Tag: पुणे
मराठा घराण्यांची ऐतिहासिक नाणी
इतिहासात अनेक मराठा पराक्रमी घराणी होऊन गेली. मध्ययुगातील इतिहासप्रसिद्ध म्हणजे यादव राजघराणे. ते देवगिरी येथून राज्य करत होते. यादव राजवंशाची नाणी मुख्यतः सोने या धातूमध्ये आढळून येतात. यादवकालीन नाण्यांचे धातूची शुद्धता हे वैशिष्ट्य दिसून येते. त्यांनी चांदी व काही प्रमाणात तांबे या धातूंमध्येही नाणी पाडली...
डॉ. एकनाथ गोळे – कोकणविकासाचा ध्यास !
डॉ. एकनाथ मधुसूदन गोळे हे मुंबईच्या दादरचे की दापोली तालुक्यातील हर्णेचे असा प्रश्न पडावा इतके ते या दोन्ही गावांशी एकरूप झालेले होते. त्यांनी रेडिओलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस मुंबईत केली, परंतु त्यांनी हर्णे-दापोलीच्या विकासाचा ध्यास आयुष्यभर घेतला. तसे अनेक उपक्रम त्यांनी त्या तालुक्यात केले...
यकृताचे प्रत्यारोपण – दिनेश झिरपे
डॉ. दिनेश कुंडलिक झिरपे हे सध्याचे देशातील आघाडीचे लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आहेत ! ते शेवगावसारख्या ग्रामीण भागातून आले. त्यांनी Gastro Intestinal Surgery या विषयातील सुपर स्पेशॅलिटी विषयात राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत सुवर्ण पदकासह प्रथम क्रमांक पटकावला आहे...
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
मराठी संस्कृतीचा झळाळता प्रासाद राजकारण, समाजकारण, नाटक, वक्तृत्व आणि पत्रकारिता या पाच प्रमुख स्तंभांवर तोललेला आहे. महाराष्ट्रात कर्तृत्वसंपन्न व्यक्ती त्या एकेका क्षेत्रात होऊन गेलेल्या आहेत. पण एकाच व्यक्तीच्या अंगी हे सारे पैलू असलेली प्रतिभावान व्यक्ती म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे ...
जयंतराव टिळक – केसरीचे नवे रूप
पुण्यातील दोन खुणा जयंतराव टिळक यांची आठवण चिरकाल ठेवतील. शनिवारवाड्यासमोरचा पूल आणि त्यांच्या नावाने सहकार नगर येथे उभारलेले गुलाब पुष्प उद्यान. जयंतरावांचे गुलाब पुष्प प्रेम प्रसिद्ध आहे. त्यांनी गुलाब पुष्पाबद्दल पुणेकर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली. ते लोकमान्यांचे नातू होत...
शिवाजी, रामदास आणि गणेशोत्सव
संतकवी रामदास स्वामी व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना एकमेकांबद्दल आदर होता. लोकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे, संस्कृती रुजावी यासाठी शिवाजी राजे आणि रामदास स्वामी या दोघांनी मिळून गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध चार ते माघ शुद्ध पाच म्हणजे गणेश जयंतीपर्यंत, पाच महिने 1675 साली साजरा केला...
अवलिया कलावंत- वसीमबारी मणेर
फलटणचा वसीमबार्री मणेर हा अवलिया कलावंत आहे ! कला हा त्याच्या जगण्याचा ध्यास आहे. तो चित्रपट दिग्दर्शक-निर्माता, लेखक, चित्रकार, चलचित्रकार, शिक्षक, प्रकाशक, बालसाहित्यिक, स्थापत्य विशारद अशा विविध क्षेत्रांत, जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे मुशाफिरी करतो; सिनेनिर्मिती आणि लेखन कार्यशाळा घेतो...
कोळबांद्र्याच्या डिगेश्वराचा आनंदोत्सव !
भारताच्या सात लाख खेडेगावांमध्ये महादेवाचे मंदिर नाही असे गाव नसेल ! महादेवाच्या त्या मंदिरांतील भगवंताचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावातील महादेवाला वेगवेगळे नाव आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे महाराष्ट्राच्या पोलिस खात्याचे घोषवाक्य आहे. कोळबांद्रे गावातील डिगेश्वरही नेमके तेच काम करतो. गावात कोणी गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल माणसाला त्रास दिला तर ‘आता डिगेश्वराला नारळ देईन’ एवढे वाक्य जरी त्या गरीब माणसाने उच्चारले तरी तो दुष्ट घाबरून जातो...
ज्योतिष इतिहासकार शं.बा. दीक्षित
दापोलीचे शंकर बाळकृष्ण दीक्षित हे ज्योतिष शास्त्रातील विद्वान गणले जात. त्यांनी कालगणना व कालनिर्णय ह्या क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले. . दीक्षित यांनी रॉबर्ट सेवेल यांच्याबरोबर संयुक्तपणे लिहिलेला इंडियन कॅलेंडर हा इंग्रजी निबंध प्रसिद्ध झाला.पां.वा.काणे यांनीदेखील त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांच्या कामाचा धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्याच्या कामी उपयोग झाल्याचे नमूद केले होते...
भारतरत्न पां.वा. काणे (BharatRatna P.V. Kane)
भारतरत्न पांडुरंग वामन अर्थात पां.वा. काणे हे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी एका मानवी आयुष्यात विविध तऱ्हांचे ज्ञानसंशोधनात्मक व संघटनात्मक अफाट कार्य केले. त्यांचे सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी ‘भारतीय धर्मशास्त्राचा कोश’ आधुनिक काळात संकलित केला. तो पाच खंडांत व काही हजार पृष्ठांत आहे...