यवतमाळ
Tag: यवतमाळ
एकोणपन्नासावे साहित्य संमेलन (Forty-Nine Marathi Literary Meet 1973)
यवतमाळ येथे 1973 साली झालेल्या एकोणपन्नासाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ‘गीतरामायण’कार ग.दि. (गजानन दिगंबर) माडगूळकर ऊर्फ गदिमा. ‘गदिमा’ हे केवळ ‘गीतरामायण’ एवढे अप्रतिम काव्य लिहून साहित्यविश्वात अजरामर झाले असते. ते प्रासादिक, प्रतिभाशाली आणि प्रसन्न असे गीतकार होते. त्यांच्या गीतरचनेला कवितांचा दर्जा लाभला. त्यांच्या पटकथा-संवादांनीदेखील मराठी चित्रपटसृष्टीत अक्षरशः चमत्कार केला !माडगूळकर हे कोठल्याही मैफिलीचा ताबा घेत असत...
संत गजानन महाराज – शेगावीचा राणा (Saint Gajanan Maharaj of Shegaon)
शेगावचे मूळ नाव शिवगाव. ते शिवगाव असे तेथील प्रसिद्ध शिवमंदिरामुळे प्रथम पडले. त्या शिवगावचे झाले शेगाव. शृंग ऋषींनी वसवलेले गाव म्हणून शेगाव अशीही एक व्युत्पत्ती आहे. शेगाव हे वऱ्हाडातील बुलढाणा जिल्ह्यातील गाव. ते तालुक्याचे ठिकाण आहे. संत गजानन महाराज तेथे आल्यामुळे शेगावला देशभर अफाट प्रसिद्धी मिळाली आहे. शेगाव नगरी म्हणजे शिस्त, स्वच्छता आणि सुंदर नियोजनाचे उत्तम उदाहरण...
वक्ता दशसहस्रेषु… प्राचार्य राम शेवाळकर
राम बाळकृष्ण ऊर्फ ‘राम शेवाळकर’. ज्येष्ठ साहित्यिक, ख्यातकीर्त वक्ते, अध्ययन-अध्यापन-शैक्षणिक प्रशासन यांशी निगडित; तसेच, कला-साहित्य-संस्कृतीविषयक अशासकीय स्वायत्त विविध मंडळांचे सदस्य, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ...
बोरी खुर्दला वैभव नदीचे !
बोरी अरब हे गाव यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा या तालुक्यात येते. तेथील नदीला अडान नदी म्हणतात. त्या नदीमध्ये असलेल्या एका ठिकाणाला ‘लगीनबुडी’ असे म्हणतात. त्या गावचे माठ आणि चहा प्रसिद्ध आहेत. तेथे कापसाचा कारखानाही आहे...
वऱ्हाडातील वास्तूंची बुरूजसाद
वऱ्हाड प्रांतातील पुरातत्त्वीय स्थानांचा परिचय विवेक चांदूरकर या युवा संशोधकाने ‘उद्ध्वस्त वास्तू - समृद्ध इतिहास’ या पुस्तकात करून दिला आहे. या पुस्तकातील प्रत्येक नोंद ही ऐतिहासिक दस्तावेज ठरावा इतके मूल्य असलेली आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभला आहे...
स्थित्यंतर अचलपूर : गतवैभवाची फक्त साक्ष !
‘अचलपूरचा इतिहास म्हणजेच वऱ्हाडचा इतिहास’! या वचनात गावाचा शहराबद्दलचा अभिमान आहे. मात्र ते अचलपूर (आणि परतवाडा) हे शहर पार बदलून गेले आहे. संपन्नतेची साक्ष पटवणाऱ्या खुणा फक्त शिल्लक आहेत ! शहराच्या गतकाळातील वैभवाची साक्ष ऐतिहासिक वास्तूंमुळे पटते हे मात्र खरे ...
दंडारण – आंध जमातीचे लोकधर्मी नाट्य
‘दण्डार’ हा नृत्यप्रकार प्राचीन काळापासून चालत आलेला आंध जमातीचा नृत्यप्रकार आहे. निसर्गातील मानवाला जीवन देणाऱ्या महाभूतांविषयीची श्रद्धा हा दंडारणातील विविध कलाविष्कारांचा विषय असतो. आंधांची जीवनपद्धतच त्यांच्या नृत्यातून व्यक्त होते म्हणून त्याला लोकधर्मी संबोधले जाते...
विदर्भाची खाद्यसंस्कृती पानगे/रोडगे (पानगे/रोडगे यांतील सूक्ष्म भेद)
गव्हाच्या पीठापासून बनवला जाणारा पानगे/रोडगे हा पदार्थ विदर्भातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय. मार्गशीर्ष-पौष महिना सुरू झाला, की शेतात, तर कधी घरी पानग्याचा/रोडग्याचा बेत...
बाबांचे सहज काढलेले छायाचित्र अधिकृत ठरले!
अंगावर चिंध्यांचा वेष, डोक्यावर खापर, कानात डूल, हातात काठी असे ते छायाचित्र सर्वात अविस्मरणीय ठरले! गाडगेबाबांचे सहज काढलेले ते छायाचित्र इतके प्रसिद्ध झाले, की त्याचा वापर गाडगेबाबांचे अधिकृत छायाचित्र म्हणून सर्वत्र सुरू झाला...
चौदावे साहित्य संमेलन (Fourteenth Marathi Literary Meet 1928)
ग्वाल्हेर येथे भरलेल्या चौदाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते लोकनायक माधव श्रीहरी ऊर्फ बापूजी अणे. त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारताचार्य चिंतामणराव वैद्य हे स्वत: पुणे येथे 1908 साली भरलेल्या सहाव्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. माधव श्रीहरी अणे यांनी विशेष कोठल्याही प्रकारचे लेखन केलेले नाही.