Home Tags मराठी कम्युनिटी

Tag: मराठी कम्युनिटी

दिनेश अडावदकर ज्येष्ठ निवेदक

कर्जतचे दिनेश अडावदकर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रामध्ये ज्येष्ठ निवेदक आहेत. निवेदक म्हणून निवेदन क्षेत्रात त्यांचा लौकिक मोठा आहे. त्यांना कला-भाषा, साहित्य यांची आवड लहानपणापासूनच होती. त्यांचे कविता, निबंध, स्फूट लेखन शालेय वयापासून चालू असे. प्रसिद्ध लेखक-कवींबद्दल आणि कलावंतांबद्दल त्यांच्या मनामध्ये कुतूहल कायमच राहत आलेले आहे. त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे, त्यांची स्वाक्षरी घेणे, त्यांची व्याख्याने किंवा कार्यक्रम यांना हजेरी लावणे हीच त्यांची आवड. ते वर्णन करून सांगतात की माझ्या त्या वेळच्या स्वच्छंद वागण्यात शिस्त नव्हती. मधुमक्षिकेप्रमाणे ज्या फुलातून मकरंद मिळेल तेथून तो गोळा करणे, एवढेच त्या वयात ठाऊक होते...

आपली प्रिय माय मराठी…

आकाशवाणीच्या मुंबई अस्मिता केंद्रावर ‘जगुया आनंदी’ नावाचा कार्यक्रम सकाळी साडेसहा वाजता प्रसृत होतो. केंद्राच्या निवेदकांवर ती जबाबदारी असते. त्यांनीच तो लिहायचा व सादर करायचा. त्या वेळी पूर्वी ‘चिंतन’ नावाखाली पाच मिनिटांचे पाहुण्या विचारवंतांचे ध्वनिक्षेपित भाषण होत असे. त्याला पर्याय म्हणून निवेदकांमार्फत तयार झालेला हा हलकाफुलका ‘गुड मॉर्निंग’ म्हणावे असा कार्यक्रम आहे. तो त्या त्या दिवसाचे निवेदक त्यांच्या प्रकृतीप्रमाणे निभावून नेतात, पण कधी कधी, त्यावर प्रासंगिक निमित्ताने पण स्थायी स्वरूपांचे निवेदन कानी पडते. तसाच प्रकार दिनेश अडावदकर यांच्याकडून एका सकाळी घडून आला. येथे तो उद्धृत करत आहोत...

मराठी भाषासंस्कृती धोक्यात (Marathi Language and Culture in Danger)

सुधीर रसाळ हे संभाजीनगरचे सुविख्यात समीक्षक. ‘विंदांचे गद्यरूप’ या ग्रंथास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांनी वयाची नव्वदी पार केली होती. त्यामुळे त्या घटनेची विशेष प्रशंसेने दखल घेतली गेली. संभाजीनगरच्याच ‘मुक्त सृजन’ संस्थेने रसाळ यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार केला. त्या निमित्ताने वृंदा देशपांडे-जोशी यांनी ‘अमृताचे बोल’ नावाचा ब्लॉग लिहिला. त्यात रसाळ यांचे पूर्ण भाषण शब्दन् शब्द उद्धृत केलेच, पण स्वतःच्या भावनाही व्यक्त केल्या. सुधीर रसाळ यांनी वेगवेगळे चार मुद्दे मांडून त्यांचे भाषण नेमके व नेमक्या वेळात केले. त्यांतील मराठी भाषेसंबंधीचा मुद्दा प्रासंगिक महत्त्वाचा वाटल्याने तो येथे उद्धृत करत आहोत. अर्थात त्यातील निरीक्षणे चिरकालीन आहेत...

मराठीच्या सुवर्णकाळाचे स्वप्न (Dream of golden period of Marathi language)

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देऊन आणि विविध धर्मांच्या आणि जातींच्या एकशेपाच हुतात्म्यांचे बलिदान देऊन जिंकलेल्या महाराष्ट्र राज्याच्या जनतेने ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे महाराष्ट्राचे पारंपरिक मूलतत्त्व स्वीकारून राज्याची लोककल्याणाची नीती आणि सामाजिक प्रगती साधण्याचे ठरवले. मृणाल गोरे आणि तशाच इतर काही स्वाभिमानी नेत्यांनी पेरलेल्या मराठी भाषाभिमानाच्या बीजांमधून मुंबईत मराठी भाषेच्या संवर्धनाची मोहीम जोमाने फोफावली. त्यातूनच मराठी माणसाच्या मनात ‘माझे राज्य, माझी भाषा, माझी संस्कृती’ ह्या भावनेची पाळेमुळे घट्ट पसरू लागली. तत्कालीन राजकीय नेत्यांनीदेखील त्या भावनेला प्रोत्साहन दिले...

मृणाल गोरे यांची पाणीवाली बाई राष्ट्रीय पातळीवर (Mrunal Gore’s life story on...

मृणाल गोरे यांच्या स्मृतिदिनी, 17 जुलैला तिकडे दूर आसामात, गौहत्ती येथे त्यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी रंगमंचावर हिंदी भाषेत सादर होत आहे ! त्याचे लेखन केले आहे मुंबईच्या निवृत्त प्राध्यापक वसुधा सहस्त्रबुद्धे यांनी आणि सादरकर्त्या आहेत कन्नड भाषिक भागीरथी कदम. त्या राष्ट्रीय पातळीवर मानसन्मान मिळवलेल्या अभिनेत्री- दिग्दर्शक आहेत. सध्या त्या गौहत्तीमधील नाट्य विद्यालयाच्या प्राचार्य म्हणून जबाबदारी निभावतात. त्यांच्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या जीवनावरील नाट्यप्रयोग भारतात विविध ठिकाणी होत आहे. मृणाल गोरे यांची जीवनकथा त्याच प्रकारे भारतभर सादर होण्याची शक्यता आहे...

