Tag: पर्यावरण
पुण्यातील बाटल्यांचा बंगला
राजेंद्र इनामदार लोकांनी इकडे-तिकडे भिरकावून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या पाहिल्या की अस्वस्थ होत. मग त्यांनी त्या पोत्यात भरून गोळा करण्यास सुरुवात केली. दगडाचे चूर्ण, पाणी आणि फक्त सहा-सात टक्के सिमेंट यांचे पातळ मिश्रण त्या बाटल्यांत भरून साकारलेला त्यांचा बाटल्यांचा बंगला. या ‘बाटल्यांच्या बंगल्या’साठी त्यांनी आजपर्यंत ऐंशी हजार बाटल्या गोळा केल्या आहेत. त्या बाटल्यांची शक्ती किती दाबाने तुटू शकते ती क्षमता (क्रशिंग स्ट्रेंग्थ) तपासून पाहिली असता ती नेहमीच्या विटांच्या अडीच ते तीन पट जास्त भरली. यामुळे त्यांचा प्रयोगाचा उत्साह त्या ‘स्ट्रेंग्थ’च्या दुपटीने वाढला !
अनुपमा : आंबेडकरी विचारधारेतील स्त्रीत्व ! (Anupama- A lady inspired by Ambedkar’s thoughts writes...
‘अनुपमा’ हे अनागारिका माताजी अनुत्तरा म्हणजे पूर्वाश्रमीच्या अनुपमा अर्जुन बोरकर लिखित आत्मकथन आहे. ते आंबेडकरी चळवळीतील स्त्री आत्मभान जपणारे पुस्तक आहे. त्यात आंबेडकरी चळवळ, शैक्षणिक परिवर्तन, सामाजिक-धार्मिक परिवर्तन यांचा ऐतिहासिक संदर्भ येतो आणि त्यामुळे ते महत्त्वाचे ठरते...
सांगलीचे सायकलिंग जगाशी जोडलेले! (Bicycle is trending in Sangali)
सायकल हा नवा ट्रेंड समाजामध्ये तंदुरुस्तीसाठी म्हणून रुजत, वाढत आहे. सायकलस्वारी (सायकलिंग) हा खेळ, छंद, हौस म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. सायकल हे वाहन अनेक वाहनांच्या गलबल्यात स्थानिक प्रवास, छोट्या जा-ये करण्यासाठीदेखील उपयुक्त ठरत असल्याची जाणीव पुन्हा जनमनावर ठसत आहे...
सावंताचे सौरघट संशोधन – कोल्हापुरातून कोरियात झेप ! (Kolhapur boy Sawanta in solar energy...
सावता माळी पंढरपूर संतपीठाजवळच्या अरण गावचे. त्यांनी संत परंपरेत असाधारण स्थान मिळवले. तसा सावंता माळी हा कोल्हापूरजवळच्या शिवाजी विद्यापीठाचा तरुण स्नातक. तो जगातील सौर संशोधन क्षेत्र गाजवून राहिला आहे.
जलदेवी अमला रुईया व त्यांचा आकार ट्रस्ट (Amla Ruia’s water conservation work with Aakar...
अमला रुईया हे व्यक्तिमत्त्व भारतात पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये परिचित आहे. त्या या कार्याकडे राजस्थानात पडलेल्या दुष्काळांनी (1999-2000 आणि 2003) वळल्या.
वराहमिहीर: भूगर्भजलाचा पहिला अभ्यासक (Varahmihir – Groundwater Scientist of India’s history)
वराहमिहीर (सन 487 ते 550) हा विचारवंत, पर्यावरणतज्ज्ञ व निष्णात ज्योतिषी उज्जैनच्या (मध्यप्रदेश) परिसरात होऊन गेला. त्याचा ‘बृहत्संहिता’ हा अतिप्रसिद्ध असलेला ग्रंथ. त्यातील गर्भलक्षणाध्याय, गर्भधारणाध्याय, प्रवर्षणाध्याय आणि दकर्गलाध्याय असे चार अध्याय ‘पाणी’ ह्या विषयासंबंधी विस्तृत माहिती देतात.
पर्यावरण – प्रश्न आहे लाइफस्टाइलचा (Environment and the Lifestyle)
रिव्हर सिस्टिम ही भूगोलातील नवी संज्ञा. शाळेत नदीचा धडा म्हणजे माहीत असे, की उगम, टप्पे, खनन, वहन, भरण क्रिया आणि भूरूपे! नदीचे महत्त्व म्हणजे तिच्यापासून फक्त आणि फक्त माणसाला मिळवायच्या फायद्यांची यादी! आणि नंतर आला ‘Multidisciplinary Approach’? समर्थ रामदासांची उक्ती आहे- ‘भूगोळ आहे भूमंडळी’ आणि विश्वाची प्राचीनता हे प्रमाण मानले जाते माणसाच्या जगण्याचे.
वसईतील बावखलांचे निसर्गचक्र (Bavkhals In Vasai – Traditional Water Tank)
बावखल हा शब्द वसईच्या बोलीभाषेतील आहे. त्याचा अर्थ आहे - पाण्याने भरलेला, छोट्या तलावासारखा मोठा खड्डा होय (बाव म्हणजे विहीर आणि बावखल म्हणजे विहिरीजोगा मोठा खड्डा). तशी बावखले वसई परिसरात गावागावात असायची...
कर्जतच्या उल्हास नदीची निर्मलता! (Cleansing Ulhas River at Karjat)
व्यवसाय निवृत्ती घेतली आणि मन विदीर्ण झाले. सगळ्यांची जी अवस्था तशा परिस्थितीत होते तशीच ती मलाही वाटली. मन गुंतले पाहिजे - त्यासाठी काहीतरी असे काम करावे, की जे माझ्या जीवनाचे ध्येय असेल असेही वाटले.
अदिती देवधर : वाळलेल्या पानांचे सोने (Aditi Deodhar : Brown Leaf Movement)
पुण्याच्या अदिती देवधर यांनी ‘ब्राऊन लीफ’ हे आगळेवेगळे व्यासपीठ 2016 मध्ये सुरू केले. चार हजार लोक त्यात जोडले गेले आहेत. तो तंत्रज्ञानाचा अद्भुत आविष्कार आहे. सत्प्रवृत्त माणसे एकत्र येऊन काम करू शकतात याचे ‘ब्राऊन लीफ’ हे उदाहरण आहे!