Home Tags गोविंदभाई श्रॉफ

Tag: गोविंदभाई श्रॉफ

मराठवाड्याचा स्वातंत्र्य संग्राम

2
भारत देशाच्या नकाशाच्या मधोमध असलेला हैदराबादचा प्रचंड मोठा भूभाग निजामाच्या ताब्यात होता. तो भारतात विलीन झाल्याविना भारताची अखंडता प्रस्थापित होणार नव्हती. भारताचे स्वातंत्र्य अधुरे राहणार होते. तसेच हैदराबाद संस्थान चोहोबाजूंनी भारत भूमीने वेढलेले होते. परंतु निजामाने या वास्तवतेचा विचार न करता स्वतंत्र राहण्याचा आग्रह धरला ! हैदराबाद संस्थानावर धर्माने मुसलमान असणाऱ्या मीर उस्मान अली खान निजाम याचे राज्य होते. तरी तेथील शहाऐंशी टक्के जनता हिंदू होती आणि ती बहुतांश जनता ‘भारतात विलीन व्हावे’ या मताची हाती. स्वतंत्र भारत सरकारची निजामाबरोबर अनेक बोलणी असफल झली तेव्हा भारताने ‘ऑपरेशन पोलो’ ही पोलिस कारवाई केली...

आधी विकास मग पुरस्कार – गोविंदभाई श्रॉफ (Govindbhai’s conditional acceptance of Padmavibhushan)

गोविंदभाई श्रॉफ यांच्यावरील महाभूषण वेबसाइट सर्वांसाठी खुली झाली आहे. त्यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या नव्हे, तर मराठवाड्यातील जनतेच्या स्मृतिपटलावरही पुसट झाले आहे. परंतु गोविंदभाईंनी 1938 ते 2002 या दीर्घकाळात हैदराबाद संस्थानाच्या स्वातंत्र्यपूर्व राजकारणावर आणि स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याच्या विकासावर त्यांचा अमीट ठसा उमटवला ! माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि गोविंदभाई यांचा उत्तम स्नेह होता. त्यांच्या संबंधातील एक किस्सा वेबसाइटवर नमूद आहे...

गोविंदभाई श्रॉफ यांच्यावर संकेतस्थळ (Website On Govindbhai Shroff)

स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा परिचय करून देणारे संकेतस्थळ गुरूवार, 24 जुलैला खुले झाले. हे संकेतस्थळ ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वतीने तयार करण्यात आले आहे. वेबसाइटचे लेखन गिरीश घाटे यांनी केले आहे. जन्मशताब्दीवीरांच्या वेबसाईट्स या प्रकल्पाचे नाव ‘महाभूषण’ संकेतस्थळे असे आहे. त्या मालिकेतील हे आठवे संकेतस्थळ आहे. गोविंदभाई श्रॉफ यांचा स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत म्हणून लौकिक होता. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांची 24 जुलै ही एकशेचौदावी जयंती...

वंदे मातरम् – हैदराबाद मुक्ती संग्रामातील पहिली ठिणगी

1
‘वंदे मातरम’ या गीताला भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1876 मध्ये लिहिलेल्या ‘आनंद मठ’ या कादंबरीतील आहे. ते रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम देशापुढे आणले. त्या गीताला प्रसिद्ध संगीतकार पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी स्वरबद्ध केले आणि ते गीत अजरामर ठरले ! ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत म्हणून राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात वाराणसी येथे 1905 साली स्वीकारले गेले...