कवी द.रा. बेंद्रे : मातृभावातील दिव्यत्व (Strength of Motherhood : Marathi-Kannad bilingual Poet D...
दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांची मातृभाषा मराठी, पण त्यांनी ‘ज्ञानपीठ’ हा साहित्यातील अत्युच्य सन्मान कन्नड भाषेत लेखन करून मिळवला ! ते कवी होते. द.रा. बेंद्रे यांना ‘ज्ञानपीठ’ हा पुरस्कार मिळून पन्नास वर्षे पूर्ण झाली. बेंद्रे यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराच्या वेळी जे प्रशस्तिपत्र देण्यात आले त्यात लिहिले आहे, की “पुरस्कारपात्र ‘नाकुतन्ती’ या कन्नड काव्यसंग्रहातून वर्तमानाचे उपहासात्मक रूप, सांस्कृतिक भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा सशक्त प्रतीकांद्वारे निष्कर्ष; तसेच, स्थायी व समग्रात्मक मूल्यांचे समर्थन प्रस्तुत केले गेले आहे. बेंद्रे यांच्या काव्यात एखाद्या गोष्टीचे प्रकटीकरण व रूपांतरण करण्याची क्षमता आहे. त्यात व्यक्तीपासून समष्टीपर्यंतच्या सर्व गोष्टींचा समावेश आहे.” बेंद्रे यांच्या नंतरच्या वर्षीचा 1974 चा पुरस्कार मराठी भाषेतील लेखक वि.स. खांडेकर यांना मिळालेला आहे...
म्हणी- मराठी भाषेचे अंतरंग (Proverbs – Heart of Marathi Language)
म्हण’ या शब्दाची निर्मिती संस्कृतमधील ‘भण’ या धातूचा अपभ्रंश होऊन झाली आहे. म्हण ही लोकांच्या तोंडी सतत येऊन दृढ होते. न.चिं. केळकर यांनी म्हणीची व्याख्या ‘चिमुकले, चतुरणाचे, चटकदार असे वचन अशी केली आहे. कोशकार वि.वि. भिडे म्हणतात, ‘ज्यात काही अनुभव, उपदेश, माहिती, सार्वकालिक सत्य किंवा ज्ञान गोवलेले आहे, ज्यात काही चटकदारपणा आहे आणि संभाषणात वारंवार योजतात असे वचन म्हणजे म्हण होय.’ दुर्गा भागवत यांनी ‘जनतेने आत्मसात केलेली उक्ती म्हणजे म्हण’ असे म्हटले आहे. वा.म. जोशी म्हणतात, ‘थोडक्यात व मधुर शब्दांत जिथे पुष्कळ बोधप्रद अर्थ गोवला जातो, त्या वाक्यांना म्हणी असे म्हणतात’...
संत एकनाथ यांच्या गवळणी
संत एकनाथ यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे आणि ज्ञानदेवांच्या समाधीचे संशोधन प्रथम केले !. नाथांनी त्यांच्या वाङ्मयातून भागवत धर्माच्या परपंरेचे सातत्य आणि विकास साधला. त्यांचे नाथ भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण हे तात्त्विक चिंतनपर ग्रंथ. नाथांच्या आत्माविष्काराला वाट मिळते ती प्रामुख्याने त्यांच्या स्फूट रचनेतून. तशा स्फूट रचनांत अभंग, भारुडे, गवळणी, विरहिणी, कृष्णकथा, पदरचना अशा साऱ्यांचा समावेश होतो. संत एकनाथ यांच्या गवळणी विशेष प्रसिद्ध आहेत...
मोरपंखी आठवणी आखाजीच्या (अक्षय तृतीया)
अक्षय तृतीया म्हणजेच आखाजी हा सण वैशाख शुद्ध तृतीयेस साजरा केला जातो. त्या दिवशी कृतयुगाचा आरंभ होतो असे म्हणतात. तो पवित्र दिन म्हणून विविध धर्मकृत्ये, पुण्य, दानधर्म, हवन, सत्कर्म करून पुण्यसंचय केला जातो. परशुराम जयंती त्याच दिवशी असते. चैत्रात बसवलेल्या गौराईचे विसर्जनही त्या दिवशी होते. खानदेशातील अक्षय तृतीया (आखाजी) म्हणजे सासुरवाशिणीला मुक्तिदिनच असतो. लग्न होऊन सासरी गेलेल्या विवाहितेला माहेरी येऊन सासरचा थकवा, सल, बोच, कढ व्यक्त करण्याचे मोकळेपण तेव्हाच लाभते. चैत्र-वैशाखाच्या उन्हासोबत तिची माहेरची हुरहूर, ओढ वाढावी अन् माहेरच्या वाटेकडे डोळे लागावे अशी भावावस्था आपोआप आखातीच्या मुहूर्ताला जमा होते. त्यामुळे मुलीमहिलांचा आनंदोत्सवच तो...
ज्ञानकमळ रांगोळी (Dnyankamal Rangoli)
ज्ञानकमळ नावाची एक रांगोळी प्रसिध्द आहे. त्या रांगोळीच्या मागे अंधश्रध्दा अशी होती, की ग्रहणाच्या काळात ज्ञानकमळ काढण्यास शिकले, की बुध्दी वाढते ! मी एका ग्रहणकाळातच ज्ञानकमळ रेखाटण्यास शिकले. या रांगोळीसाठी गणिती तत्त्व (मॅथेमॅटिकल फॉर्म्युला) वापरला जातो. मी माझे बालपण संपल्यानंतर कित्येक वर्षांत ते ज्ञानकमळ काढले नाही, पण तरी संख्यांचा तो क्रम पक्का डोक्यात बसला. शेकडो वर्षांपूर्वी कोणातरी पणजी वा खापरपणजीने हा क्रम ठरवून ज्ञानकमळाची रचना केली असणार, तिला संख्याज्ञान असेल का? की फक्त 1 ते 10 आकडे मोजता येत असतील? असे प्रश्न माझ्या मनात अनेकदा उठले...
