Home Search
मंदिर - search results
If you're not happy with the results, please do another search
फलटणचे श्रीराम मंदिर
फलटणचे श्रीराम मंदिर जब्रेश्वर मंदिराच्या उत्तरेला आहे. ते मंदिर सगुणाबाई निंबाळकर यांनी शके 1696 मध्ये बांधले. मुख्य मंदिरापुढील लाकडी मंडपाचे बांधकाम मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांनी शके 1797 मध्ये केले. मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ व सभामंडप अशी आहे...
फलटणचे जब्रेश्वर मंदिर
फलटणला महानुभाव पंथीयांची ‘दक्षिणकाशी’ म्हणून ओळखले जात असे. तेथे महानुभाव पंथियांची अनेक मंदिरे आहेत. महानुभाव साहित्यात फलटणचा उल्लेख ‘पालेठाण’ म्हणून केलेला आढळतो. फलटणचे ‘जब्रेश्वर मंदिर’ आजही राजवाडा व श्रीराम मंदिर यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे...
परतवाडयाचे सव्वाशे वर्षांची परंपरा असलेले श्री विठ्ठल मंदिर
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा ही ऐतिहासिक वारसा लाभलेली जुळी शहरे होत. परतवाडयात आधी लष्करी छावणी होती. त्यानंतर कालांतराने तेथे गाव वसले. त्या परतवाडयाच्या वकील लाईन या परिसरात शहरातील सर्वात जुने अशी ओळख असलेले श्री विठ्ठल मंदिर आहे.
श्रीक्षेत्र नारायणपूर – नारायणेश्वराचे मंदिर (Narayaneshwar Temple of Narayanpur)
नारायणपूरचे नारायणेश्वर मंदिर यादवकालीन आहे. सहसा मंदिरे पूर्वाभिमुख असतात, पण ते पश्चिमाभिमुख मंदिर आहे. तेथे गर्भागृहात स्वयंभू शिवलिंग आहे. इतिहासाची साक्ष देणारे शिलालेख मंदिर परिसरात दृष्टीस पडतात. संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर शिल्पकला व नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना आहे...
मंदिर प्रवेशाचे महाभारत – संजयाच्या भूमिकेत
साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीतील अखेरचा आणि निर्णायक लढा पंढरपूरमध्ये लढला गेला. देवतांची मंदिरे म्हणजे सनातन्यांचे बालेकिल्ले. त्या चळवळीत ते बालेकिल्ले काबीज करून, त्यांचे दरवाजे अस्पृश्यांना खुले करण्यास महत्त्वाचे स्थान मिळाले. साने गुरुजी यांनी त्यासाठी प्राणांतिक उपोषण केले. त्यातून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रवेशाचे महाभारत घडले व त्याची परिणती हरिजनांना मंदिर प्रवेश मिळण्यात झाली...
केळशी महालक्ष्मी मंदिर – मोगलकालीन प्रभाव(Mahalaxmi Temple at Kelshi)
रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील महालक्ष्मी मंदिराची जी इमारत आहे, तिच्यावर दाक्षिणात्य आणि मोगलकालीन कलेचा ठसा आढळतो. तेथील ध्वनीवर्धन, उगवतीच्या व मावळतीच्या सूर्यकिरणांचा देवीच्या चरणांना होणारा स्पर्श, झरी, पोळी या आगळ्यावेगळ्या गोष्टी मंदिराचे सौंदर्य वाढवतात...
महालक्ष्मी मंदिर कांबीचे (Mahalakshmi Temple at Kambi)
कांबी गावचे महालक्ष्मी मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. गाभाऱ्यात छतावर कोरलेली महालक्ष्मीची मूर्ती हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य. महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या अंबाबाईनंतर कांबीच्या महालक्ष्मीची महती सांगितली जाते…
करगणीचे श्रीराम मंदिर (ShreeRam Temple of Kargani)
करगणीचे श्रीराम मंदिर हेमाडपंथी असून ते मूळ महादेव मंदिर आहे. आख्यायिकेनुसार, ‘श्रीरामांनी वनवासातील भ्रमंतीदरम्यान त्याठिकाणी वास्तव्य केले होते. श्रीशंकरांनी लक्ष्मणाला खड्ग आणि आत्मलिंग जिथे दिले, त्या जागी त्याने आत्मलिंगाची स्थापना केली, ते हे मंदिर.’ ग्रामस्थांच्या वतीने त्या देवस्थानाचा जीर्णोद्धार 1975 साली करण्यात आला. त्या वेळी गर्भगृहात श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती बसवण्यात आल्या…
श्री दत्त मंदिर: अचलपूरचा भुलभुलैया (Shri Datta Temple of Achalpur)
अचलपूर येथील दीडशे वर्षे जुने दत्त मंदिर हे भुलभुलैया मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराला धार्मिकतेबरोबर ऐतिहासिक व प्राचीन महत्त्व आहे. मंदिराचे बांधकाम शेसव्वाशे वर्षांपूर्वीचे असावे...
इंदापूरातील खाजगी मालकीची मंदिरे (Private Temples in Indapur)
इंदापूरचे वैशिष्ट्य म्हणजे पुण्याप्रमाणेच अनेक ब्राह्मण कुटुंबीयांची स्वतःची खाजगी मंदिरे तेथे आहेत.व्यंकटेशाचे मंदिर इंदापूरमधील सर्वात पुरातन आणि श्रीमंत मंदिर असावे...