गणपत लक्ष्मण कोण होते? (Ganpat Laxman’s Writing Published After One Hundred Fifty Years!)

मुंबई व आसपासच्या भागातील हिंदू कुटुंबे 1840 च्या आगेमागे कशी होती? घरात वातावरण कशा प्रकारे होते? मुलांचे संगोपन कशा प्रकारे केले जात असे? घरातील स्त्रियांची स्थिती कशी होती?

संगीत दिग्दर्शक सी रामचंद्र (Music Director C Ramchandra)

7
सी रामचंद्र हे हिंदी चित्रपटांमध्ये यशस्वी संगीत दिग्दर्शक होते. ते 1947 च्या फिल्म ‘शहनाई’पासून 1959 च्या ‘नवरंग’पर्यंत म्हणजे सुमारे बारा वर्षे कीर्तिशिखरावर होते. त्यांनी आरंभीच्या काळात संगीत दिलेला ‘अनारकली’ चित्रपट सुवर्णमहोत्सवी ठरला होता.

रा. वि. भुस्कुटे यांचा आदिवासींसाठी लढा! (R.V.Bhuskute – Activist for the cause of Downtrodden)

रा.वि.भुस्कुटे ऊर्फ भाऊ भुस्कुटे यांचे जीवितकार्य 16 एप्रिल 2020 रोजी संपुष्टात आले. त्यावेळी ते पंच्याण्णव वर्षांचे होते. ते त्यांच्या ध्येयासाठी त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत जगले आणि झटले.

विमामहर्षी वासुदेव गणेश तथा अण्णासाहेब चिरमुले (Anna Chirmule – Father of Indian Insurance)

2
इंग्रजांनी मराठी राज्य जिंकले (1818) व त्यायोगे इंग्रजी अंमल हिंदुस्तानच्या बहुतेक सर्व क्षेत्रांवर लागू झाला. तेथून पुढे नव्या मनूचा उदय सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक वगैरे क्षेत्रांमध्ये घडून आला. विविध ज्ञानशाखांची ओळख भारतीयांना इंग्रजी भाषेच्या प्रसारामुळे झाली. त्याचप्रमाणे, जगात घडणाऱ्या घडामोडी भारतीयांना कळू लागल्या. भारतीयांना इतर देशांमध्ये आर्थिक क्षेत्रात काय घडत आहे याचे ज्ञान होऊ लागले.

भीमसेन जोशी – बुलंद आवाजातील करुणासागर (Tribute to Bhimsen Joshi)

ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर अशा घराण्यांतील किराणा घराण्याचे पांथस्थ म्हणजे भारतरत्न संगीताचार्य स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी हे होत. त्यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील रोण या त्यांच्या मावशीच्या गावी 4 फेब्रुवारी 1922 रोजी झाला.

तत्त्ववेत्ता अ.भि. शहा (A. B. Shah – Reformist, Philosopher)

भारतीय समाजात सेक्युलर आणि मानवी मूल्यांची रुजवणूक करण्याची मोहीम साठ-सत्तरच्या दशकात जोर धरू लागली. मोजक्या व्यक्ती, संस्था आणि संघटना त्यासाठी कार्यरत होत्या. त्यांत प्रा.अ.भि. शहा यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांची ओळख इंडियन सेक्युलर सोसायटीचे संस्थापक किंवा सोसायटीमार्फत चालवल्या गेलेल्या नियतकालिकांचे लेखक-संपादक यांपुरती मर्यादित नाही.

शंकरदेव आसाममधील वैष्णव चळवळीचा प्रणेता (Shakardev – Vaishnav Saint In Assam)

विष्णूच्या भक्तीचे कार्य ईशान्येकडील राज्यांत करणारे महापुरुष म्हणजे श्री शंकरदेव. त्यांची वैष्णव चळवळ आसाम राज्यात ‘महापुरुषीय धर्म' या नावाने प्रसारित झाली. विष्णुभक्ती भारताच्या विविध प्रांतांत चैतन्य महाप्रभु, संत कबीर, बसवेश्वर, रामानंद यांनी नेली;

महात्मा गांधीजी आणि व्यंगचित्रे (Gandhi in World Cartoons)

भारतीय गूढ तत्त्वज्ञानाने पाश्चिमात्य जगाला नेहमीच भारून टाकले आहे; तसेच, कुतूहल भारतीय जादूटोणा, तांत्रिक-मांत्रिक, साधू-फकीर यांनी तेथे निर्माण केले आहे. अखिल आधुनिक पाश्चिमात्य जगावर मोहिनी घालणारा खराखुरा ‘नंगा फकीर’ म्हणजे मोहनदास करमचंद गांधी! महात्माजींना ‘नंगा फकीर’ ही पदवी दिली, ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नसे अशा इंग्लंडच्या अत्यंत प्रभावी पंतप्रधानांनी, म्हणजे चर्चिल यांनी...

अहिल्याबाईंच्या गौरवार्थ इंग्रजी पोवाडा (English Ballad in Praise of Ahilyabai Holkar)

1
अहिल्याबाई होळकर ही मराठ्यांच्या आणि त्यामुळे भारताच्या इतिहासातील एक प्रमुख स्त्री. झाँसीची राणी लक्ष्मीबाई हिच्या बरीच अगोदर आणि बऱ्याच वेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या त्या व्यक्तीबद्दल ब्रिटिश समाजातही आदर होता,

महेंद्र प्रताप हीदेखील हाथरसचीच ओळख (Freedom Fighter Mahendra Pratap Also Hails From Hathras)

3
काय योगायोग आहे, पाहा! काही योगायोग आवडू नये, असे असतात तशातीलच हा. पण त्यामधूनही दिलासा मिळतो! हाथरस नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण गेला महिनाभर गाजत आहे.