Home संस्था

संस्था

गांधीजी महाराष्ट्राची ताकद कार्यकर्त्यांत आहे असे म्हणत. महाराष्ट्रभर स्वयंसेवी संस्थांचे जाळे असून व्यक्तिगत व संस्थात्मक रीत्या बरेच मोठे सामाजिक कार्य होत असते. बदलत्या काळात व्यक्ती खासगी रीत्या अनेकानेक उपक्रम उभे करतात. त्या संस्था समाजालाच पुढे नेत असतात. अशा सरकारी, निमसरकारी, खासगी उपक्रमशील संस्थांचा परिचय.

पंढरपूरची पालवी… स्पर्श मायेचा… (Palawi from Pandharpur)

एचआयव्ही एडसग्रस्त अनाथ बालकांच्या संगोपनाकरता मंगलताई शहा यांनी 2001 मध्ये पंढरपूरमध्ये ‘पालवी’ नावाची संस्था स्थापन केली. दोन मुलांच्या प्रवेशापासून सुरू झालेली ही संस्था आता बहू अंगांनी विस्तारली आहे. संस्थेने या मुलांकरता स्वत:ची शाळा, गोशाळा सुरू केली आहे. एडसग्रस्त अनाथ बालकांबरोबरच अत्याचार पीडित कुमारी माता, मनोरुग्ण माता, विवंचनेने पीडित स्त्रिया यांचा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी सांभाळ केला जातो. परित्यक्ता, विधवा, वृद्ध, मनोरूग्ण यांना आधार दिला जातो. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई काम, शेती काम, प्लंबिंग इत्यादी कामे त्यांना शिकवली जातात. याखेरीजही संस्थेतर्फे वंचितांकरता अनेक प्रकल्प राबवले जातात...

वंचिता मुखी धान्याच्या राशी (Food for every soul)

मिळून साऱ्याजणी उभारती धान्याच्या राशी, वंचिता मुखी घास भरवती... हे ब्रीदवाक्य घेऊन ठाण्यातील काही मैत्रिणी एकत्र आल्या आणि घरचे स्वयंपाकघर सांभाळता सांभाळता महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थांच्या अन्नपूर्णा बनल्या ! त्यांनी गरजू संस्थांच्या स्वयंपाकघरांची जबाबदारी उचलली. हे शक्य झाले ते ध्येयाने प्रेरित झालेल्या उज्ज्वला बागवाडे या एका गृहिणीने पाहिलेल्या स्वप्नातून... उज्ज्वलाने ‘वुई टुगेदर’ धान्य बँकेचा प्रवास ठाण्यातील आठ मैत्रिणींना बरोबर घेऊन सुरू केला आणि महाराष्ट्रातील सव्वाशे गृहिणी धान्यदानाचे काम तिच्याबरोबर गेली आठ वर्षे अविरतपणे करत आहेत...

स्त्री मुक्ती संघटना (Stree Mukti Sanghatana)

स्त्री मुक्ती संघटना गेली 48 वर्षे महाराष्ट्रात कार्यरत आहे. सातत्याने विविध उपक्रम राबवून संघटनेने विविध स्तरातील स्त्रियांच्या आयुष्यात गुणात्मक फरक केला आहे. पंचवीस वर्षे स्त्री मुक्ती संघटनेच्या उपाध्यक्ष आणि 2018 पासून त्या संघटनेच्या सेक्रेटरी असलेल्या अमोल केरकर या लेखात स्त्री मुक्ती संघटनेच्या उद्दिष्टांविषयी आणि वाटचालीविषयी विस्ताराने सांगत आहेत. संस्थेच्या 48 वर्षांच्या कामाविषयी असल्यामुळे लेख काहीसा दीर्घ आहे. मात्र संस्थेच्या वाढीसाठी केलेले विविध उपक्रम या लेखामुळे इतर संस्थांनाही मार्गदर्शक ठरतील असे आहेत. अमोल केरकर यांना बँक कर्मचाऱ्यांच्या चळवळीत काम करण्याचाही दीर्घ अनुभव आहे. त्यांच्यासारख्या मृदू स्वभावाच्या आणि चिकाटीने काम करणाऱ्या कार्यकर्तीचे अनुभव आणि विचार महत्त्वाचे आहेत...

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (Balasaheb Sawant Krushi Vidyapeet, Dapoli)

दापोलीचे ‘बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ’, ही देशातील कृषी संशोधन करणाऱ्या संस्थांमध्ये एक अग्रगण्य संस्था आहे.  ह्या विद्यापीठाने विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान, कोकणातली पिके, फळे, भाज्या इत्यादींच्या सुधारित जाती यामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय फरक...

