Home Search

नवरात्री - search results

If you're not happy with the results, please do another search

नवरात्रीतील देवीचे महात्म्य

नवरात्रीतील देवीचे महात्म्य भक्तिभावाच्या अंगाने फारच वाढले असले तरी गावोगावची देवळे प्रसिद्ध आहेत, ती तेथील प्रथापरंपरांमुळे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर अशी सांस्कृतिक माहिती आपण संकलित करत असतो. यांपैकी कोणत्याही लेखाबाबत वाचकांकडे जादा माहिती असेल किंवा कोणत्या नव्या देवस्थानावर सांस्कृतिक महत्त्वाच्या अंगाने लेखन करण्याची इच्छा असेल; तर info@thinkmaharashtra.com या इमेल पत्त्यावर लिहावे वा ‘थिंक महाराष्ट्र’च्या नंबरवर फोन (9892611767) करावा...

नाशिकच्या नवरात्रीत ब्रिटिश साहेबांचा गोंधळ!

0
नाशिकमधील गोदाकाठच्या श्री बालाजी मंदिराच्या नवरात्रोत्सवात एका ब्रिटिश अधिकाऱ्याने 1839 मध्ये अडथळा आणल्याने शहरात गोंधळ निर्माण झाला होता. ब्रिटिशांना तो गोंधळ थोपवण्यासाठी लष्कर बोलावावे लागले...

मोर्णाकाठची अकोलानगरी (Akola on the banks of Morna River)

0
अकोला हे शहर मोर्णा नदीच्या तीरावर वसलेले आहे. नदीचा उपयोग आक्रमण करणाऱ्या शत्रूविरुद्ध नैसर्गिक संरक्षणाची फळी असा होई, त्या काळची ही गोष्ट आहे. म्हणूनच मोर्णा नदीच्या पश्चिमेला आसदगडाची निर्मिती होऊन, त्याला लगत नागरी वस्त्या निर्माण झाल्या. अकोला शहराचा निश्चित कार्यकाल सांगता येत नाही. परंतु एक आख्यायिका प्रचलित आहे. अकोला शहराची भरभराट मोर्णेच्या साक्षीने झाली आहे. मोर्णा नदी ही विशेषत: जुन्या अकोल्याच्या लोकजीवनाचा अविभाज्य घटक होती...

श्रीरामवरदायिनी – श्री क्षेत्र पार्वतीपूर

श्री क्षेत्र पार्वतीपूर (पार) हे गाव प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेले आहे. ते महाबळेश्वर-पार या रस्त्याने महाबळेश्वरपासून वीस मैलांवर लागते. ते महाबळेश्वराच्या पश्चिमेस रडतुंडीच्या घाटापासून सहा मैल अंतरावर आहे. ते सातारा जिल्ह्यात येते. तो परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे, पण गावाला महात्म्य श्रीरामवरदायिनी देवीच्या सुंदर, पुरातन अशा मंदिराने लाभले आहे...

तीन पिढ्यांचे शिल्पकार (The teacher who shaped three generations)

चांगले शिक्षक आणि त्यांनी दिलेली शिकवण यांना मनातून कधी हद्दपार करता येत नाही. ते व्यक्तीच्या असण्याबरोबर, विचारांबरोबर असतातच. तीन पिढ्यांना शिकवणाऱ्या इनामदार सरांचे विद्यार्थी- आज तरुण ते वृद्ध वयातील त्यांच्या शिष्यांच्या मनात, घर करून आहेत. मंजूषा इनामदार-जाधव या त्यांच्या कन्या. त्यांच्या वडिलांना, वडील आणि गुरू या दोन भूमिकांमधून वावरताना त्यांच्या मनामध्ये उभे राहिलेले चित्र या लेखात आहे...

विसापूर – दापोलीच्या छायेत

विसापूर म्हणजे गुणवत्तेची खाण ! निसर्ग आणि मनुष्यसंपत्ती- दोन्हींची श्रीमंती. गाव दापोली तालुक्याहून मंडणगडकडे जाताना लागते. एकीकडे दापोली व दुसरीकडे खेड, हे दोन्ही तालुके प्रत्येकी बावीस किलोमीटरवर येतात. मंडणगड तालुका अठरा किलोमीटरवर तर महाड तालुका बत्तीस किलोमीटरवर आहे. म्हणून ते गाव मध्यवर्ती ठिकाण. गावाची रचना म्हणजे मध्यवर्ती विसापूर व सभोवताली नऊ वाड्या. गावाभोवती चहुबाजूंनी हिरवेगच्च डोंगर आहेत, गावातून कालवा काढलेला असावा अशी नदी वाहते...

कोळबांद्र्याच्या डिगेश्वराचा आनंदोत्सव !

1
भारताच्या सात लाख खेडेगावांमध्ये महादेवाचे मंदिर नाही असे गाव नसेल ! महादेवाच्या त्या मंदिरांतील भगवंताचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावातील महादेवाला वेगवेगळे नाव आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे महाराष्ट्राच्या पोलिस खात्याचे घोषवाक्य आहे. कोळबांद्रे गावातील डिगेश्वरही नेमके तेच काम करतो. गावात कोणी गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल माणसाला त्रास दिला तर ‘आता डिगेश्वराला नारळ देईन’ एवढे वाक्य जरी त्या गरीब माणसाने उच्चारले तरी तो दुष्ट घाबरून जातो...

कोळबांद्र्याच्या डिगेश्वराचा जन्म

0
दापोली तालुक्याच्या कोळबांद्रे गावात शंकराची पिंडी एका ढिगातून वर आली. ‘ढीग’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘डिग’ असा शब्द निर्माण झाला. त्यामुळेच त्या मंदिराला ‘डिगेश्वर मंदिर’ असे संबोधले जाऊ लागले. ब्रिटिश कालीन ह्या मंदिराचा 2015 साली जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरात असलेला नक्षीदार घुमट, मंदिरासमोरील त्रिपुर यामुळे मंदिरा भोवतीचे वातावरण तेजोमय वाटते...

घटस्थापना ते अक्षय्य तृतीया: पाणी, पाणी !

0
नवरात्रीत कुंभाची म्हणजे घटाची स्थापना केली जाते. त्या दिवशी तलावांची पूजा असते, तलावांच्या पाण्याचे हिशोब लावले जातात. ते पाणी येथील सजीव सृष्टीसाठी वर्षभर वापरणे आहे याची ती आठवण असते. त्याला अनुसरून पाण्याचे व्यवस्थापन ठरते. अक्षय्य तृतीयेला घटाचे दान करण्यास सांगितले आहे. ज्या समाजाजवळ भरलेला घट दान करण्याइतके पाणी शिल्लक असेल, तो समाज समृद्ध राहतो. आश्विन महिन्यातील घटस्थापनेच्या दिवशी समाजाच्या हाती असणारे पाणी काटकसरीने वापरत वापरत वैशाख महिन्यातील अक्षय्य तृतीयेपर्यंत शिल्लक ठेवावे असा तो संकेत आहे...

महालक्ष्मी मंदिर कांबीचे (Mahalakshmi Temple at Kambi)

कांबी गावचे महालक्ष्मी मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. गाभाऱ्यात छतावर कोरलेली महालक्ष्मीची मूर्ती हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य. महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या अंबाबाईनंतर कांबीच्या महालक्ष्मीची महती सांगितली जाते…