करतात. ती सगळी माणसे व्यवस्थाशरणपरिस्थितीशरणहतबल आहेतपण ती सच्ची नि निसर्गाएवढीच निकोप अशी आहेत.

मनुष्य समाज तृतीयपंथी समूहाबद्दल अत्यंत निष्ठुरपणे वागत असतो. त्याच्या मनात त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज असतात. गैरसमज ती माणसे नाहीतच की काय, येथपासून सुरू होतातमोठी दरी त्यांच्यात आणि समाजात निर्माण झालेली आहे. तृतीयपंथी समूहाचे जगत्यांचा जीवनव्यवहारत्यांच्या चालीरीतीत्यांची समाजाकडून होणारी उपेक्षा – त्यात भरडून निघणारे त्यांचे आयुष्य आणि त्यामुळे त्यांच्या मनात समाजाबद्दल निर्माण होणारी आंदोलने, त्यांची समाजाकडून माणूसपणाच्या वागणुकीची नितळ निर्मळ आस ह्या सगळ्यांचे प्रत्ययकारी चित्रण ‘नदीष्टमध्ये मराठी भाषेत कदाचित प्रथमच आलेले आहे. कादंबरीतील जवळपास अर्ध्यापेक्षा अधिक भाग तृतीयपंथी समूहाचे जीवन व्यापतो. ‘सगुणा’ ही तृतीयपंथी नायिका नायकाला पुन्हा नदीवर आणि रेल्वेच्या प्रवासात भेटते. पुढे, त्यांच्या भेटी नदीकाठी घडत जातात आणि ती तिच्या आयुष्यातील सगळे दृश्य-अदृश्य तळकोपरे लेखकाला सांगते. तिचे आयुष्य तृतीयपंथी समूहाच्या आयुष्याचे प्रातिनिधिक रूप आहे. तृतीयपंथी समूहात दीक्षा देण्याचा जो विधी असतो तेथपासून ते त्यांच्या मृत्युपश्चात केल्या जाणाऱ्या विधीपर्यंतचा सगळा वृत्तांत अंगावर शहारे आणणारा आहे. समाज त्यांच्याकडे उपहासानेकुत्सितपणे पाहत असतो, पण ते किती वाईट आहे हे कादंबरी वाचल्यानंतर प्रकर्षाने जाणवते. तेही त्यांच्या वाट्याला केवळ लिंगभावात्मक फरकाने सामाजिक परिस्थितीतून आलेल्या भोगवाट्याला जबाबदार नाहीतते त्यांचे नैसर्गिक आयुष्य आहे, हे समजून घेण्यास हवे. त्यासाठी माणसाने माणसाच्या संवेदना सजग करण्यास हव्यात.

          सकीनाबी ही रेल्वेस्थानकावर भीक मागणारी स्त्री नदी परिसरात अंग स्वच्छ करण्यास येत असे. तिची आणि नायकाची भेट कधीतरी आठ-दहा दिवसांत तुरळक होई आणि बोलणेही घडे. ती नायकाला माटीमिले’ म्हणते. ती त्याच्याशी बोलत असे तर कधी त्याच्याकडून पैसे मोजून घेत असे. ती पैसे मागते पण तिला पैशांची हाव नाही. ती पैसे मिळतील तेवढे तिचे हाच न्याय मानते. ती नायकाला नदीवरच्याच ओळखीने बजावते, की रेल्वेस्थानकात रात्रीच्या वेळी गळ्यात सोन्याची चेन ठेवून येत जाऊ नकोस, तेथील गुंड वाईट आहेत, ते तुझ्या जिवाचे बरेवाईटही करतील. तिची नायकाप्रती निर्माण झालेली ही काळजी… ती तिच्याच परिसरातील लोकांविरुद्ध सांगण्याचे धाडस करते.

नदीवर मासेमारी करणारा पुरभाजी झिंगाभोई बामनवाड हा संवेदनशील माणूस. त्याला नदी पात्राची सखोल माहिती आहे. तो नदीच्या अस्पर्शीत वाळूची महती सांगतो. नदीच्या गाळात रुतून बसलेली प्रेते वर काढतो. तेवढी हिंमत त्याच्यात आहे, पण तो किती संवेदनशील आहे हे एका अघटित घटनेने जाणवते. एका संध्याकाळी एक तरुण स्त्री नदीवर नवस फेडण्यासाठी येते. तेव्हा त्या परिसरातील गुंड तिला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बाजूला असणाऱ्या निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार करतात. ते सगळे बामनवाड पाहतो, पण तो एकटा असल्यामुळे जिवाच्या भीतीने प्रतिकार करू शकत नाही. मात्र तो स्वतःला दोषी त्याच्या त्या अपरिहार्य हतबलतेबद्दल समजतोस्वतःलाच कोसत राहतो, अस्वस्थ होतो. त्याला त्या स्त्रीच्या ओघळणाऱ्या अश्रूंपुढे गोदावरीचा प्रवाह कमजोर वाटतो ! बामनवाडच्या कुटुंबाचे पोट मासेमारीवर अवलंबून असूनही, तो मासेमारी दोन महिने न करून त्या अघटित घटनेचे प्रायश्चित्त घेतो. त्याची ती संवेदना अंतर्मुख करणारी आहे.

