Home सांस्‍कृतिक नोंद

सांस्‍कृतिक नोंद

हेल्यांची टक्कर इतिहासजमा ?

1
चौगाव गावी दिवाळीला कोणत्या हेल्यांची टक्कर लावायची हे आधीच ठरवलेले असायचे. ठरावीक लोकांकडचे हेले टक्करीसाठी तयार केलेले असायचे. सुरुवातीस, दोन्ही हेले एकमेकांचा अदमास घेत एकमेकांभोवती फिरायचे. शेवटी, एकमेकांचे डोके एकमेकांना भिडायचे. लोक हुर्यो करून ओरडायचे. हेल्यांना चेव चढायचा. कोणी डोक्याची ताकद वापरायचा तर कोणी शिंगांचा वापर करायचा...

सांस्कृतिक जग कोठे हरवले?

महाराष्ट्राचे संस्थाजीवन औपचारिक झाले आहे का? जुन्या संस्थांचे नित्याचे कार्यक्रम नियमित होत असतात. प्रकाशन समारंभांसारखे प्रासंगिक कार्यक्रम मोजक्याच श्रोत्यांच्या उपस्थितीत कौटुंबिक हौस-मौज वाटावी अशा तऱ्हेने घडून जातात. कौतुकाच्या समारंभांत उपचार अधिक असतो आणि वाद-टीका, उलटसुलट वार-प्रतिवार असे काहीच सार्वजनिक जीवनात घडताना दिसत नाही. माणसा माणसांतील स्नेह, जिव्हाळा ओलाव्याने व्यक्त होतानाही जाणवत नाही. ज्या बातम्या समोर येतात त्या अत्याचारादी विकृतीच्या आणि राजकारणातील गुन्हेगारीच्या. त्यांतील कट-कारस्थाने पाहिली की दीपक करंजीकरांच्या कादंबऱ्यांची आठवण येते. समाजातील चैतन्य हरपले कोठे आहे?

साने गुरुजी संकेतस्थळाचे लोकार्पण

महाराष्ट्रात जन्माला आलेल्या असामान्य व्यक्तींचे कार्य आजच्या पिढीसमोर सतत राहायला हवे या उद्देशाने ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ने त्यांच्या जीवनाविषयी व कार्याविषयी माहिती देणारी सविस्तर ‘संकेतस्थळे’ तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. संकेतस्थळावर या व्यक्तींचे चरित्र, विचारधारणा, कार्य, दुर्मिळ दस्तावेज, फोटो इत्यादी साहित्य संग्रहित केले जाईल. अशा तीनशेहून अधिक असामान्य व्यक्तींची यादी करण्यात आली आहे. ज्या मुख्य संकेतस्थळावर प्रत्येक व्यक्तीविषयीच्या लिंक उपलब्ध असतील त्या संकेतस्थळाला ‘महाभूषण’ असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ म्हणून साने गुरुजींवरील संकेतस्थळाचे लोकार्पण आज होत आहे. वाचक www.mahabhushan.com याद्वारे संकेतस्थळाला भेट देऊ शकतील...

गोविंद वल्लभ पंत यांचे ओंड (Ond of G.V. Pant)

भारताचे पहिले गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत व नामवंत साहित्यिक कृ.पां. कुलकर्णी हे ओंड या गावचे सुपुत्र. या गावाची पदवीधरांचे गाव म्हणून ओळख आहे...

यशोगाथा, पाणीदार धोंदलगावची…

0
वैजापूरमधील धोंदलगावाने गेली पंचेचाळीस वर्षे पाणीटंचाईची झळ सोसली आहे. त्या गावात आनंद असोलकर या जादूगाराने येऊन गावातील नागरिकांना पाणी अडवण्याचे महत्त्व समजावले आणि ते फक्त लोकसहभागातून शक्य आहे ही भावना त्यांच्या मनी बिंबवली...

बैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना

0
शंभर वर्षांपूर्वी घोडागाडी, बैलगाडी चालवण्यासाठी परवान्याची सक्ती होती. तो परवाना जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सहीने दिला जाई. तसेच, घरात रेडिओ लावण्यासदेखील परवाना आवश्यक होता. त्याचे दरवर्षी नुतनीकरण करावे लागे...

कोळबांद्र्याच्या डिगेश्वराचा जन्म

0
दापोली तालुक्याच्या कोळबांद्रे गावात शंकराची पिंडी एका ढिगातून वर आली. ‘ढीग’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘डिग’ असा शब्द निर्माण झाला. त्यामुळेच त्या मंदिराला ‘डिगेश्वर मंदिर’ असे संबोधले जाऊ लागले. ब्रिटिश कालीन ह्या मंदिराचा 2015 साली जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरात असलेला नक्षीदार घुमट, मंदिरासमोरील त्रिपुर यामुळे मंदिरा भोवतीचे वातावरण तेजोमय वाटते...

श्रीक्षेत्र नारायणपूर – नारायणेश्वराचे मंदिर (Narayaneshwar Temple of Narayanpur)

नारायणपूरचे नारायणेश्वर मंदिर यादवकालीन आहे. सहसा मंदिरे पूर्वाभिमुख असतात, पण ते पश्चिमाभिमुख मंदिर आहे. तेथे गर्भागृहात स्वयंभू शिवलिंग आहे. इतिहासाची साक्ष देणारे शिलालेख मंदिर परिसरात दृष्टीस पडतात. संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर शिल्पकला व नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना आहे...

पंचांग – टिळक की दाते (Lokmanya Tilak Reforms Indian Traditional Almanac)

पंचांग हे नुसते ग्रहताऱ्यांचे गणित नसून ते धर्मशास्त्राशी जोडलेले आहे. महाराष्ट्रात सध्या जी पंचांगे प्रामुख्याने वापरात आहेत ती म्हणजे दाते, कालनिर्णय, निर्णयसागर, महाराष्ट्र पंचांग, रूईकर, लाटकर आणि टिळक पंचांग. त्यांतील शेवटचे, टिळक पंचांग यास वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे...

गायीम्हशींसाठी माणसाची कृतघ्नता

0
माणसाच्या बाबतीत, माय स्वत:च्या बाळाला अंगावर दूध पाजते. बाळाला ती स्तनपान करते. निसर्गाने बाळासाठीच आईच्या शरीरात ती योजना केली आहे. मग गाय, म्हैस यांचेही दूध, खरे तर, त्यांच्या बाळांसाठीच असण्यास हवे ना ? परंतु आधुनिक काळात भावना नष्ट होत आहेत...