Home Tags पंढरीची वारी

Tag: पंढरीची वारी

साने गुरुजींचा पंढरपूर मंदिरप्रवेश सत्याग्रह

पंढरपूरची वारी पुण्याजवळच्या देहू-आळंदीपासून सुरू होते. महाराष्ट्राच्या गावागावांतून दिंड्या निघालेल्या असतातच. लक्षावधी वारकरी वीस दिवस चालत असतात. वारीची सांगता एकादशीला पंढरपूर तीर्थक्षेत्री होते. डोळ्यांत भक्ती आणि मुखावर हरिनाम जपणारे हे वारकरी, समाजातील एकतेचे जिवंत चित्र उभे करतात. त्यामुळे वारी केवळ धार्मिक यात्रा राहत नाही; ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक होते. मात्र लक्षात घेतले पाहिजे, की हाच सोहळा कधी काळी समाजाच्या एका मोठ्या वर्गासाठी क्लेशदायक होता. अनेक दिवस चालून आलेल्यांपैकी काही वंचितांना गाभाऱ्यात जाऊन पांडुरंगाचे दर्शन न घेताच परत फिरावे लागे. त्या अन्यायाला वाचा फोडली ती साने गुरुजी यांनी...

आधुनिक विज्ञानयुगात वारीचे औचित्य

0
पंढरीची वारी ही भागवत धर्माची जगातील एकमेवाद्वितीय परंपरा. ती आठशे वर्षांपासून नुसती टिकूनच राहिलेली नाही तर वृद्धिंगत होत आहे. वारी सर्वसमावेशक असल्याने तिचे औचित्य आधुनिक विज्ञानयुगातही आहे. कर्म, ज्ञान, भक्ती यांचा यथायोग्य मेळ आणि व्यवस्थापन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पंढरीची वारी. परम संगणककार विजय भटकर यांनी विज्ञान व आध्यात्म यांचा पायाच मुळात श्रद्धा आहे, ती अंध असू शकत नाही असे सांगून, त्यांची परस्पर पूरकता लेखाद्वारे उलगडून दाखवली आहे...

संत परंपरेचे विदेशी अभ्यासक (Foreign Scholars of the Saint Tradition)

डॉ. एलिनॉर झेलिएट या मराठी दलित संत साहित्याच्या अभ्यासक आहेत. त्यांनी संत चोखामेळा व इतर दलित संत यांच्यावर अभ्यास करण्यासाठी मुख्यत: परिश्रम घेतले. त्यांचा ‘संत चोखामेळा :विविध दर्शन’ नावाचा ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. त्यांना वा.ल.मंजूळ यांचे सहकार्य लाभले.

पंढरीची वारी- मराठी संस्कृतीची आत्मखूण! (Pandharpur Wari – Marathi Cultural Symbol)

माऊलींच्या पालखीचा आळंदी ते पंढरपूर हा पायवारीचा सोहळा होणार नाही हे ऐकून एकीकडे गलबलून येत आहे, तर दुसरीकडे माऊलींच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपुरास जाणार याचा आनंदही वाटत आहे. वारकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तो निर्णय योग्यच आहे...

वैराग्यवारी – परतवारी

पंढरपूरकडे जाणारी वारी ही ऐश्वर्यवारी असते. वारकऱ्यांची सोय गावोगावचे लोक, स्वयंसेवी संस्था, मंडळे करत असतात. दान देण्याची प्रवृत्ती त्या काळात दिसून येते. चहा, अल्पोपहार, फळफळावळे, उपवासाचे पदार्थ, पाणी यांचे वाटप सतत चालत असते. त्यामुळे वारीत श्रद्धाळू असतात तसे पोटार्थीही दिसून येतात. त्या दिंड्या परत कधी फिरतात? त्यांची व्यवस्था काय असते? परतीचा प्रवास किती दिवसांत होतो? किती लोक पालखीबरोबर असतात? या प्रश्नांची उत्तरे देणारे एक पुस्तक सुधीर महाबळ यांनी लिहिले असून ते पुण्याच्या ‘मनोविकास प्रकाशना’ने प्रसिद्ध केले आहे. पुस्तकाचे नावच ‘परतवारी’ असे आहे...
_ManishaRaundale_YanchiPandharpuriCyclevari_1.jpg

डॉ. मनीषा रौंदळ यांची पंढरपुरी सायकलवारी

1
पंढरपूरच्या दिंडीत आठ वर्षांपूर्वी सायकलस्वार दिसू लागले! सायकलस्वारांची ती संख्या शेकड्यांत मोजावी लागत आहे. म्हणजे सायकली पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत नसतात, त्यांचा मार्ग स्वतंत्र...
carasole

विश्वास येवले यांच्या ध्यासाची जलदिंडी

विश्वास येवले. पेशाने डॉक्टर. नामांकित स्त्री-रोगतज्ज्ञ. पण त्यांनी त्यांच्या बालपणापासून पाण्याशी झालेल्या मैत्रीतून, पाण्यावर असलेल्या निस्सीम भक्तीतून आळंदी ते पंढरपूर अशी जलदिंडी सुरू केली....
carasole-copy

स्वास्थ्यासाठी नाशिककरांची पंढरपूर सायकलवारी

‘नाशिक सायक्लिस्ट’ ही हौशीने सायकल चालवणाऱ्या मंडळींची ऑर्गनायझेशन गेल्या तीन-चार वर्षांत नाशिकमध्ये सक्रिय झाली आहे. नाशिक शहरात सायक्लिस्ट मंडळींची संख्या वाढत आहे. त्यातच महेंद्र...

पंढरीची वारी

0
पंढरीची वारी निश्चित कधी सुरू झाली ते सांगणे कठीण आहे. ही वारी ज्ञानदेवांच्या पूर्वीही होती. विविध संतांच्या पालख्या व दिंड्या पंढरपुरास जातात. त्यात प्रामुख्याने...