सतरावे साहित्य संमेलन (Seventeenth Marathi Literary Meet – 1931)

हैदराबाद येथे भरलेल्या सतराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानकोशकार डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर हे होते. केतकर हे मराठी भाषेतील कोशयुगाचे प्रवर्तक होत. त्यांचे आयुष्य ज्ञानाच्या उपासनेतच व्यतित झाले. त्यांनी ‘गोविंदपौत्र’ या टोपणनावाने कविता लिहिल्या...

सोळावे साहित्यसंमेलन (Sixteenth Marathi Literary Meet – 1930)

मडगाव (गोवे) येथे भरलेल्या सोळाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ‘रागिणी’कार वामन मल्हार जोशी. कादंबरीकार वि.स.खांडेकर यांनी वामन मल्हार यांचा ‘नैतिक उंचीचा आदर्श’ असा उल्लेख केला होता. वामन मल्हार यांचे सर्व साहित्य हे सजीव ध्येयवादाने भारलेले आणि विचारांना प्रेरणा देणारे होते. त्यांच्या कादंबऱ्यांतून नवी स्त्री आणि स्त्रियांच्या प्रश्नांची जाणीव प्रभावीपणे व्यक्त झाली आहे...

पंधरावे साहित्य संमेलन (Fifteenth Marathi Literary Meet – 1929)

बेळगाव येथे भरलेल्या पंधराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘काळ’कर्ते शिवराम महादेव परांजपे हे होते. ते स्वातंत्र्याच्या चळवळीतील आघाडीचे वक्ते, तरुण पिढीला आकर्षित करणारी लेखनशैली असलेले स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व होते.

चौदावे साहित्य संमेलन (Fourteenth Marathi Literary Meet 1928)

ग्वाल्हेर येथे भरलेल्या चौदाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते लोकनायक माधव श्रीहरी ऊर्फ बापूजी अणे. त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारताचार्य चिंतामणराव वैद्य हे स्वत: पुणे येथे 1908 साली भरलेल्या सहाव्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. माधव श्रीहरी अणे यांनी विशेष कोठल्याही प्रकारचे लेखन केलेले नाही.

तेरावे साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1927)

तेराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. ते मराठीतील विनोदी वाङ्मयाचे आद्यप्रवर्तक होत. ‘सुदाम्याचे पोहे’हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह म्हणजे मराठी वाङ्मयाचे भूषण मानले जाते. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता.

बारावे साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1926)

बारावे साहित्य संमेलन मुंबई येथे 1926 साली साजरे झाले. ते अकराव्या संमेलनानंतर पाच वर्षांनी भरले होते. त्याचे अध्यक्ष सरदार माधवराव विनायकराव किबे होते. साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकर यांच्यासारखा चतुरस्र अध्यक्ष झाल्यावर पुढील साहित्य संमेलनाचा अध्यक्ष किमान उत्तम साहित्यिक असावा अशी अपेक्षा होती. पण सरदार किबे यांचे नाव साहित्य क्षेत्रात त्या तोडीचे मानले गेले नाही.

अकरावे साहित्य संमेलन(Marathi Literary Meet 1921)

अकरावे साहित्य संमेलन 1921 साली बडोदे येथे भरले होते. त्याचे अध्यक्ष साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण ऊर्फ तात्यासाहेब केळकर हे होते. दहाव्या संमेलनानंतर चार वर्षांनी.

दहावे साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1917)

इंदूर येथे भरलेल्या दहाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गणेश जनार्दन आगाशे हे व्युत्पन्न पंडित होते. त्यांचे प्रभुत्व मराठी, इंग्रजी आणि संस्कृत ह्या तिन्ही भाषांवर होते. त्यांनी त्या तिन्ही भाषांमध्ये कविता लिहिल्या होत्या...

नववे साहित्य संमेलन (Marathi Literature Meet 1915)

नववे साहित्य संमेलन 1915 साली मुंबई येथे मिरज संस्थानचे संस्थानिक श्रीमंत गंगाधरराव पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. गंगाधरराव पटवर्धन हे तसे पाहिले तर साहित्यिक नव्हते.

आठवे साहित्य संमेलन (Marathi Literature Meet – 1912)

आठवे साहित्य संमेलन बडोदे येथील सातव्या संमेलनानंतर (1909) तीन वर्षांनी, 1912 साली विदर्भातील अकोला येथे श्रीराम नाटकगृहात भरले होते. कादंबरीकार आणि गुजगोष्टीकार हरी नारायण आपटे हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.