अन्नपूर्णा परिवार

महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या स्वयंसेवी संस्थांच्या नावांमध्ये ‘अन्नपूर्णा परिवारा’चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ही संस्था गरीब आणि गरजू महिलांच्या सक्षमीकरणाविषयी समग्र विचार करते. व्यवसाय, आरोग्य, कुटुंबाचा विकास, आरोग्य, निवृत्तीवेतन अशा अनेक आघाड्यांवर भक्कमपणे महिलांच्या पाठीशी उभी रहाणारी संस्था अशी अन्नपूर्णा परिवाराची ओळख आहे. आजमितीला सव्वा लाख शेअर होल्डर्स, बचत करणाऱ्या महिला आणि तीनशे पन्नास कर्मचारी वर्ग असलेल्या या संस्थेची माहिती सांगत आहेत पत्रकार आणि लेखिका वृषाली मगदूम...

श्रीगोंद्याचे अनंत झेंडे – वंचितांचा वाली ! (Anant Zende of Shrigonda – Protector of...

पारधी व डोंबारी समाजाच्या मुलामुलींना शिक्षण व निवास या सोयी उपलब्ध करून देणारे श्रीगोंद्याचे अनंत झेंडे समाजकार्याच्या भावनेने झपाटलेले आहेत. त्यांनी तरुणपणी गावचे रस्ते झाडून- स्वच्छ करून आदर्श प्रस्थापित केला, तर सरकारी सहाय्याचा विचार न करता वंचित मुलांसाठी निवासाची व्यवस्था करून दिली. संस्थेने श्रीगोंदा येथील अण्णाभाऊ साठे चौकातील दलित वस्तीत ‘साधना बालभवन’ सुरू केले आहे. तेथे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या मुलांसाठी काम चालते...

सुचेता-राजेंद्र धामणे डॉक्टर दांपत्याचे मनगाव

राजेंद्र आणि सुचेता धामणे ह्या डॉक्टर दांपत्याचे सहजीवन सुरू झाले तेच मुळी समाजासाठी काहीतरी करावे या समविचाराने. दोघेही एकत्र होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात शिकलेले. कॉलेजमध्ये शिकत असतानाच गरजूंना मदत करत असत. वैद्यकीय पदवी पंचवीस वर्षापूर्वी 1998 मध्ये घेतल्यानंतर त्यांनी दोघांनी मिळून लगेच माऊली या संस्थेची स्थापना केली. त्यांनी शिंगवे तालुक्यात (जिल्हा नगर) मोबाईल क्लिनिक चालवले. वाड्यावस्त्यांवर, आदिवासी वस्त्यांवर जाऊन तेथील रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार केले. दोघांनी वीस बेडचे रुग्णालयही सुरु केले. तेथे सगळ्या सोई सुविधा होत्या...

उषा बाळ यांची सोबती समवेत आव्हानांवर मात

0
मानसशास्त्रज्ञ डॉ.अल्बर्ट एलिस म्हणतात, ‘जेव्हा तुम्ही निर्णय घेता की मी माझ्या समस्यांची जबाबदारी स्वतः घेणार आहे. त्याबद्दल इतर माणसे किंवा परिस्थिती यांना दोष देणार नाही, तो क्षण साक्षात्काराचा असतो. तेथून तुमची प्रगती वेग घेते.’ अंध व बहुविकलांग मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या 'सोबती पालक संघटने'च्या संस्थापक उषा बाळ यांच्या जीवनाकडे बघताना या वचनाची प्रचिती येते. असंख्य आव्हानांना पुरून उरलेल्या या दुर्गेची ही प्रेरक कहाणी...

अखंड कार्यरत हसरे चेहरे

बालपणात चांगले संस्कार व्हायला हवेत असे नेहमी म्हटले जाते. पण ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, शिक्षण नाही आणि जे सगळ्या जगापासून लांब, दुर्गम भागात राहत आहेत असे आदिवासी लोक त्यांच्या मुलांना कोणते आणि कसे संस्कार देणार? तशा मुलांना मध्य प्रदेशातील नर्मदालय येथे त्यांच्या नकळत कसे मोलाचे संस्कार मिळत आहेत हे सांगणारा उज्ज्वला बर्वे यांचा लेख...

फिटे अंधाराचे जाळे ! – मनोबाधेसाठी एकलव्य (Eklavya vanishes the web of depression !)

माणसांना मन मोकळे करण्याची इच्छा बऱ्याचदा असते, पण त्यांना त्यांचे म्हणणे नीट, शांतपणे ऐकून घेतले जाईल याची खात्री नसते. शिवाय, त्यांना त्यांनी कोणाला काही सांगितले तर ते ‘जज’ करतील, नावे ठेवतील अशी भीतीही वाटते. मी भावना व्यक्त करता न आल्याने कोंडमारा सहन करत जगणारी माणसे आजुबाजूला बघितली होती. त्यामुळे मला मानसिक आरोग्य हा विषय किती गंभीर आहे याची कल्पना होती. म्हणूनच, माझी इच्छा त्या विषयाशी संबंधित क्षेत्रात काम करण्याची होती...