Home Tags मंदिर

Tag: मंदिर

पाखाडी, पदपथ… कोकणचे फूटपाथ

4
पाखाडी हे पदपथ वा फूटपाथ यांचे एक रूप होय. सखल भागातून उंचावरच्या टेपाडावर जाण्या-येण्यासाठी दगडांनी बांधलेला रस्ता म्हणजे पाखाडी. त्या रस्त्याला फरसबंदी करण्यासाठी कोकणात मिळणाऱ्या जांभा दगडांचे चिरे वापरत. चार हजार वर्षांपूर्वी ग्रीकमधील नगररचनेत ते बांधण्याची पद्धत अवतरलेली दिसते. लंडनमध्ये सतराव्या शतकात रहदारीसाठी असलेल्या मुख्य रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी रस्त्यापासून किंचित उंच पदपथ बांधण्याची पद्धत रूढ झाली...

गोविंद वल्लभ पंत यांचे ओंड (Ond of G.V. Pant)

भारताचे पहिले गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत व नामवंत साहित्यिक कृ.पां. कुलकर्णी हे ओंड या गावचे सुपुत्र. या गावाची पदवीधरांचे गाव म्हणून ओळख आहे...

आमचा रोड

एखाद्या मित्राच्या सहवासात आश्वस्त वाटते, तसे त्या रोडवर वाटते. निसर्गाच्या सर्व ऋतूंचे दर्शन तेथे होते. त्याच्याशी होणाऱ्या हितगुजाने मनातील किल्मिषे निघून जातात व मन स्वच्छ, मोकळे आणि प्रसन्नतेने भरून जाते. शिवतर नावाच्या गावी जाणारा तो रोड अनेक मौजेच्या गोष्टींचा साक्षीदार आहे...

केळशी महालक्ष्मी मंदिर – मोगलकालीन प्रभाव(Mahalaxmi Temple at Kelshi)

रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील महालक्ष्मी मंदिराची जी इमारत आहे, तिच्यावर दाक्षिणात्य आणि मोगलकालीन कलेचा ठसा आढळतो. तेथील ध्वनीवर्धन, उगवतीच्या व मावळतीच्या सूर्यकिरणांचा देवीच्या चरणांना होणारा स्पर्श, झरी, पोळी या आगळ्यावेगळ्या गोष्टी मंदिराचे सौंदर्य वाढवतात...

जुळे हनुमान, हिंदू-मुस्लिमांना प्रिय !

जुळे हनुमान मंदिर अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यात येते. मंदिरातील जुळ्या हनुमान मूर्ती हिंदू व मुस्लिम, दोन्ही संस्कृतींत श्रद्धेने पूजल्या जातात ! आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भागातील मुस्लिम बंधू ‘हनुमान’ ही त्यांच्या जातीतील देवता आहे असे म्हणतात. त्यामुळे जुळे हनुमान मंदिर मुस्लिम बांधवांनाही हिंदूंएवढेच वंदनीय आहे...

केळशी देवीचा उत्सव : समाजजीवनाचे प्रतिबिंब

केळशीच्या महालक्ष्मी मंदिराचा उत्सव खूपच मोठा असतो. मंदिर हा पेशवेकालीन वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. उत्सवास केवळ धार्मिक स्वरूप नाही; तर त्यातून केळशी गावाचे समाजजीवन प्रतिबिंबित होते. उत्सव चैत्रशुद्ध अष्टमी ते पौर्णिमा या कालावधीत होतो.

बार्शीचा अंबरीषवरद भगवंत

लोककथेप्रमाणे विचार केला, तर बार्शीचा भगवंत पंढरीच्या विठ्ठलाहून जुना आहे असे जाणवते. भक्ताच्या परित्राणासाठी तो भगवंत शंख, चक्र, गदा व पद्मसहित त्याच्या लाडक्या लक्ष्मीला पाठीवर घेऊन पंढरीच्या विठ्ठलाच्या आधीपासून अद्भुत अशा बार्शीमध्ये उभा आहे.

फुलपाखरांच्या गावात…

श्रीकृष्णांचे गुरू सांदिपनी यांचा आश्रम पालघर जिल्ह्यातील चांदिप गावात होता असे म्हटले जाते. सांदिपनी ऋषींचे गुरुकुल मध्यप्रदेशात आहे. महाराष्ट्रातील चांदिप हे ठिकाण मात्र ‘नाही...

अचलपूर – त्राटिका वधाची नऊशे वर्षांची परंपरा

अचलपूरच्या जीवनपुरा भागातील बालाजी मंदिर उत्सवात समारोपाला सादर होणारे राम अवतार व त्राटिका वध हे ‘नाट्य’ त्या उत्सवाची खासीयत मानली जाते. त्या परंपरेस नऊशे वर्षे 2018 साली पूर्ण झाली. लोटांगणे घालण्याची परंपराही बालाजी मंदिरात आहे. भाविक-भक्त मंदिरापासून एक किलोमीटर दूर असलेल्या सर्पीण नदीच्या पात्रापर्यंत लोटांगणे घालत जातात…

वाल्मिकीचे पठार – पानेरी

वाल्मिकी पठार हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या पठारावर वाल्मिकी ऋषींनी वास्तव्य केल्याचे सांगितले जाते. तेथील वाल्मिकी मंदिर पूर्वाभिमुख असून, वाल्मिकींची मूर्ती गर्भगृहात आहे. त्या भागाचे आणखी महत्त्वाचे आकर्षण म्हणजे वन्य जीवांचा अधिवास असलेले घनदाट जंगल…