Home Tags शिक्षण

Tag: शिक्षण

अंबरनाथची गुरुकुल शाळा – शिक्षणाचा नवा आयाम (Ambernath School preserves Gurukul Tradition)

अंबरनाथचे ‘गुरुकुल’ केवळ शिक्षण देत नाही, ते विद्यार्थ्याला समजून घेते, घडवते आणि आयुष्यातील प्रत्येक वळणासाठी तयार करते. असे म्हणता येईल की ‘गुरुकुला’त आयुष्य शिकायला मिळते ! गुरुकुल हा भाऊसाहेब परांजपे विद्यालयाचा एक आगळा वेगळा उपक्रम आहे. तेथे विद्यार्थी स्वयंप्रेरणेने आणि अर्थातच पालकांच्या संमतीने प्रवेश घेतात. ‘गुरुकुला’त शाळा बारा तासांची होते ! नित्याचे वर्ग पाच तासांचे आणि गुरुकुलातील विशेष संस्कार शिक्षण सात तासांचे. पण गंमत अशी की तेथे शिकणाऱ्या मुलांना शिक्षणाचा तो जादा वेळ म्हणजे ओझे वाटत नाही...

श्रमिक सहयोगची प्रयोगभूमी ! (Prayogbhumi – Chiplun Institution for Adiwasi Education)

चिपळूणचे राजन इंदुलकर ‘प्रयोगभूमी’ नावाचा आदिवासी शिक्षणाचा प्रयोग करण्यात गुंतले आहेत; त्यालाही वीस वर्षे झाली. ते चिपळूण तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात कोळकेवाडी येथे पोचले व तेथे ‘श्रमिक सहयोग’चे काम सुरू केले. संस्थेमार्फत शिक्षणापासून वंचित अशा धनगर, कातकरी आणि आदिवासी मुलांना नावीन्यपूर्ण पद्धतीचे शिक्षण देण्यावर त्यांचा भर आहे. ती मुले शिक्षणापासून वंचित होती; त्यांना प्रयोगभूमीमुळे शिक्षण सुविधा प्राप्त झाली. प्रयोगभूमी डोंगरउतारावर वसलेली आहे. संस्थेच्या सोळा एकर क्षेत्रापैकी सत्तर टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे. तेथे दरवर्षी पावसाळ्यातील चार महिने पाण्यावरील वीज वापरली जाते. उर्जा स्वावलंबनाचा विचार पसरावा म्हणून दरवर्षी ऑगस्टमध्ये तेथे ‘चला वीज बनवुया’ कार्यक्रम साजरा केला जातो...

विद्यानिकेतन – चांगल्या मूल्यांचा आग्रह (Dombivali’s Vidyaniketan – insistence for values)

‘विद्यानिकेतन’ ही डोंबिवलीमधील इंग्रजी माध्यमातील शाळा. समाजकार्याची आवड म्हणून विवेक पंडित यांनी ती सुरू केली. शाळेला चाळीस वर्षे झाली. मराठी माणसाने ध्येयवृत्तीने चालवलेली शाळा म्हणून तिचे डोंबिवलीच्या शैक्षणिक आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण झाले आहे. वास्तविक विवेक पंडित यांचे शिक्षण वाणिज्य व व्यवस्थापन ह्या क्षेत्रांमधील आणि त्यांचा कामाचा अनुभव इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, केमिकल, एण्टरटेनमेंट अशा क्षेत्रांमधील. ते तेथे आघाड्यांच्या कंपन्यांचे प्रकल्प सल्लागार होते. त्यातून त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असे, पण त्यांना त्यांची समाजधारणा स्वस्थ बसू देत नव्हती. त्या अस्वस्थतेतूनच ‘राजेंद्र शिक्षण संस्था’ ह्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ‘विद्यानिकेतन’ ह्या शाळेचा जन्म 16 जून 1985 रोजी झाला...

शाळाबाह्य मुलांची उमेद वाढवणारा संकल्प !

आई-वडिलांची बळजबरी आणि भीती यापोटी सिग्नल, रेल्वे स्थानक, मॉल अशा ठिकाणी आणि अगदी रस्त्यावरदेखील कित्येक लहान मुले फुगे, गजरे, खेळणी विकताना; तसेच, भीक मागताना दिसतात. मंगेशी मून या महिला कार्यकर्तीने तशा मुलांसाठी मुंबईतून ‘उमेद संकल्प’ संस्थेअंतर्गत कामाला सुरुवात 2015 साली केली. त्यानंतर अवघ्या दहा वर्षांत, त्यांनी त्यांच्या वडिलांच्या विदर्भातील वर्ध्यात ‘रोठा’ या गावी अकरा एकरांमध्ये वसतिगृह बांधले. तेथे राहून निराधार सत्तर मुले पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. त्याखेरीज पुण्याच्या कोथरूड भागात भाड्याच्या इमारतीत तसेच वसतिगृह आहे. तेथे मुलेमुली राहतात...

