Home Tags लेखन

Tag: लेखन

थिंक महाराष्ट्र च्या वर्धापन दिनी तीन पुस्तकांचे प्रकाशन

लेखनावर अथवा कलाविष्कारावर सद्यकाळात कोणतेही बंधन जाणवत नाही असा स्पष्ट निर्वाळा लेखक-अभिनेते अभिराम भडकमकर आणि नाट्यदिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी व्यक्त केला. ते ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या वर्धापनदिन कार्यक्रमातील परिसंवादात बोलत होते. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’संचालित ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलचा चौदावा वर्धापनदिन अर्थात ‘सद्भावना दिवस 2024’, ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात झाला. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा चांगुलपणा आणि त्याची प्रज्ञा-प्रतिभा ह्या ‘नेटवर्क’मध्ये नव्या-जुन्या पिढीतील सर्वांनी त्यांच्या लेखणीने, विचारांनी आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांतूनही योगदान द्यावे असे आवाहन ह्या वेळी करण्यात आले...

आमचा रोड

एखाद्या मित्राच्या सहवासात आश्वस्त वाटते, तसे त्या रोडवर वाटते. निसर्गाच्या सर्व ऋतूंचे दर्शन तेथे होते. त्याच्याशी होणाऱ्या हितगुजाने मनातील किल्मिषे निघून जातात व मन स्वच्छ, मोकळे आणि प्रसन्नतेने भरून जाते. शिवतर नावाच्या गावी जाणारा तो रोड अनेक मौजेच्या गोष्टींचा साक्षीदार आहे...

मेधा पाटकर व जीवनशाळा

आदिवासी समाज हा शहरी समाजापासून दूर, आडरानात राहतो. त्यांच्याकडे नैसर्गिक संसाधने असतात. सरकारने आदिवासी भागांमध्ये शाळा काढल्या आहेत, पण तेथे मुले येत नव्हती. उलट, जीवनशाळांमध्ये मुले हौसेने येतात. त्या जीवनशाळांना मेधा पाटकर यांचे मार्गदर्शन लाभते...
_d._b_kulkarani

द.भि. कुलकर्णी – समीक्षेचा सृजनव्यवहार (D.B. Kulkarni Marathi Critic)

द.भि. कुलकर्णी हे ज्येष्ठ समीक्षक म्हणून ख्यातनाम होते. त्याचमुळे त्यांची निवड त्र्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्यात 2010 साली झाली होती. समीक्षक ही त्यांची पहिली ओळख, तर जाणकार संगीत श्रोता आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक हे त्यांचे आणखी काही खास पैलू. द.भि. कुलकर्णी हे समाजातील वास्तव स्पष्ट शब्दांत मांडत. ते वाचकांना सांगत असे, की “आजच्या विज्ञानयुगात असून तुम्ही वैज्ञानिक दृष्टी स्वीकारत नाही, तर मनोरंजनाची दृष्टी स्वीकारता. तुम्ही दूरदर्शनवर करमणुकीचा कार्यक्रम पाहत असाल तर त्याचा आनंद घेणे बरोबर आहे, मग ते नृत्य असो, संगीत असो किंवा नाटक, सिनेमा, क्रिकेटची मॅच, काहीही. पण तुम्ही करमणूक म्हणून भूकंप, अवर्षण, अपघात, दहशती हल्ले यांची दृश्येही पाहत असाल तर तुमची संवेदना बोथट झाली आहे, असे मी समजतो...
_fandi

फंदी, अनंत कवनाचा सागर! (Fandi, Sea of ​​Infinite Kavana)

अनंत फंदी हे संगमनेरचे. त्यांच्या पूर्वजांचा धंदा सराफीचा, गोंधळीपणाचा; भवानीबाबा नामक साधूने फंदीला धोंडा मारला, तेव्हापासून त्याला कवित्वस्फूर्ती झाली! शाहीर होनाजीने ‘फंदी, अनंत कवनाचा...
maze_chintan_g.p.pradhan

माझे चिंतन – ग.प्र. प्रधान

मानवी जीवनात सुख आणि दुःख हे प्रकाश व छायेसारखे असते. सुख मिळाले, की मनुष्याला जीवन प्रकाशमान झाल्यासारखे वाटते. त्या उलट, दुःख भोगण्यास लागले, की...
_marathi_pandit_kavi

मराठी पंडिती (आख्यानपर कविता) (Marathi Pandit Poet)

3
मराठी काव्य मध्ययुगात पंडिती अंगाने प्रकट झाले. ते अभ्यासून कविता लिहीत. त्यात काव्याचा उत्स्फूर्त आविष्कार नसे. पंडित कवींनी रामायण, महाभारत, भागवत पुराणे, रघुवंश, कुमारसंभव,...
_baramati_moropanta

कविश्रेष्ठ मोरोपंत बारामतीचे

मोरोपंत पराडकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जुने कवी. त्यांचा जन्म 1729 साली पन्हाळगडावर झाला. पराडकर हे मूळचे रत्नागिरीतील राजापूर प्रांतांतील सौंदल घराणे. पराडकरांचे वास्तव्य तेथे...
_shriram_kamat

विश्वचरित्र कोशकार – श्रीराम कामत

0
श्रीराम कामत हे ‘विश्वचरित्रकोशाचा अखेरचा खंड’ आणि ‘बोरकरांचे समग्र साहित्य प्रकाशन’ असे दोन प्रकल्प वर्षभरात पूर्ण करून निवृत्त होणार होते; पण, तोच मृत्यूने त्यांच्यावर...
_gatha_saptashati

गाथासप्तशती : शतकारंभातील महाराष्ट्राची लोकगाथा !

‘गाथासप्तशती’ म्हणजेच ‘गाथासत्तसई’ हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील आद्य काव्यग्रंथ! तो इसवी सनाच्या पहिल्या शतकात निर्माण झाला. तो महत्त्वाचा प्रमाणग्रंथ आहे. त्यामुळे दोन हजार वर्षांपूर्वीच्या...