अजरामर ऐ मेरे वतन के लोगो… (Ae Mere Watan Ke logon...

0
भारतीय संगीतात शेकडो प्रकार गायले आणि वाजवले जातात; किंबहुना गाण्यासाठी भारतात निमित्तच हवे असते. भारतीय चित्रपटांबरोबर चित्रपटगीतांचे एक वेगळे मोठे विश्व तयार झाले आहे. ती संगीतकार, गायक आणि त्यांचे चाहते अशी दुनिया आहे. हिंदी चित्रपट गाण्यांमध्ये हटके आणि गाण्यांचा सीझनल प्रकार म्हणजे देशभक्तिपर गीते. जयंत टिळक यांनी काही निवडक देशभक्तिपर गाण्यांचा उत्कट आढावा स्वातंत्र्य दिनानिमित्ताने घेतला आहे. ते लिहितात - संगीतामध्ये माणसाच्याच काय, पण प्राण्यांच्याही भावना चेतवू शकण्याची ताकद आहे. अशी सुरुवात करून टिळक म्हणतात- मात्र एका गाण्याविषयी लिहिलं नाही तर चित्रपट संगीतविषयक सर्व लेखन अपुरं ठरेल. ते गीत आहे - ऐ मेरे वतन के लोगो... त्याच गीताची ही कहाणी...

अरुण महाजन – शिखर त्याचा साथी ! (Arun Mahajan – A...

अरुण महाजन हा तुर्कस्थानातील ‘अरारट’ या पर्वताचे सर्वात उंच शिखर गाठणारा तरुण. तो तेथे पोचलेला बहुधा पहिला व एकमेव मराठी तरुण असावा. महाराष्ट्रीय तरुण जगात वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि त्यांच्या बुद्धीची, पराक्रमाची चुणूक वेगवेगळ्या क्षेत्रांत दाखवतात. पण गिर्यारोहणाचे क्षेत्र सर्व धाडसी तरुणांना मोहवते असे जाणवते आणि तेथील आव्हानेही अगदीच वेगळी असतात ! तेथे अंगात धाडस, हिंमत असणे गरजेचे आहेच; शिवाय, जोखीम पत्करण्याची मनस्थिती असावी लागते आणि पैसा व वेळ, दोन्ही बरेच आवश्यक असतात. अरुण महाजन हा उमदा मराठी तरुण इलेक्ट्रिकल आणि संगणक या दोन शाखांमधील पदवीधर आहे, तो आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या तो कॅलिफोर्नियातील ‘पालो अल्टो’ या शहराचा निवासी आहे...

म्हणतात कुंतीपूरचे झाले कोतापूर ! (From Kuntipur to Kotapur Village)

कोतापूर हे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील डोंगररांगांनी वेढलेले आणि दोन नद्यांच्या मध्यभागी वसलेले छोटेसे निसर्गसंपन्न जुने गाव आहे. कोतापूर हे लहान गाव आहे. लोकवस्ती सुमारे दीड हजार माणसांची आहे. गावाच्या इतिहासासंदर्भात ‘कुतापूर ताम्रपट’ हा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहे. त्यात प्राचीन काळातील उल्लेख सापडतात. कोतापूर नावाची दंतकथा आहे. कोकणातील सण-उत्सवांचे वैभव कोतापूरलाही लाभले आहे. जिल्हास्तरीय नासा-इस्रो स्पर्धेत गावातील मुली इस्रो आणि नासा या दोन्ही संस्थांना भेटी देऊन आल्या आहेत...

आवाहन

लोकप्रिय लेख

पर्वतातील गाव – वसईचे गिरीज !

गिरीज हे पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील नयनरम्य ठिकाण. तेथे बऱ्याच टेकड्या पोर्तुगीजपूर्व काळात होत्या. काही उंच, काही ठेंगण्या. त्या सर्व लहानमोठ्या टेकड्यांमध्ये वसलेले गाव म्हणून त्याचे नाव गिरीज. ‘गिरी’ म्हणजे पर्वत आणि ‘ज’ म्हणजे जन्मलेले. पर्वतातील गाव गिरीज ! पोर्तुगीज वसाहतवादी वसईत सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी आले. त्यांनी शेषवंशी क्षत्रिय भंडारी भोंगाळे राज्याची वसई खाडीवरील गढी जिंकली. पोर्तुगीज सोजिरांची नजर आजुबाजूच्या गावांवरही गेली. त्यांतील एक गाव गिरीज...

व्यक्ती

संस्था

वैभव

गावगाथा

शिक्षकांचे व्यासपीठ

मराठीकारण

मंथन

सद्भावनेचे व्यासपीठ

मोगरा फुलला

Youtube व्हिडियो

व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प

लोकशाही सबलीकरण अभियान