वृद्धाश्रमी… – स्वाभाविक, अपरिहार्य जीवनावस्था
माणसे वृद्धत्वाकडे सरकू लागतात तेव्हा त्यांना अनेक धक्के बसू लागतात. आयुष्याच्या संध्याकाळी अधिक भय वाटते ते मृत्यूचे आणि परावलंबित्वाचे. वार्धक्य म्हणजे दुसरे बालपण. शरीराच्या अवयवांची शक्ती मंदावत जाते, रिकामपण खाण्यास उठते. त्यातून नैराश्य येऊ लागते. व्यक्तीचे सामाजिक व कौटुंबिक जीवन हेदेखील सामूहिक न राहता वैयक्तिक बनले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य दीनवाणे झाले आहे. पण वृद्धत्व हे स्वाभाविक आणि अपरिहार्य आहे. त्यामुळे ते तशाच पूर्वतयारीने स्वीकारले पाहिजे. ही तयारी मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर असते. शारीरिक हालचाली मंदावत जात असतात. त्यासाठी आवश्यक तो व्यायाम, आहार आणि औषधे घ्यावी लागतात; तर मानसिक पातळीवर वृद्धांना सहवास आणि प्रेम यांची गरज असते...
स्वभाषा : संस्कृती व समाज यांच्यासाठी गरजेची ! (Society, it’s culture and the language)
मी माझा धाकटा मुलगा रघुराज याच्याकडे सिडनीला आलो आहे. मुलाची बायको - बीॲट्रिस ही मलेशियन-चायनीज-ऑस्ट्रेलियन आहे. म्हणजे तिचा जन्म मलेशियात झाला. ती दहा वर्षांची असताना लिंम कुटुंब, मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून ऑस्ट्रेलियात 1980 च्या सुमारास आले. हल्ली बऱ्याचशा मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येकी एक तरी मुलगा किंवा मुलगी परदेशात स्थायिक झालेले आहेत. त्यांतील काही जणांनी परदेशी मुलींशी लग्ने केली आहेत. तेव्हा भाषा टिकवायची कशी? हा मोठा प्रश्न आहेच...
एस.एम. जोशी यांच्या नावे संकेतस्थळ (VMF’s website released to cover S M Joshi’s life...
प्रख्यात समाजवादी नेते एस.एम. जोशी यांच्या नावाचे संकेतस्थळ ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे मुख्य संपादक दिनकर गांगल आणि गिरीश घाटे यांनी ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’साठी पुण्यामध्ये एका बैठकीत खुले केले. त्यामुळे एस.एम. जोशी यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे विचारकार्य जगभरच्या लोकांना एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे. एस.एम. यांचे संकेतस्थळ हा ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या ‘महाभूषण’ प्रकल्पाचा एक भाग आहे. यापूर्वी साने गुरूजी आणि रामानंद तीर्थ यांची संकेतस्थळे तयार केली आहेत. अनेक संकेतस्थळे निर्माण करून ती सार्वजनिक रीत्या लोकांना दृश्यमान होतील अशी सायबरस्पेसमध्ये ठेवण्याचा ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चा संकल्प आहे...
विनोबा, बाळकोबा, शिवबा – भावेबंधूंची अद्भुत त्रयी !
महाराष्ट्राच्या परंपरेत निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपानदेव या भावंडांची एक अद्भुत त्रयी आहे. तसे नवल महाराष्ट्र देशी पुन्हा, सातशे वर्षांनंतर घडले ! कोकणात पेणजवळील गागोदे गावी (रायगड जिल्हा) विनायक, बाळकृष्ण आणि शिवाजी हे तीन भाऊ नरहर भावे यांच्या घरी जन्माला आले. विनोबा मोठे आहेत, बाळकोबा मधले आणि शिवाजीराव धाकटे. निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान यांच्या मुक्ताबाईसारखी भावे बंधूंची एक भगिनी- शांता ही होती. शांताला तिच्या जीवनाची वाट स्वतंत्रपणे चालावी लागली. तिन्ही भावेबंधूंनी लौकिकाला अभिवादन करून अध्यात्मवाटेवर वाटचाल केली. मोक्ष हे त्यांचे लक्ष्य होते. ब्रह्मजिज्ञासा हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता...
गरूडपाड्याची गावकी (Garudpada model of village based civil society)
मी गावकी हा शब्दच मूळात ऐकला तो 2014 साली. आम्ही रोहा रोडवरील गरूडपाडा गावात डिसेंबर 2014 ला राहण्यास आलो. पंचावन्न-साठ घरांचे चिमुकले गाव. तोपर्यंतचे सगळे आयुष्य शहरात गेले आणि त्यातील अर्ध्याहून अधिक महानगरात घालवले, त्यामुळे ‘खेड्यातील घरा’चे स्वप्न अनुभवणे बाकी होते. गावाचे गरूडपाडा हे नाव कसे पडले, कधीपासून गाव वसले असे प्रश्न मनात आले. खरे तर, शासन दरबारी गरूडपाडा गाव अस्तित्वात नाही. समोर काविर नावाचे गाव आहे त्याचाच उल्लेख सापडतो. काविरच्या रहिवाशांची शेते या गावात होती. ते त्यासाठी येथे येत आणि ‘पाड्यावर जातो’ असा उल्लेख करत...