राजाराम महाराजांचे इटालीमध्ये स्मारक ! (Rajaram Maharaj Memorial In Italy)

0
कोल्हापूरचे महाराज राजाराम (दुसरे) ह्यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी, 1870 मध्ये युरोपात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जनसामान्यांत आणि काही कुटुंबीयांतही नाराजी उमटली. समुद्र ओलांडण्याला सनातनी हिंदुधर्मात मान्यता नाही असा समज होता ना ! पण राजाराम महाराज ती सर्व नाराजी ओलांडून निर्धाराने युरोपात गेले, कारण त्यांना युरोपीय शिक्षणपद्धत समजाऊन घेऊन ती स्वतःच्या संस्थानात सुरू करायची होती. राजाराम महाराज स्वतः इंग्रजी शिकलेले होते. त्यांनी उत्तम संभाषण इंग्रजीत करण्याइतकी पात्रता मिळवली होती. ब्रिटिशांनी राजाराम महाराजांना राज्यकारभार व शालेय शिक्षण, दोन्ही चांगल्या प्रकारचे देण्याची व्यवस्था केली होती...

पहिली सिग्नल शाळा ठाण्यात ! (Innovative Signal School in Thane)

ठाणे शहरातील तीन हात नाक्यासह विविध सिग्नलवर भटक्या-विमुक्त जमातींतील शंभराहून अधिक मुले पुलाखाली आश्रय घेऊन राहत होती. पैकी तीन हात नाक्यावरील मुलांचे तेथील वास्तव्य संपुष्टात आले. मुलांचे वडील तेथेच वाढले. मुलांचे जन्म आणि बालपण पुलाखालीच गेले. खरे तर, असे दृश्य एकट्या ठाणे शहरात नसून अशी शेकडो मुले भारतातील प्रत्येक महानगरामध्ये जगत असतात. सरकार शिक्षणप्रसारासाठी अनेक मोहिमा करत असते. तथापी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास राहिलेली ही मुले मुख्य धारेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यास अपात्र ठरतात. अशा वेळी, ठाण्याच्या काही कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून ‘समर्थ भारत व्यासपीठ’ या सामाजिक संस्थेची ‘सिग्नल शाळा’ सुरू झाली...

बालशिक्षणातील अनुताईंचे प्रयोग ! (Anutai Wagh : Pioneering Efforts in Child Education)

अनुताई वाघ या ताराबाई मोडक यांच्या सहकारी. त्यांनी कोसबाडच्या आदिवासी भागातील बालशिक्षणाचे- ताराबाई मोडक यांचे कार्य जोमाने पुढे नेले. त्या कार्याला अनेक पदर जोडले. अनुताई यांचे वैयक्तिक आयुष्य दु:खद होते. त्यांना मातृत्व तर सोडाच; पण विवाहितेचे सौभाग्यही क्षणिक लाभले ! मात्र अनुताईंनी आदिवासींच्या व दलितांच्या मुलांना वात्सल्याने स्वत:च्या कवेत घेतले. त्या समाजातील मुलांचे खरे शिक्षण ‘त्यांना माणसात आणण्याचे’ होते. ती मुले केवळ शिक्षणापासून वंचित नव्हती, तर त्यांचे शिक्षणाशी जणू शत्रुत्व तयार झाले होते. त्यांनी तशा मुलांच्या गळी शिक्षण उतरवण्याचा लोकविलक्षण खटाटोप केला...

टीच – माणसे घडवणाऱ्या व्यवस्थेचा दिशादर्शक (TEACH Tool for School Inspection)

वर्गात शिकवण्याच्या पद्धतींच्या परिणामकारकतेवर लक्ष ठेवण्यासाठी जगभरातच कोणतीही प्रमाणित साधने वापरली जात नाहीत. असे साधन विकसित करण्याची गरज जागतिक स्तरावरील अभ्यासकांना तीव्रतेने जाणवली. त्यामधून जागतिक बँकेच्या शिक्षण गटाने TEACH हे प्रमाणित वर्गनिरीक्षण साधन विकसित केले आहे. या साधनामुळे शिक्षकांच्या अध्यापनाची गुणवत्ता, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके यांची परिणामकारकता तपासण्यासाठी एक समान आणि विश्वसनीय अशी मोजपट्टी उपलब्ध झाली आहे...

उच्च शिक्षण, संशोधन – काही प्रश्न काही उत्तरे…

देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली. मात्र शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट समजून घेतले जात नाही. शिक्षण हे पदवी-सर्टिफिकेट घेण्यासाठी अन् पर्यायाने नोकरीसाठी गरजेचे म्हणून घेतले जाते. ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षण हे मूळ उद्दिष्ट बाजूला राहते. त्यामुळे शिकवणारे, शिकणारे या सर्वांची दिशाभूल होते. सगळे लक्ष मार्क्स, श्रेणी, पर्सेंटेज यांकडे लागलेले. परीक्षांचे नियोजनदेखील त्या उद्दिष्टाने केले जाते. कोणतीही परीक्षा विद्यार्थी काय, कसे शिकला हे तपासत नाही...

शिक्षण कशासाठी- हे समजेल का?

शिकवण्याची नव्हे तर शिकण्यासंबंधीची आव्हाने या शतकात वाढत जाणार आहेत. भारतीय शिक्षणव्यवस्था ‘टीचिंग’चा विचार करते; सगळा भर अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर असतो. विद्यार्थी काय व किती शिकला याचा विचार फारसा नसतो. त्याच्या शिक्षणाचे मूल्यमापन ज्या परीक्षांद्वारे होते त्याही कुचकामाच्या आहेत. शास्त्र, विज्ञान समजून घेणे खूप कठीण नाही, पण ते तसे सोपेदेखील नाही ! शिकणे याचा अर्थ पुस्तकातून माहिती गोळा करणे, दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे हा नव्हे ...