Home Tags थिंक महाराष्ट्र डॉट कॉम

Tag: थिंक महाराष्ट्र डॉट कॉम

चांगुलपणा अवतीभवती

2
श्रीकांत पेटकर यांनी “चांगुलपणा अवतीभवती” हे छोटेखानी पुस्तक ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलवरील काही निवडक लेखांचा संग्रह या स्वरूपात प्रकाशित केले आहे. पुस्तक ‘ग्रंथाली’ या मान्यवर संस्थेच्या देखरेखीखाली प्रकाशित झाले आहे, तर ‘थिंक महाराष्ट्र’चे मुख्य संपादक दिनकर गांगल यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभलेली आहे. सामाजिक, कला आणि संस्कृती क्षेत्रात स्वतःला झोकून दिलेले परंतु प्रसिद्धीविन्मुख अशा व्यक्तींबाबत लेख या पुस्तकात आढळतात...

महाराष्ट्र देशा (My Maharashtra)

29
आमचे गाव सिद्धेश्वर. अंतर पालीपासून दोन किलोमीटर. सिद्धेश्वर हे दुर्वे कुटुंबीयांचे मूळ गाव. त्यामुळे पालीमधील अष्टविनायक आणि देवळामागे उभा असलेला सरसगड अंगणात उभे असल्याप्रमाणे ओळखीचे. पाली या एका गावात इतके काही विखुरलेले, लिहिण्याजोगे आहे तर छत्तीस जिल्हे, तीनशेअठ्ठावन्न तालुके आणि त्यातील सुमारे पंचेचाळीस हजार गावे मिळून बनलेल्या महाराष्ट्रात लिहिण्याजोगे, नोंदी करण्याजोगे किती असेल ! वाटले, ‘मोगरा फुलला’ निमित्ताने उभा महाराष्ट्रच लिही म्हणून मला खुणावत आहे का? ही एक नवी सुरुवात तर नव्हे ?...

गणपतीसंबंधी वेगळे – बरेच काही… (Ganesh Festival – Different Perspective)

1
मोसम गणेशोत्सवाचा आहे. गणपती घरी बसवणाऱ्यांकडे धामधूम चालू आहे. गणेश ही देवता आता केवळ महाराष्ट्रापुरती राहिलेली नाही. मराठी समाज जेथे जेथे गेला तेथे तेथे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य म्हणून गणपतीला घेऊन गेला. बघता बघता गणपती अन्य समाजातही पसरला आणि आता तो केवळ भारताला बांधणाराच नव्हे तर जगाला जोडणारा देव होऊ शकतो अशी चिन्हे दिसतात...

सद्भावनेचे व्यासपीठ

माणसे माणसांशी चांगुलपणाने वागत आहेत; छोटी माणसे मोठी कामे उभी करत आहेत. आजही माणसे इतरांच्या भल्यासाठी धडपडत आहेत. समाजातील भलेपणा जपू पाहत आहेत. अशा व्यक्ती समाजात दहा टक्केच असतात, परंतु त्यांचा प्रभाव एकूण समाजावर भासतो तेव्हा एकूण समाजाच्या सद्भावनेची शक्ती जाणवते, त्याच समाजशक्तीचा प्रत्यय घेण्यासाठी ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ आहे. येथे जे जे चांगले आहे ते ते नोंदले जाईल...

फलटणचा संस्कृतिशोध !

0
फलटण तालुका संस्कृती महोत्सवात स्थानिक परिसरातील मुद्यांना स्पर्श करणाऱ्या बौद्धिक व अनुभवाधारित चर्चा चालू असताना, दुसऱ्या बाजूला वातावरण जत्रेचे, हलकेफुलके होते. माहोल अनौपचारिक गप्पांचा होता. येणारे पाहुणे आणि श्रोतेही प्रदर्शनातील मोजक्याच स्टॉलना भेटी देऊन विविध माहिती गोळा करत होते. आकर्षणे वेगवेगळी होती. त्यात फलटणचा दुष्काळी टापू जलमय कसा झाला येथपासून शहराच्या समस्यांची विद्यार्थ्यांनी मांडणी केली होती, बचतगटाच्या महिलांनी उभे केलेले जग होते, फलटण तालुक्यातील लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक कार्यालयाने पुरवलेली मताधिकाराची विविध तऱ्हेची माहिती होती...