Home Tags बाबासाहेब आंबेडकर

Tag: बाबासाहेब आंबेडकर

आबासाहेब काकडे – सर्वसामान्यांचे नामांकित वकील (Abasaheb Kakade – Lawyer who fought for ordinary...

जगन्नाथ कान्होजी ऊर्फ आबासाहेब काकडे यांनी कोल्हापूर येथून एलएल बी ची पदवी संपादन केली. ते देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झाले. तो काळ तसाच भारलेला होता. आबासाहेबांनी देशप्रेमाने डबडबलेल्या, राष्ट्रभावनेने भारलेल्या वातावरणाला डाव्या विचारांची डूब दिली. त्यांनी अडल्या-नाडल्या गरीब शेतकऱ्यांचे वकीलपत्र सर्रास घेतले; गोरगरीब पक्षकारांना मोफत न्याय मिळवून दिला. ‘शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे व सर्वसामान्यांचे नामांकित वकील’ म्हणून ते जिल्ह्यात प्रसिद्ध झाले...

नास्तिकांची दापोली

कोकणी माणूस त्याचे कुळाचार, त्या त्या समाजाने ठरवलेल्या रूढी-प्रथा-परंपरा कटाक्षाने पाळणारा आहे. कोकणवासी मंडळी धार्मिक सण-उत्सव यांत वर्षभर मग्न व दंग असतात. तरीही दापोली तालुक्यातील नास्तिक नमुने त्यांच्या वेगळेपणाने उठून दिसतात याचा मला अचंबा वाटत आला आहे. दापोलीतील निरीश्वरवादी मंडळींवर उपजत चिकित्सक वृत्ती, वाचन, नास्तिक मंडळींचा सहवास आणि समाजवादी धोरण या घटकांचा प्रभाव दिसून येतो...

बाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकारिता व विविध कामगिरी

जांभेकर हे पश्चिम भारतातील प्रबोधनाचा पाया घालणारे आद्य विचारवंतही मानले जातात. प्रबोधनाचे ते त्यांचे कार्य थोर आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी अवघ्या चौतीस वर्षांच्या आयुष्यात पत्रकारिता, शिक्षण, इतिहास, पुरातत्त्व संशोधन, पाश्चिमात्य ज्ञान विज्ञान, सामाजिक व धार्मिक जागृती व सुधारणा, शालेय पाठ्यपुस्तके, गद्य-पद्य इत्यादी क्षेत्रांत महत्तम कार्य केले आहे...

ज्ञानेश्वरांचा मराठी भाषेचा जाहीरनामा! (What Dnyaneshwar wants to say about Marathi language and it’s...

ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतील सौंदर्यभाव जसा खुलवून सांगितला, तितक्याच महात्म्याने साहित्यातील विवेकमूल्याची निकड प्रतिपादन केली. त्यांच्यानंतरच्या संतपरंपरेने मराठी साहित्याला व विचारविश्वाला विवेकाचा पाया घालून दिला. म्हणूनच सदानंद मोरे त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून ज्ञानेश्वरीमधील बाराव्या अध्यायातील नमनाच्या काव्यपंक्तींना ‘मराठी भाषेचा जाहीरनामा’ म्हणत आहेत…

महादू गेणू आढाव… मानवी हक्कांचा आवाज!

महादू गेणू आढाव या संघर्षवादी नेत्याने मानवी हक्कांसाठी लढा देऊन अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला. त्यांचा समाजाचे भले करण्याचा इरादा व जातीयवाद्यांशी लढा शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहिला. वादी असला तरी, त्याच्या आयुष्याचे नंदनवन करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्यातील सद्हृदयतेचे दर्शन घडवतो...