महाराष्ट्रातील पाच संस्था एकत्र येऊन 15 ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन ते पुढील वर्षी 30 जानेवारी रोजी येणारा महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन या काळात राज्यभर वैचारिक जागरण करणार आहेत. या काळात राज्यभर विविध विषयांवर अभ्यासक, तज्ज्ञांची किमान पंच्याहत्तर व्याख्याने होतील. या आगळ्या उपक्रमाचा ‘महाराष्ट्र टाइम्स’ मीडिया पार्टनर आहे. या उपक्रमाची ही ओळख...