तुर्कस्थानच्या ऑटोमन साम्राज्यात एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस घटनात्मक लोकशाहीसाठी राजकीय सुधारणांच्या मागणीकरता तरुण तुर्कांची (यंग टर्क्स) चळवळ सुरू झाली.
भारतात सुमारे चारशेसाठ देशी संस्थाने होती. त्यांपैकी पंधरा-सोळा संस्थाने बरीच मोठी होती. हैदराबाद, म्हैसूर व काश्मीर ही तीन त्यांपैकी. हैदराबादचे एकूण क्षेत्रफळ ब्याऐंशी हजार सहाशेअठ्ठ्याण्णव चौरस मैल आणि तेथील लोकसंख्या एक कोटी त्रेसष्ट लाख अडतीस हजार होती.
शेतमालक त्याच्या शेतात कामावर गावातील गरीब स्त्री-पुरूषांना ठेवतात. शेतात काम करणाऱ्या मजुरांचे साधारणपणे तीन प्रकार असत- 1. रोजंदार, 2. महिनादार, 3. सालंदार.
शेतमालक त्याच्या शेतात कामावर गावातील गरीब स्त्री-पुरूषांना ठेवतात. शेतात काम करणाऱ्या मजुरांचे साधारणपणे तीन प्रकार असत- 1. रोजंदार, 2. महिनादार, 3. सालंदार.
'संयुक्त मानापमान' या संगीत नाटकाचा प्रयोग हे मराठी रंगभूमीवरील एक विलक्षण 'घटित' होते. तो प्रयोग 8 जुलै 1921 रोजी मुंबईच्या बालीवाला थिएटरमध्ये रंगला होता. त्या प्रयोगाला अनेक व्यक्ती, घटना, प्रेक्षकांच्या क्रियाप्रतिक्रिया, निर्माण झालेला माहोल यांचे संदर्भ आहेत...
कोंडगाव-साखरपा गावातील अश्वारूढ गणेश मूर्तींची परंपरा प्रसिद्ध आहे. परंपरेला शतकभरापेक्षा जास्त इतिहास आहे. त्या परिसरात अभ्यंकर, केतकर, केळकर, जोगळेकर, सरदेशपांडे, पोंक्षे, रेमणे, नवाथे ही घराणी पूर्वापार वास्तव्य करून आहेत...
कोड्याबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका ऐकण्यास मिळतात. मणेराजुरीत कलावंतीण राहण्यास आली. तिने तिची कला सादर करताना, तिच्या बुद्धीच्या जोरावर अनेक मातब्बरांना, राजे-रजवाड्यांना पराभूत केले. तिने तिच्या बुद्धिसामर्थ्याने माळरानावर लहानमोठ्या दगडगोट्यांचे कोडे मांडले.
होय. आम्ही वसईकर आहोत. कारण आमचा धर्म, गोत्र, जात, आर्थिक परिस्थिती, रंग, रूप, काहीही असले, तरी आम्हाला बांधते ते एकच नाते - आम्ही वसईकर ! भारत देश किती मोठा आणि विस्तीर्ण; आणि किती विविधतेने भरलेला आहे !
कोकण आणि कॅलिफोर्निया अशी तुलना हल्ली होत नाही. पूर्वी म्हणजे ज्यावेळी कोकणाला उघड उघड दरिद्री संबोधले जाई, त्या काळी नेहमी कोकणासमोर कॅलिफोर्नियाचा आदर्श ठेवला जात असे...
‘सोलापूर मार्शल लॉ’चे प्रकरण, त्याचा निकाल लागून गेल्यानंतरही चिघळत राहिले आणि त्याचे पर्यवसान ‘मार्शल लॉ’चे कर्ते अर्नेस्ट हॉटसन यांच्यावर गोळ्या झाडण्यात झाले. तो इतिहास रोमहर्षक आहे...
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सोलापुरला ‘मार्शल लॉ’चे महाभारत घडून आले. त्याआधी तेथे चक्क चार दिवस स्वराज्य होते. त्याला सोलापूरकर ‘गांधीराज’ म्हणत होते. अर्थात ते अचानक, एकाएकी घडले नाही.