          प्रत्येकाचे आयुष्य हे न उलगडणारे एक कोडे असते आणि प्रत्येकाला त्याचे आयुष्य काय दाखवेल याचाही अंदाज येत नाही. माणूस लग्न झाल्यावर सुखी होतो हा मोठाच भ्रम समाजात आहे. निव्वळ लग्न झाले म्हणून नात्यांचे जोखड वागवणाऱ्या कितीतरी जोड्या आजूबाजूला जगत असतात, ती माणसे फक्त समाज काय म्हणेल म्हणून किंवा ते या समाजव्यवस्थेचे घटक असतात म्हणून जीव मारत जगत असतात. अशाच एका, मूळच्या नोकरदार असणाऱ्या पण नात्यातील कोरडेपणा घेऊन जगणाऱ्यापत्नीशी शरीरधर्म म्हणून रत होणाऱ्या व दारूच्या नशेत मांजर समजून त्याच्या तान्ह्या मुलीला भिंतीवर आपटणाऱ्या भिकाजीची कथा कथानकात येते. तो गुन्हेगार आहे. तो सजा भोगून आल्यानंतर भीक मागून जगतो. त्याच्या पापांचे प्रायश्चित्त घेतो. कादंबरीतील पशुपालन कालुभैय्यात्याची प्रेयसी- त्यांचे एकमेकांप्रती समर्पित जगणेतसेच, सर्पमित्र असणाऱ्या प्रसादचे अद्भुत विश्व वाचकाला वेगवेगळे अनुभव जाणवून देणारे आहेत. माकडांनी चिंचेच्या झाडावर हरणाच्या पाडसाची केलेली शिकार माकडांच्या हिंस्त्रपणाची आणि माणूस त्यांचाच वंशज आहे म्हणून तीच हिंस्त्रता त्याच्यातही आल्याची साक्ष देतात.

          दादाराव त्यांच्या लहानपणीच आईच्या प्रेमाला पारखे झाले. ते त्यांची आई गोदावरी नदीलाच समजतात व तिच्यावर प्रेम करत असतात. ते तिच्या डोहात पोहण्यासाठी शिरले, की त्यांना आईच्या कुशीत शिरल्याचा अनुभव येतो. ते नदीचा प्रवाहतिचा अंदाज, पाण्याच्या वेगवेगळ्या धारा; तसेचपूर आल्यावर नदीत पोहण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या लेखकाला सांगत असतात.

          मनोज बोरगावकर यांनी हा संपूर्ण नदीनकाशा त्यांच्या नदीष्टमधून सजीव केला आहे. कादंबरीतील पात्रे अभावग्रस्त जीवन जगतात, पण त्यांची तक्रार आयुष्याविषयी नाही. त्यांचे जग निसर्गाशी नाते जोडून आहे. त्यामुळे नाते क्रूर असो वा आस्थेचे असो त्याला निसर्गाची निरागसता लाभलेली आहे. कादंबरी चेहराविहीन माणसांच्या आयुष्याला, त्याच्या प्रश्नांना वाचा फोडते. मानवी आयुष्य हे गुंतागुंतीचे नि जटिल असते. त्याला भूत-वर्तमानाचे संदर्भ असतात आणि त्यामुळेच ते गुंते सोडवणे सोपे नसते. कारण त्यामधून त्यांना पीळ पडण्याचा, गाठी घट्ट होण्याचा धोका अधिक असतो. मनोज बोरगावकर यांनी ते गुंते अलगदपणे उलगडून, जाणवून दिले आहेत. निसर्ग आणि मानवी जीवनाचा अद्वैत संबंध ही कादंबरी दृगोचर करते. त्यामुळे ती मराठी कादंबरीविश्वात आगळीवेगळी व मौलिक ठरते.

मनोज बोरगावकर यांची तीन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ‘कोरा कागद निळी शाई’ हा कवितासंग्रह राजहंस प्रकाशनने प्रकाशित केला आहेअकथ कहाणी सद्गुणांची’ हे ललित गद्य सायन पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. तिसरी नदीष्ट’ ही कादंबरी ग्रंथालीचे प्रकाशन आहे. लेखक मूळचा कवी आहे. त्यामुळे त्याचे सगळे लिहिणे ही दीर्घकवितेची शृंखला वाटते. त्याच बरोबर त्यात उत्स्फूर्तता आहे.

कादंबरी – नदीष्ट      
लेखक – मनोज बोरगावकर
मुखपृष्ठ  नयन बारहातेनांदेड
प्रकाशक :- ग्रंथालीमुंबई   मूल्य 200 रुपये,  पृष्ठसंख्या 168


– ऋषीकेश गंगाधरराव देशमुख  9923045550 rushigdeshmukh@gmail.com

मु पो :- शिळवणी ता :- देगलूर जि :- नांदेड

ऋषीकेश गंगाधरराव देशमुख यांचा शिळवणी (जिल्हा नांदेड) येथे जन्म 7 जुलै 1989 रोजी झाला. ते कै. व्यंकटराव देशमुख माध्यमिक विद्यालयात सहशिक्षक आहेत. त्यांचे शिक्षण एम ए (मराठी) डी एड असे झाले आहे. ते स्वत: कविता रचतात व ग्रंथसमीक्षा लिहितात. त्यांचे लेखन महत्त्वाच्या दैनिकांत व वाङ्मयीन नियतकालिकांत प्रसिद्ध होत असते.
——————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here