Home वैभव खाद्यसंस्‍कृती

खाद्यसंस्‍कृती

धरणगाव – बाजार व संस्कृती यांनी उत्सव संपन्न ! (Dharangaon – can culture prevail...

धरणगाव हे शहरवजा गाव जळगाव जिल्ह्याच्या मूळ एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठे गाव होय. ते मोठे असल्यामुळे, खरे तर, धरणगाव हेच तालुक्याचे गाव वाटे. त्याप्रमाणे एरंडोल तालुक्याचे विभाजन 2008 मध्ये होऊन स्वतंत्र धरणगाव तालुका अस्तित्वात आला. धरणगावची नगरपालिका 1867 मध्ये स्थापन झाली होती...

लाडूच लाडू -विचित्र नावांचे स्वादिष्ट लाडू (Laddus with Strange Names)

किती चित्रविचित्र नावांचे लाडू या जगात आहेत याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. उदाहरणार्थ, ‘खडखडे लाडू’. मालवण पट्टयात मिळणाऱ्या कडक बुंदीच्या लाडवांना खडखडे लाडू म्हणतात. तेथील लाडू जाड शेवेचे, काजूचे आणि खडखडे लाडू खडखड करत पोराबाळांनी खावेत किंवा दात पडलेल्या म्हाताऱ्याकोताऱ्यांनी वेळ जावा म्हणून चघळत बसावेत किंवा डब्यात खडखड वाजत असावेत म्हणून खडखडे. बेळगावकर सारस्वत लोकांच्या दिवाळीत ‘लडगी लाडू’ असतात. ‘खूळे लाडू’ नावाचे लाडू बेळगाव ते संकेश्वर भागात गणपती विसर्जनाच्या वेळी बनवतात...

केळशी गावचे पारंपरिक खाद्यपदार्थ

महाराष्ट्रात प्रत्येक पट्ट्याची खास खाद्यसंस्कृती आहे. त्यात प्रामुख्याने कोकणी, पुणेरी, मराठवाडी, कोल्हापूरी, खान्देशी, वऱ्हाडी या म्हणता येतील. कोकणात नारळ व तांदूळ मुबलक उपलब्ध असल्यामुळे तेथील पारंपरिक खाद्यपदार्थांत खोबरे व तांदूळ यांपासून बनवलेले पदार्थ जास्त आढळतात...

विदर्भाची खाद्यसंस्कृती पानगे/रोडगे (पानगे/रोडगे यांतील सूक्ष्म भेद)

गव्हाच्या पीठापासून बनवला जाणारा पानगे/रोडगे हा पदार्थ विदर्भातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय. मार्गशीर्ष-पौष महिना सुरू झाला, की शेतात, तर कधी घरी पानग्याचा/रोडग्याचा बेत...

मोहाची पुरणपोळी

आषाढ महिन्यात पडणारा पाऊस, झडीचे वातावरण आणि त्या महिन्याची पौर्णिमा – गुरुपौर्णिमा, तिला विदर्भात ‘आखाडी’ म्हणून संबोधतात. तेथे पुरणपोळी या पदार्थाला खास असे महत्त्व आहे आणि तेथे उर्वरित महाराष्ट्रापेक्षा पोळी करण्याची पद्धतही निराळी आहे...

अचलपूरच्या नाम्याची भजी आणि…

2
अचलपूरची म्हणून म्हणता येतील अशी मोजकी चार-पाच हॉटेल्सच आहेत/ होती ! एरवी प्रत्येक शहरात हॉटेले आणि खाण्याच्या जागा असतात, तशा त्या अचलपुरातही आहेत. त्यांचा दर्जादेखील टपरीपासून ‘फाइव्ह स्टार’पर्यंत आहे. दुल्हा गेटने अचलपुरात प्रवेश केल्याबरोबर चावलमंडीमध्ये ‘बिना’ नावाचे हॉटेल कनकुरे यांच्या नावाने, थोडेसे अंतर चालून गेले, कीपुन्हा ‘बिन’ नावाचे हॉटेल लागे. ते भुरूमल यांच्या नावाने ओळखले जाई. श्री टॉकीजच्या टेकडीवर हॉटेलवजा एक टपरी होती ती ‘नाम्याचे भजे’ या नावाने ओळखली जाई...

भरडधान्य वर्ष : काय साधणार ?

संयुक्त राष्ट्र संघातर्फे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून 2023 हे साल पाळले जात आहे. संयुक्त राष्ट्र संघाने हा निर्णय भारत सरकारच्या सांगण्यावरून घेतला आहे. भारत सरकारने त्या पूर्वी, 2018 हे साल भरडधान्य वर्ष म्हणून पाळले होते. ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या डाळीच्या प्रकारातील धान्यांचा समावेश भरडधान्यात होतो...