मराठी भाषा संवेदना: यंत्राची व माणसाची ! (Chat Gpt more language sensitive than human)

बोरिवलीला एक निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत- त्यांचे नाव सुभाष गावडे -वय वर्षे साठ. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ती याच उद्देशाने की मायमराठी जगावी ! त्यांच्या परीने त्यांनी त्यासाठी एक लढाई गेली काही वर्षे केली. ती म्हणजे रोज सरकारला एक तर्कशुद्ध पत्र लिहायचे, की मराठी भाषा जगवणे-टिकवणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने ती नीट पार पाडावी. गावडे हे राज्यघटनेपासून रोजच्या सरकारी परिपत्रकांपर्यंत प्रत्येक कागदाचा अभ्यास करतात. परवा, एक जुलैला त्यांनी पत्र लिहिले ते सोबत जोडले आहे. गंमत म्हणजे गावडे यांनी त्यांचे पत्रलेखन संपल्यावर त्यांनी चॅट जीपीटीशी जो संवाद केला तो जसाच्या तसा नमूद केला आहे. कारण त्यांना त्यांच्या सोळा महिन्यांच्या एकाकी लढ्यात माणसाकडून जी संवेदना लाभली नाही, ती यंत्राकडून मिळाली...

कागदावर शिक्षित पिढी! – रंगनाथ पठारे

रंगनाथ पठारे यांचे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यात मोलाचे योगदान आहे. ते मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2013 साली स्थापन झालेल्या अभ्यास समितीचे अध्यक्ष होते. ते मूलत: कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक आहेत. ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही त्यांची महाकादंबरी आहे, जी मराठा समाजाच्या सात पिढ्यांचा इतिहास मांडते. त्यांनी संगमनेर महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सदतीस वर्षे अध्यापन केल. पठारे म्हणजे विचार, संवेदना आणि शैली यांचा त्रिवेणी संगम. शासनाने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र...

अभिजात मराठी कोसळते तेव्हा… (Classical Marathi language crashed with the plane…)

महेश म्हात्रे हा तरुण, अभ्यासू पत्रकार आहे; स्वाभाविकच त्याने दैनंदिन बातम्यांवर आधारित पत्रकारिता सोडून संशोधनाकडे मोर्चा वळवला आहे. त्याने पत्रकारितेचा बाज सोडला नाही. त्यामुळे महाराष्ट्र रिसर्च सेंटर या, त्यानेच सुरू केलेल्या संस्थेमार्फत महाराष्ट्राबाबतची सामाजिक-राजकीय सत्याधिष्ठित माहिती संकलित केली जाते. त्यांवर आधारित अहवाल सादर केले जातात. महेशने वेगवेगळ्या शिष्टमंडळांच्या माध्यमांतून अनेक देशांचे दौरे केले आहेत. तो ‘टेड टॉक्स’ या इंग्रजीतील गाजलेल्या भाषण मालिकेत अवतरलेला एकमेव मराठी भाषक संपादक आहे. अहमदाबाद येथील दुर्दैवी घटनेनंतर त्याचे वार्तांकन करणाऱ्या सर्वच मराठी पत्रकारांनी ‘कोसळले’ या शब्दाला प्राधान्य दिलेले दिसले. ‘एअर क्रॅश’ या शब्दाचे भाषांतर करताना केलेले ‘विमान कोसळले’ हे भाषांतर चुकीचे नाही. पण मराठी भाषेत एवढे वैविध्य असतानाही माध्यमे कोणतेच भाषिक वैविध्य वापरणार नसतील तर, ते भाषिक भविष्यासाठी चांगले लक्षण नाही...

भद्र समाज – बंगाल व महाराष्ट्र (Bhadra Community of Bengal and Maharashtra)

बंगालच्या भद्र समाजाबद्दल महाराष्ट्रात उच्चभ्रू वर्गाला सतत आकर्षण वाटत आले आहे, कारण जगात फ्रेंच आणि भारतदेशात बंगाली हे लोक प्रखर भाषाभिमानी मानले जातात. येथे सुवर्णा साधू-बॅनर्जी बंगालच्या ‘भद्रलोक’ची वैशिष्टये सांगता सांगता बंगाली व मराठी लोकसमूहांची तुलना ऐतिहासिक संदर्भात मांडत जातात...

मराठी माणसाचे मराठीपण हरवत चालले आहे का?

मराठी भाषकांचे राज्य स्वतंत्र भारतात स्थापन करण्यासाठी ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ हा लढा उभारला गेला. महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 रोजी अस्तित्वात आले. तेव्हापासून 1 मे हा ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा होऊ लागला. योगायोग असा, की त्याच दिवशी जगभर ‘कामगार दिन’ही साजरा होतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी झाली ती मुख्यत: कामगार वर्गाच्या पाठिंब्यामुळे ! मराठी माणसाची आर्थिक सत्ता महाराष्ट्रात सतत कमजोर राहिली आहे. त्यामुळे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी होऊनसुद्धा मराठी सत्ताधारी वर्गाची मुंबईवरील व त्या अनुषंगाने महाराष्ट्रावरील पकड ढिली होत गेली आहे. परिणामत: मुंबईतील व महाराष्ट्रातील मराठी माणूस सत्त्वहीन झाला आहे, मराठी माणसाची ओळख हरवली गेली आहे, मराठी माणूस सामाजिक बांधिलकी विसरून आत्ममग्न झाला आहे...